शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जयदर : वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी, महावितरण अधिकाºयांना निवेदन आदिवासी शेतकºयांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:19 IST

कळवण : कनाशी येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत अभियंत्यांनी आश्वासन देत या भागातील वीज वितरण समस्या मार्चअखेरीस मार्गी लावण्याचा शब्द दिल्यानंतर आदिवासी शेतकºयांनी मांडलेला ठिय्या मागे घेण्यात आला.

ठळक मुद्देशेती व्यवसाय धोक्यात आलाबैठकीत तासभर ठिय्या

कळवण : कनाशी येथील १३२ केव्ही केंद्रासह पिंपळे येथील प्रस्तावित वीज उपकेंद्र, जयदर येथे पाच एमव्हीएच्या रोहित्रासह जयदर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी आश्वासन देत या भागातील वीज वितरण समस्या मार्चअखेरीस मार्गी लावण्याचा शब्द महावितरणच्या यंत्रणेने दिल्यानंतर जयदर परिसरातील वीज समस्या संदर्भातील बैठकीत आदिवासी शेतकºयांनी मांडलेला ठिय्या मागे घेण्यात आला. जयदर परिसरातील आदिवासी गावे, खेडी, पाडे व वस्त्यांवरील वीजपुरवठा सुरळीत नाही. विजेच्या खेळखंडोब्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला असून, जयदर परिसरातील वीज समस्यांबाबत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, महावितरणचे कार्यकारी अभियंता टेंभुर्णे, उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार, पंचायत समिती उपसभापती विजय शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समिती सदस्य लाला जाधव, अर्जुन बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. जयदर परिसरात पाणी असूनही विजेअभावी पिकांना देता येत नसल्याने आदिवासी शेतकरीबांधवांनी आक्रमक भूमिका घेऊन या समस्येसंदर्भात बैठकीत तासभर ठिय्या मांडला व विजेच्या समस्या यंत्रणेसमोर कथन केल्या. शेतीला लागणारे पाणी विजेवर अवलंबून आहे. वीजपुरवठा वेळेवर मिळत नसल्याने व सततच्या होणाºया भारनियमनामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेती व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. वीज ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेत न मिळता केव्हाही येते आणि केव्हाही जाते. त्यामुळे जयदर परिसरातील शेती व्यवसायाचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. शेतीला पुरेसे पाणी विजेअभावी देता येत नाही. मात्र वीज वितरण कंपनी शेतकºयांकडून १०० टक्के वीजबिल वसुली करते. मात्र वीजपुरवठा सुरळीत करत नसल्याने जयदर परिसरातील आदिवासी शेतकरी बांधवांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली. बैठकीस रामदास चव्हाण, मन्साराम गायकवाड, अर्जुन बागुल, तुळशीराम चौधरी, पंडित गांगुर्डे, हिरामण पालवी, आनंदा पालवी, पोपट गायकवाड, पांडुरंग गायकवाड, रामा पवार, गुलाब चौधरी, रतन बर्डे, पप्पू चव्हाण, उत्तम भोये, धवळू चौरे, भावडू बर्डे, कृष्णा बर्डे, हिरामण पवार, शिवाजी पवार, पांडुरंग देशमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रघू महाजन यांनी केले.