शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक मदतीच्या योजनांपेक्षा हवी नोकरीची शाश्वती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:36 IST

नाशिक : जन्मत:च असलेले अपंगत्व असो, की अपघाताने आलेल्या शारीरिक मर्यादा. शालेय शिक्षणापासून ते रोजगारपर्यंतच्या प्रवासात दिव्यांगांना अनेक दिव्यातून ...

नाशिक : जन्मत:च असलेले अपंगत्व असो, की अपघाताने आलेल्या शारीरिक मर्यादा. शालेय शिक्षणापासून ते रोजगारपर्यंतच्या प्रवासात दिव्यांगांना अनेक दिव्यातून जावे लागते. शिक्षणाच्या मर्यादा, त्यातून समाजाचे झालेले दुर्लक्ष, नोकरीच्या कमी संधी यामुळे तर दिव्यांगांसमोर जीवन जगण्याचा मोठा प्रश्न उभा राहातो. रोजगार नसल्याने विवाहाचा सामाजिक प्रश्न कायम आहेच. दिव्यांगांसाठीच्या आर्थिक योजनांमुळे काही प्रमाणात हातभाार लागला असला तरी नोकरीची हमीच नसल्याने सामाजिकस्तर कधी सुधारणार, ही खंत दिव्यांगांमध्ये दिसते.

दिव्यांगांना सक्षम करण्याच्यादृष्टीने शासकीय पातळीवर अनेक योजना आहेत. आर्थिक लाभाच्या योजनांमुळे त्यांच्या कुटुंबाला काही प्रमाणात हातभार नक्कीच लागला आहे, मात्र कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न मिटलेला नाही. अजूनही मिळेल ते काम त्यांना करावे लागते. अगरबत्ती, मेणबत्ती बनविणे, लिफ्टमन, एखादी टपरी चालविणे , खेळणी विकणे अशा प्रकारची कामे करण्याची वेळ दिव्यांगांवर आलेली आहे. आर्थिक मदतीचा ओघ हा शासकीय पातळीवरून होत असला तरी ती मदत निव्वळ दिलासा आहे. त्यातून काही प्रमाणात पोट भरेलही; परंतु नोकरीची चिंता मिटणारी नाही. त्यामुळे दिव्यांगांसाठी अधिकार कायदा झाला असला तरी आता दिव्यांग रोजगार कायदा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खासगी आस्थापना असोत, की निमशासकीय दिव्यांगांना प्रत्येक आस्थापनांमध्ये रोजगाराचा हक्क मिळावा यासाठी कायद्यात बदल करण्यासाठीची मागणी होऊ लागली आहे. नोकरी मिळाल्यामुळे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्यामुळे इतर योजनांवरील खर्च करण्याची शासनालाही गरज पडणार नाही.

--कोट--

सामाजिक दर्जा मिळावा

दिव्यांगांचे कष्ट कमी झालेले नाहीत. त्यांचा सामाजिकस्तर अजूनही उंचावलेला नाही. अधिकार मिळालेत, मात्र सामाजिक दर्जा मिळालेला नाही. नोकरी मिळाली त्यांच्या जीवनशैलीत बदल होऊ शकेल. विवाहाचा प्रश्न मिटून सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकेल. मदतीपेक्षा रोजगाराची हमी मिळायला हवी.

--बबलू मिर्झा, अध्यक्ष, दिव्यांग कल्याण संघटना