शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
7
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
8
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
9
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
10
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
11
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
12
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
13
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
14
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
15
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
16
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
17
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
18
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
19
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
20
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले

ज्येष्ठ लेखिका जयश्री खिरे यांचे निधन

By admin | Updated: July 29, 2016 00:41 IST

ज्येष्ठ लेखिका जयश्री खिरे यांचे निधन

नाशिक : येथील प्रसिद्ध लेखिका, कादंबरीकार प्रा. जयश्री दिगंबर खिरे (८१) यांचे गुरुवारी सकाळी ८ वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या रूपाने शहरातील चतुरस्र साहित्यिक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.खिरे या गेल्या दोन वर्षांपासून आजारी होत्या. तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. अखेर गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती दिगंबर खिरे आहेत. सन १९३५ मध्ये मुंबईत जन्मलेल्या खिरे यांनी मराठीत एमए केले होते. विवाहानंतर त्या नाशिकला स्थायिक झाल्या. त्यांनी काही काळ केटीएचएम महाविद्यालयात अध्यापन केले. अमृत, सत्यकथा, स्त्री, माहेर, राजहंस, माणूस यांसारख्या प्रतिष्ठित नियतकालिकांत त्यांनी सातत्याने लेखन केले. हिरवे क्षण, मोतिया, तरंग हे त्यांचे कथासंग्रह, काचरंग, काहिली, धुव्वाधार, वादळडोळा, मनमोगरी, उन्हातली घरे या कादंबऱ्या, रंगरेषा हे ललित लेखांचे पुस्तक, व.. व.. वाघाचा, रथाचा सारथी ही बालनाट्ये असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे. पैकी सन १९८९ मध्ये वादळडोळा, तर सन २००० मध्ये रंगरेषा या त्यांच्या पुस्तकाला राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा पुरस्कार लाभला होता. त्यांच्या काही कथांचे जर्मन भाषेतही अनुवाद झाले. सार्वजनिक वाचनालय, संवाद या संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. सन २००६ मध्ये झालेल्या सावानाच्या ३९ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या त्या अध्यक्षा होत्या. ‘साहित्य रसिका’ या संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाम येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)