शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
3
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
4
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
5
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
6
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
7
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
8
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
9
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
10
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
11
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
12
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
13
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
14
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
15
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
18
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
19
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
20
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!

न्यायव्यवस्था सत्य शोधण्याची प्रक्रिया : जयंत जायभावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:42 IST

सत्य शोधण्याची प्रक्रिया म्हणजे न्यायव्यवस्था आहे, याची जाणीव वकिलांपासून न्यायाधीशांपर्यंत आणि पक्षकारापासून पोलिसांपर्यंत सर्वांनी ठेवणे काळाची गरज आहे. मात्र दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही.

नाशिक : सत्य शोधण्याची प्रक्रिया म्हणजे न्यायव्यवस्था आहे, याची जाणीव वकिलांपासून न्यायाधीशांपर्यंत आणि पक्षकारापासून पोलिसांपर्यंत सर्वांनी ठेवणे काळाची गरज आहे. मात्र दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही. परिणामी न्यायव्यवस्थेचा पाया दिवसेंदिवस कमकुवत होऊ लागला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी केले.संवाद नाशिक या संस्थेच्या वतीने कुसुमाग्रज स्मारकात ‘न्याय मिळण्यास विलंब का होतो’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी जायभावे म्हणाले, यांत्रिक मानसिकतेतून कायद्याची निर्मिती जेव्हा होते तेव्हा समाजाच्या परिस्थितीचे प्रतिबिंब प्रत्येक घटक व पेशामध्ये उमटते. नैतिक दृष्ट्या बघितले तर खटल्यांना विलंब का होतो, तर प्रामाणिकपणा कुठे तरी कमी पडत आहे, हे यामागील निश्चित कारण लक्षात येते. न्यायव्यवस्थेचा पाया कमकुवत होण्यास स्वार्थीवृत्तीने आपल्या पेशामध्ये काम करण्याची प्रवृत्तीच जबाबदार आहे. विलंबाशिवाय न्याय हवा असेल तर प्रत्येकाला ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदनुसार प्रामाणिक राहून पेशानुसार कर्तव्य पार पाडावे लागेल, असे जायभावे म्हणाले.भारतीय न्यायव्यवस्थेत दिवाणी खटल्याचे वय २६ तर फौजदारी खटल्याचे वय २० वर्ष इतके आहे तर अनुक्रमे परदेशात अवघे ३ व ४ वर्षे इतकेच आहे. यावरून भारतीय न्यायव्यवस्थेची अवस्था लक्षात येते. त्यामुळे सर्वसामान्यांची मानसिकता ‘न्यायालयात जायला नको’, ‘न्यायालयात जायचे कशाला, पुढील तारीख घ्यायला’ अशी होते. वकिलांपासून पोलिसांपर्यंत प्रत्येकाने सत्य शोधण्याच्या प्रक्रि येत आपला सहभाग मानून आपल्या भूमिकेला न्याय दिल्यास न्यायव्यवस्था अधिकाधिक बळकट होण्यास वेळ लागणार नाही.

टॅग्स :Courtन्यायालयadvocateवकिल