शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

जयदर : वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी, महावितरण अधिकाºयांना निवेदन आदिवासी शेतकºयांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:19 IST

कळवण : कनाशी येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत अभियंत्यांनी आश्वासन देत या भागातील वीज वितरण समस्या मार्चअखेरीस मार्गी लावण्याचा शब्द दिल्यानंतर आदिवासी शेतकºयांनी मांडलेला ठिय्या मागे घेण्यात आला.

ठळक मुद्देशेती व्यवसाय धोक्यात आलाबैठकीत तासभर ठिय्या

कळवण : कनाशी येथील १३२ केव्ही केंद्रासह पिंपळे येथील प्रस्तावित वीज उपकेंद्र, जयदर येथे पाच एमव्हीएच्या रोहित्रासह जयदर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी आश्वासन देत या भागातील वीज वितरण समस्या मार्चअखेरीस मार्गी लावण्याचा शब्द महावितरणच्या यंत्रणेने दिल्यानंतर जयदर परिसरातील वीज समस्या संदर्भातील बैठकीत आदिवासी शेतकºयांनी मांडलेला ठिय्या मागे घेण्यात आला. जयदर परिसरातील आदिवासी गावे, खेडी, पाडे व वस्त्यांवरील वीजपुरवठा सुरळीत नाही. विजेच्या खेळखंडोब्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला असून, जयदर परिसरातील वीज समस्यांबाबत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, महावितरणचे कार्यकारी अभियंता टेंभुर्णे, उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार, पंचायत समिती उपसभापती विजय शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समिती सदस्य लाला जाधव, अर्जुन बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. जयदर परिसरात पाणी असूनही विजेअभावी पिकांना देता येत नसल्याने आदिवासी शेतकरीबांधवांनी आक्रमक भूमिका घेऊन या समस्येसंदर्भात बैठकीत तासभर ठिय्या मांडला व विजेच्या समस्या यंत्रणेसमोर कथन केल्या. शेतीला लागणारे पाणी विजेवर अवलंबून आहे. वीजपुरवठा वेळेवर मिळत नसल्याने व सततच्या होणाºया भारनियमनामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेती व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. वीज ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेत न मिळता केव्हाही येते आणि केव्हाही जाते. त्यामुळे जयदर परिसरातील शेती व्यवसायाचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. शेतीला पुरेसे पाणी विजेअभावी देता येत नाही. मात्र वीज वितरण कंपनी शेतकºयांकडून १०० टक्के वीजबिल वसुली करते. मात्र वीजपुरवठा सुरळीत करत नसल्याने जयदर परिसरातील आदिवासी शेतकरी बांधवांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली. बैठकीस रामदास चव्हाण, मन्साराम गायकवाड, अर्जुन बागुल, तुळशीराम चौधरी, पंडित गांगुर्डे, हिरामण पालवी, आनंदा पालवी, पोपट गायकवाड, पांडुरंग गायकवाड, रामा पवार, गुलाब चौधरी, रतन बर्डे, पप्पू चव्हाण, उत्तम भोये, धवळू चौरे, भावडू बर्डे, कृष्णा बर्डे, हिरामण पवार, शिवाजी पवार, पांडुरंग देशमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रघू महाजन यांनी केले.