शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

ज्येष्ठ लेखिका जयश्री खिरे यांचे निधन

By admin | Updated: July 29, 2016 00:41 IST

ज्येष्ठ लेखिका जयश्री खिरे यांचे निधन

नाशिक : येथील प्रसिद्ध लेखिका, कादंबरीकार प्रा. जयश्री दिगंबर खिरे (८१) यांचे गुरुवारी सकाळी ८ वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या रूपाने शहरातील चतुरस्र साहित्यिक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.खिरे या गेल्या दोन वर्षांपासून आजारी होत्या. तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. अखेर गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती दिगंबर खिरे आहेत. सन १९३५ मध्ये मुंबईत जन्मलेल्या खिरे यांनी मराठीत एमए केले होते. विवाहानंतर त्या नाशिकला स्थायिक झाल्या. त्यांनी काही काळ केटीएचएम महाविद्यालयात अध्यापन केले. अमृत, सत्यकथा, स्त्री, माहेर, राजहंस, माणूस यांसारख्या प्रतिष्ठित नियतकालिकांत त्यांनी सातत्याने लेखन केले. हिरवे क्षण, मोतिया, तरंग हे त्यांचे कथासंग्रह, काचरंग, काहिली, धुव्वाधार, वादळडोळा, मनमोगरी, उन्हातली घरे या कादंबऱ्या, रंगरेषा हे ललित लेखांचे पुस्तक, व.. व.. वाघाचा, रथाचा सारथी ही बालनाट्ये असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे. पैकी सन १९८९ मध्ये वादळडोळा, तर सन २००० मध्ये रंगरेषा या त्यांच्या पुस्तकाला राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा पुरस्कार लाभला होता. त्यांच्या काही कथांचे जर्मन भाषेतही अनुवाद झाले. सार्वजनिक वाचनालय, संवाद या संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. सन २००६ मध्ये झालेल्या सावानाच्या ३९ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या त्या अध्यक्षा होत्या. ‘साहित्य रसिका’ या संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाम येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)