शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

गळक्या बसेसचा प्रवास काही संपेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:16 IST

नाशिक : एस.टी. बसेसच्या छतावरून पावसाचे पाणी गळत असल्याच्या तक्रारी पावसाळ्यात वाढतात. त्यामुळे अशा बससेची डागडुजी करण्याची वेळ येते. ...

नाशिक : एस.टी. बसेसच्या छतावरून पावसाचे पाणी गळत असल्याच्या तक्रारी पावसाळ्यात वाढतात. त्यामुळे अशा बससेची डागडुजी करण्याची वेळ येते. दर पावसाळ्यात गळक्या बसेसवर बाऊस्टिक कंपाऊंड आणि वेदरस्ट्रीपचा वापर करावा लागतो. परंतु, पुढील पावसाळ्यात पुन्हा बसेस गळू लागतात आणि पुन्हा त्यावर खर्च होतो. गळक्या बसेसचा प्रवास असाच दरवर्षी सुरू राहतो.

राज्य परिवहन महामंहळाच्या बसेसच्या बाबतीतील हा अनुभव नित्याचाच झाला आहे. सर्वच बसेस गळक्या नसल्या तरी ज्या बसेसला अशी अडचण येथे, तेथे कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज आहे. जेथे पत्र्याचा जॉईंट आहे, तेथे शक्यतो गळण्याची शक्यता अधिक असते किंवा रिबिट मारलेल्या होलमधून पाणी बसमध्ये शिरते. अशावेळी उपायोजना करावी लागते.

पावसाळ्यात एस.टी. बसच्या टपावर चकाकणारे सिल्व्हर कव्हर दिसते, त्याला वेदरस्ट्रीप असे म्हणतात, तर काळ्या रंगाचा डांबरासारखा दिसणारा पदार्थ हा बाऊस्टिक कंपाऊंड असतो. गळतीच्या ठिकाणी या साहित्याचे लेपण केल्यास गळकी बस दुरुस्त होते. बस गळणाऱ्या ठिकाणी हे काळजीपूर्वक लावले तर बसची गळती थांबविणे शक्य होते. अन्यथा अनेकदा बसच्या आतील भागातूनही पट्टी लावावी लागते.

--इन्फो--

बस गळत असल्याची तक्रार चालकाकडून प्राप्त झाल्यानंतर अशा बसवर आवश्यकतेनुसार वेदरस्ट्रीप तसेच बाऊस्टिक कंपाऊंड करण्याबाबतचा निर्णय घेतला जातो. पावसाळ्यापूर्वी शक्यतो गाड्यांवर अशी डागडुजी केली जाते. पावसात या उपायोजना करता येत नाहीत. पाऊस नसताना गाड्यांवर ही मलमपट्टी केली जाते.

--इन्फेा--

गाड्यांचा मेंटेनन्स वाढला, पण पैसा नाही

१) मर्यादित बसेस आणि प्रवासी संख्या कमी असल्याने महामंडळाला तोट्यात प्रवासी वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे साहजिकच उत्पन्न कमी असल्याने काटकसर करावी लागत आहे.

२) जवळपास ४० टक्के उत्पन्न कमी मिळत असल्यामुळे डिझेलची उधारी ठेवून प्रवासी वाहतूक करण्याची वेळ आलेली आहे. खर्चात काटकसरीचे धोरण स्वीकारण्यात आले आहे.

३) गळक्या बसेस यंदाही कायम असल्या तरी त्यांचे प्रमाण गेल्या दोन वर्षांपासून कमी झालेले दिसते. केवळ यंदा संपूर्ण शीट बसवर टाकण्याची वेळ आलेली नाही, तर जॉइंट बुजविण्यात आले आहे.

--इन्फो--

पूर्वीपेक्षा बरी परिस्थिती

पावसाळ्यात गळक्या बसमुळे अक्षरश: पावसाची धार बसमध्ये लागत होती. परंतु, अलीकडच्या बसेस चांगल्या असल्यामुळे यंदा तसा अनुभव आलेला नाही किंवा असे काही ऐकिवातही नाही. बसेस चांगल्या दर्जाच्या असल्याने प्रवासाची अडचणही जाणवत नाही.

- दीपक आदमाने, प्रवासी

पूर्वीसारख्या बसेस राहिलेल्या नाहीत. पूर्वी गळणाऱ्या बसेस तसेच खिडकीतून पावसाचे पाणी आतमध्ये येत होते. सेमी लक्झरी बसेस ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्यामुळे गळक्या बसेस राहिलेल्या नाहीत.

- अर्जुन बाविस्कर, प्रवासी

220821\22nsk_22_22082021_13.jpg

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस गळत असल्याने त्यांच्यावर वेदरस्ट्रीप टाकून डागडुजी केली जाते. जॉइंटच्या ठिाकाणी बाऊस्टिक करण्यात आले आहे.