शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जायकवाडीचा प्रश्न : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच बरखास्त करा, खासदार हेमंत गोडसेंची मागणी

By संजय पाठक | Updated: November 22, 2023 10:21 IST

जायकवाडी धरणाला पाणी देण्यास नाशिककरांचा विरोध नाही, मात्र यंदा नाशिक जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे.

नाशिक - मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्याच्या विषयावर मेंढेगिरी समितीची शिफारस आता कालबाह्य झाली असून या समितीच्या शिफारशीनुसारच व्यावहारिक बदल तसेच आकडेवारीची परिपूर्ण माहिती महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे नाही त्यामुळे सदोष कामकाज करणारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच बरखास्त करण्याची मागणी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी केली आहे.

जायकवाडी धरणाला पाणी देण्यास नाशिककरांचा विरोध नाही, मात्र यंदा नाशिक जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.  जायकवाडी धरणातील  मृतसाठ्यापैकी सहा टीएमसी पाणी हे याच धरणातून वापरावे अशी नाशिककारांची मागणी आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाल्यावर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या आदेशास स्थगिती देण्यास नकार देण्यात आला त्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकारणाची  कार्यपद्धती सदोष असून नाशिक जिल्ह्यातील  धरणातील साठ्याची आकडेवारीबाबत दिशाभूल केली जात असल्यामुळे ते बरखास्त करावे त्याऐवजी निवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करावी अशी सूचनाही गोडसे यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अमृता पवार यांनी आता या प्राधिकरणाच्या विरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी उच्च न्यायालयात यापूर्वी याचिका दाखल केली होती त्यावेळी उच्च न्यायालयाने नाशिकच्या वाढत्या लोकसंख्येच्या आधारे अभ्यास तयार करून निर्णय घ्यावा आणि मगच धोरण ठरवावे अशी सूचना केली होती मात्र, या आदेशाची  कार्यवाही झालेली नाही त्यामुळे अवमान दाखल करण्यात येणार असल्याचे अमृता पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Hemant Godseहेमंत गोडसेJayakwadi Damजायकवाडी धरण