शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

न्यायव्यवस्था सत्य शोधण्याची प्रक्रिया : जयंत जायभावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:42 IST

सत्य शोधण्याची प्रक्रिया म्हणजे न्यायव्यवस्था आहे, याची जाणीव वकिलांपासून न्यायाधीशांपर्यंत आणि पक्षकारापासून पोलिसांपर्यंत सर्वांनी ठेवणे काळाची गरज आहे. मात्र दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही.

नाशिक : सत्य शोधण्याची प्रक्रिया म्हणजे न्यायव्यवस्था आहे, याची जाणीव वकिलांपासून न्यायाधीशांपर्यंत आणि पक्षकारापासून पोलिसांपर्यंत सर्वांनी ठेवणे काळाची गरज आहे. मात्र दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही. परिणामी न्यायव्यवस्थेचा पाया दिवसेंदिवस कमकुवत होऊ लागला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी केले.संवाद नाशिक या संस्थेच्या वतीने कुसुमाग्रज स्मारकात ‘न्याय मिळण्यास विलंब का होतो’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी जायभावे म्हणाले, यांत्रिक मानसिकतेतून कायद्याची निर्मिती जेव्हा होते तेव्हा समाजाच्या परिस्थितीचे प्रतिबिंब प्रत्येक घटक व पेशामध्ये उमटते. नैतिक दृष्ट्या बघितले तर खटल्यांना विलंब का होतो, तर प्रामाणिकपणा कुठे तरी कमी पडत आहे, हे यामागील निश्चित कारण लक्षात येते. न्यायव्यवस्थेचा पाया कमकुवत होण्यास स्वार्थीवृत्तीने आपल्या पेशामध्ये काम करण्याची प्रवृत्तीच जबाबदार आहे. विलंबाशिवाय न्याय हवा असेल तर प्रत्येकाला ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदनुसार प्रामाणिक राहून पेशानुसार कर्तव्य पार पाडावे लागेल, असे जायभावे म्हणाले.भारतीय न्यायव्यवस्थेत दिवाणी खटल्याचे वय २६ तर फौजदारी खटल्याचे वय २० वर्ष इतके आहे तर अनुक्रमे परदेशात अवघे ३ व ४ वर्षे इतकेच आहे. यावरून भारतीय न्यायव्यवस्थेची अवस्था लक्षात येते. त्यामुळे सर्वसामान्यांची मानसिकता ‘न्यायालयात जायला नको’, ‘न्यायालयात जायचे कशाला, पुढील तारीख घ्यायला’ अशी होते. वकिलांपासून पोलिसांपर्यंत प्रत्येकाने सत्य शोधण्याच्या प्रक्रि येत आपला सहभाग मानून आपल्या भूमिकेला न्याय दिल्यास न्यायव्यवस्था अधिकाधिक बळकट होण्यास वेळ लागणार नाही.

टॅग्स :Courtन्यायालयadvocateवकिल