शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जयंत आव्हाड यांचा मनसे सदस्यत्वाचाही राजीनामा

By admin | Updated: July 30, 2014 00:22 IST

राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र : कार्यकर्त्यांची कोंडी

सिन्नर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अडीच वर्षे तालुकाध्यक्ष भूषविलेल्या जयंत आव्हाड यांनी गेल्या महिन्यात अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाच्या धोरणावर व राज ठाकरे यांच्या दुटप्पीपणावर टीकास्त्र सोडत पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.सुमारे अडीच वर्षापूर्वी आव्हाड यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांची सोबत सोडत मनसेत प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून त्यांची उमेदवारी गृहीत धरली जात होती. तथापि, लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारास सिन्नर तालुक्यातून मिळालेली मते पाहिल्यानंतर त्यांनी गेल्या महिन्यात तालुकाध्यक्षपदाचा व आज पक्षाचा सभासदत्वाचा राजीनामा दिला.शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे बोलत नसल्याचे तसेच विकासाची ब्लू प्रिंट आपल्याकडे असल्याची वल्गना करणाऱ्या ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे कधीही ऐकून घेतले नसल्याचे आव्हाड यांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वीच मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी स्तुतिसुमने उधळणारे राज ठाकरे कधी मोदी यांच्यावर टीका करतात तर कधी आपण मोदी यांच्याविरोधात काहीच बोललो नाही असे म्हणतात. राज ठाकरे यांच्या दुटप्पी धोरणामुळे कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. राज ठाकरे कॉँग्रेस व राष्ट्रवादी विरोधात काहीही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष म्हणजे कॉँग्रेस पक्षाची बी टीम असल्याची धारणा लोकांमध्ये निर्माण झाल्याचे आव्हाड यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह पक्षाचा राजीनामा देत असल्याचे आव्हाड यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. (वार्ताहर)