शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

नाशिक जिल्ह्यातील जवानाची काश्मीरमध्ये पत्नीसह हत्या गावावर कोसळला दु:खाचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:25 IST

हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नोकरी मिळवून स्थिरस्थावर झालेल्या राजेंद्र केकाणे याच्या मृत्यूच्या बातमीने गावकºयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला.

ठळक मुद्देमजुरीच्या पैशांतून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण भरतीत राजेंद्रचे नोकरीचे स्वप्न पूर्ण आर्यन व अनुष्का ही दोन मुले

नायगाव : हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नोकरी मिळवून स्थिरस्थावर झालेल्या राजेंद्र केकाणे याच्या मृत्यूच्या बातमीने गावकºयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. बातमी कळल्यानंतर सारा गाव अक्षरश: सुन्न झाला.घरची परिस्थती हलाखीची असल्याने राजेंद्रने ठाणगाव येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो शेतात मजुरीचे काम करू लागला. मजुरीच्या पैशांतून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याचे मूळगाव सिन्नर तालुक्यातील टेंभुरवाडी असले तरी राजेंद्रचे आयुष्य तालुक्यातील चिंचोली येथे मामांकडेच गेले. आईच्या निधनानंतर घरातील सर्व जबाबदारी राजेंद्रवरच होती. याच वेळी गावातील संदीप सानप या मित्राच्या बरोबरीने नोकरी शोधत असतांना तो मुंबई (चेंबूर ) येथील सीआईएसएफच्या भरतीला गेला. भरतीत राजेंद्रचे नोकरीचे स्वप्न पूर्ण झाले. सन २००८ मध्ये डेहराडून येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राजेंद्र नोकरीत दाखल झाला. २०११ मध्ये राजेंद्र याचा विवाह संगमनेर तालुक्यातील क-हे - निमोण येथील शोभा हिच्याशी विवाह झाला. त्यांना आर्यन व अनुष्का ही दोन मुले झाली. सर्व काही सरळीत सुरू होते. दहा- बारा दिवसांपूर्वीच राजेंद्र सहकुटूंब गावी येऊन गेला होता. बुधवारी पहाटे राजेंद्र व त्याची पत्नी जखमी झाल्याचे वृत्त गावात येताच संपूर्ण केकाणे कुटुंबाबरोबर चिंचोली गावावर दु:खाचा डोंगरच कोसळला.राजेंद्र याने छोटा भाऊ गणेशचे शिक्षण पूर्ण केले. गणेशलाही मोठ्या भावाप्रमाणे देशसेवेची इच्छा असल्याने त्यानेही सैन्य भरतीसाठी जाण्याचे ठरवले. २०१२च्या सैन्य भरतीत गणेशही सैन्य दलात दाखल झाला. दोघेही कमावते झाल्याने चिंचोली येथेच त्यांनी स्वत:चे घर उभे केले.