शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

जयदर : वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी, महावितरण अधिकाºयांना निवेदन आदिवासी शेतकºयांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:19 IST

कळवण : कनाशी येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत अभियंत्यांनी आश्वासन देत या भागातील वीज वितरण समस्या मार्चअखेरीस मार्गी लावण्याचा शब्द दिल्यानंतर आदिवासी शेतकºयांनी मांडलेला ठिय्या मागे घेण्यात आला.

ठळक मुद्देशेती व्यवसाय धोक्यात आलाबैठकीत तासभर ठिय्या

कळवण : कनाशी येथील १३२ केव्ही केंद्रासह पिंपळे येथील प्रस्तावित वीज उपकेंद्र, जयदर येथे पाच एमव्हीएच्या रोहित्रासह जयदर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी आश्वासन देत या भागातील वीज वितरण समस्या मार्चअखेरीस मार्गी लावण्याचा शब्द महावितरणच्या यंत्रणेने दिल्यानंतर जयदर परिसरातील वीज समस्या संदर्भातील बैठकीत आदिवासी शेतकºयांनी मांडलेला ठिय्या मागे घेण्यात आला. जयदर परिसरातील आदिवासी गावे, खेडी, पाडे व वस्त्यांवरील वीजपुरवठा सुरळीत नाही. विजेच्या खेळखंडोब्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला असून, जयदर परिसरातील वीज समस्यांबाबत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, महावितरणचे कार्यकारी अभियंता टेंभुर्णे, उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार, पंचायत समिती उपसभापती विजय शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समिती सदस्य लाला जाधव, अर्जुन बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. जयदर परिसरात पाणी असूनही विजेअभावी पिकांना देता येत नसल्याने आदिवासी शेतकरीबांधवांनी आक्रमक भूमिका घेऊन या समस्येसंदर्भात बैठकीत तासभर ठिय्या मांडला व विजेच्या समस्या यंत्रणेसमोर कथन केल्या. शेतीला लागणारे पाणी विजेवर अवलंबून आहे. वीजपुरवठा वेळेवर मिळत नसल्याने व सततच्या होणाºया भारनियमनामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेती व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. वीज ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेत न मिळता केव्हाही येते आणि केव्हाही जाते. त्यामुळे जयदर परिसरातील शेती व्यवसायाचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. शेतीला पुरेसे पाणी विजेअभावी देता येत नाही. मात्र वीज वितरण कंपनी शेतकºयांकडून १०० टक्के वीजबिल वसुली करते. मात्र वीजपुरवठा सुरळीत करत नसल्याने जयदर परिसरातील आदिवासी शेतकरी बांधवांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली. बैठकीस रामदास चव्हाण, मन्साराम गायकवाड, अर्जुन बागुल, तुळशीराम चौधरी, पंडित गांगुर्डे, हिरामण पालवी, आनंदा पालवी, पोपट गायकवाड, पांडुरंग गायकवाड, रामा पवार, गुलाब चौधरी, रतन बर्डे, पप्पू चव्हाण, उत्तम भोये, धवळू चौरे, भावडू बर्डे, कृष्णा बर्डे, हिरामण पवार, शिवाजी पवार, पांडुरंग देशमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रघू महाजन यांनी केले.