शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सुकाणू समितीची आजपासून जनजागरण यात्रा

By admin | Updated: July 10, 2017 01:06 IST

नाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सुकाणू समितीच्या माध्यमातून लढ्याच्या टप्प्यात जनजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी नाशिकमधून सुकाणू समितीच्या माध्यमातून उभा राहिलेल्या लढ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यव्यापी जनजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सुरुवातही नाशिकमधूनच होणार असल्याने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष नाशिक येथील तूपसाखरे लॉन्स येथे होणाऱ्या शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेकडे लागले आहे. शेतकरी एल्गार सभेनंतर सुकाणू समितीतर्फे राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरू करण्यात येणार असून, सोमवारी (दि.१०) राज्यभरातील सर्व शेतकरी संघटना या जनजागरण यात्रेत सहभागी होणार आहेत. सुकाणू समिती संपूर्ण राज्याचा दौरा करीत राज्यभरात १४ ठिकाणी जाहीर सभांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनजागृती करणार आहे. सुकाणू समितीकडून राज्य सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याचे सांगितले जात असून, या फसवणुकीविरोधात जनजागृती यात्रेतून शेतकऱ्यांना वास्तविकतेविषयी अवगत करण्यात येणार आहे. शेतकरी संप व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. प्रत्यक्षात मात्र अत्यंत जाचक अटी लावण्यात आल्या. केवळ थकबाकीदार शेतकऱ्यांचेच कर्जमाफी करण्याची भूमिका घेण्यात आली. कर्जमाफी रकमेसाठी दीड लाखांची मर्यादा लावण्यात आली. थकितसाठी ३० जून २०१७ ची अट घालण्यात आली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले. पॉलीहाउस, सिंचन, शेडनेट, इमूपालन आदींसाठी घेतलेल्या कर्जांना कर्जमाफीतून वगळण्यात आले. चुकीच्या व फसवणूक करणाऱ्या आकड्यांच्या आधारे जनतेची दिशाभूल करण्यात आली. वारंवार शासनादेश काढून व भूमिका बदलून कर्जमाफीचा पोरखेळ केला गेला. शेतकऱ्यांना जखमांवर मीठ चोळणारी विधाने करण्यात आल्याचे आरोप शेतकरी आंदोलनातील सुकाणू समितीच्या सदस्यांनी केले असून, जनजागरण यात्रेत शेतकऱ्यांच्या मनातील या भावना समजून घेऊन लढ्याची पुढील रणनीती ठरविली जाणार असल्याची माहिती सुकाणू समितीचे समन्वयक अजित नवले यांनी दिली.