शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

सुकाणू समितीची आजपासून जनजागरण यात्रा

By admin | Updated: July 10, 2017 01:06 IST

नाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सुकाणू समितीच्या माध्यमातून लढ्याच्या टप्प्यात जनजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी नाशिकमधून सुकाणू समितीच्या माध्यमातून उभा राहिलेल्या लढ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यव्यापी जनजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सुरुवातही नाशिकमधूनच होणार असल्याने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष नाशिक येथील तूपसाखरे लॉन्स येथे होणाऱ्या शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेकडे लागले आहे. शेतकरी एल्गार सभेनंतर सुकाणू समितीतर्फे राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरू करण्यात येणार असून, सोमवारी (दि.१०) राज्यभरातील सर्व शेतकरी संघटना या जनजागरण यात्रेत सहभागी होणार आहेत. सुकाणू समिती संपूर्ण राज्याचा दौरा करीत राज्यभरात १४ ठिकाणी जाहीर सभांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनजागृती करणार आहे. सुकाणू समितीकडून राज्य सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याचे सांगितले जात असून, या फसवणुकीविरोधात जनजागृती यात्रेतून शेतकऱ्यांना वास्तविकतेविषयी अवगत करण्यात येणार आहे. शेतकरी संप व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. प्रत्यक्षात मात्र अत्यंत जाचक अटी लावण्यात आल्या. केवळ थकबाकीदार शेतकऱ्यांचेच कर्जमाफी करण्याची भूमिका घेण्यात आली. कर्जमाफी रकमेसाठी दीड लाखांची मर्यादा लावण्यात आली. थकितसाठी ३० जून २०१७ ची अट घालण्यात आली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले. पॉलीहाउस, सिंचन, शेडनेट, इमूपालन आदींसाठी घेतलेल्या कर्जांना कर्जमाफीतून वगळण्यात आले. चुकीच्या व फसवणूक करणाऱ्या आकड्यांच्या आधारे जनतेची दिशाभूल करण्यात आली. वारंवार शासनादेश काढून व भूमिका बदलून कर्जमाफीचा पोरखेळ केला गेला. शेतकऱ्यांना जखमांवर मीठ चोळणारी विधाने करण्यात आल्याचे आरोप शेतकरी आंदोलनातील सुकाणू समितीच्या सदस्यांनी केले असून, जनजागरण यात्रेत शेतकऱ्यांच्या मनातील या भावना समजून घेऊन लढ्याची पुढील रणनीती ठरविली जाणार असल्याची माहिती सुकाणू समितीचे समन्वयक अजित नवले यांनी दिली.