शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
4
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
5
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
6
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
7
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
8
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
9
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
10
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
11
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
12
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
13
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
14
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
15
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
16
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
17
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
18
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
19
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
20
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर

न्यायव्यवस्था सत्य शोधण्याची प्रक्रिया : जयंत जायभावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:42 IST

सत्य शोधण्याची प्रक्रिया म्हणजे न्यायव्यवस्था आहे, याची जाणीव वकिलांपासून न्यायाधीशांपर्यंत आणि पक्षकारापासून पोलिसांपर्यंत सर्वांनी ठेवणे काळाची गरज आहे. मात्र दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही.

नाशिक : सत्य शोधण्याची प्रक्रिया म्हणजे न्यायव्यवस्था आहे, याची जाणीव वकिलांपासून न्यायाधीशांपर्यंत आणि पक्षकारापासून पोलिसांपर्यंत सर्वांनी ठेवणे काळाची गरज आहे. मात्र दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही. परिणामी न्यायव्यवस्थेचा पाया दिवसेंदिवस कमकुवत होऊ लागला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी केले.संवाद नाशिक या संस्थेच्या वतीने कुसुमाग्रज स्मारकात ‘न्याय मिळण्यास विलंब का होतो’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी जायभावे म्हणाले, यांत्रिक मानसिकतेतून कायद्याची निर्मिती जेव्हा होते तेव्हा समाजाच्या परिस्थितीचे प्रतिबिंब प्रत्येक घटक व पेशामध्ये उमटते. नैतिक दृष्ट्या बघितले तर खटल्यांना विलंब का होतो, तर प्रामाणिकपणा कुठे तरी कमी पडत आहे, हे यामागील निश्चित कारण लक्षात येते. न्यायव्यवस्थेचा पाया कमकुवत होण्यास स्वार्थीवृत्तीने आपल्या पेशामध्ये काम करण्याची प्रवृत्तीच जबाबदार आहे. विलंबाशिवाय न्याय हवा असेल तर प्रत्येकाला ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदनुसार प्रामाणिक राहून पेशानुसार कर्तव्य पार पाडावे लागेल, असे जायभावे म्हणाले.भारतीय न्यायव्यवस्थेत दिवाणी खटल्याचे वय २६ तर फौजदारी खटल्याचे वय २० वर्ष इतके आहे तर अनुक्रमे परदेशात अवघे ३ व ४ वर्षे इतकेच आहे. यावरून भारतीय न्यायव्यवस्थेची अवस्था लक्षात येते. त्यामुळे सर्वसामान्यांची मानसिकता ‘न्यायालयात जायला नको’, ‘न्यायालयात जायचे कशाला, पुढील तारीख घ्यायला’ अशी होते. वकिलांपासून पोलिसांपर्यंत प्रत्येकाने सत्य शोधण्याच्या प्रक्रि येत आपला सहभाग मानून आपल्या भूमिकेला न्याय दिल्यास न्यायव्यवस्था अधिकाधिक बळकट होण्यास वेळ लागणार नाही.

टॅग्स :Courtन्यायालयadvocateवकिल