शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

जंगलीदास महाराज भाविकांवर साधूंनी उगारल्या तलवारी

By admin | Updated: September 5, 2015 22:39 IST

साधुग्राममध्ये धुमश्चक्री : मिरवणूक काढण्यावरून वाद; पोलिसांच्या मदतीने टळला अनर्थ

नाशिक : शाहीमार्गावरून मिरवणूक काढण्याच्या आखाडा परिषदेच्या अधिकाराचा भंग करून मिरवणूक काढणाऱ्या जंगलीदास महाराज प्रणीत आत्मा मालिक ध्यानपीठाच्या भाविकांवर साधुग्राममधील साधू-महंतांनी हल्लाबोल केला. संतप्त साधूंनी मिरवणुकीतील वाहनाची तोडफोड करीत भाविकांवर लाठ्या, तलवारी उगारल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत आत्मा मालिक ध्यानपीठाची मिरवणूक अन्य मार्गाने वळवल्याने अनर्थ टळला. कुंभमेळ्यात यंदा प्रथमच कोकमठाण येथील विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम ट्रस्टच्या वतीने औरंगाबाद रोडवर आत्मा मालिक ध्यानपीठाची उभारणी करण्यात आली असून, या पीठाच्या वतीने शनिवारी दिंडी सोहळा व शाहीस्नान पर्वणीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दुपारी साधुग्राममधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूक साधुग्राममधून शाहीमार्गानेच गोदाघाटावर जाणार होती. विविध सुशोभित रथ व हजारो भाविकांचा समावेश असलेल्या या मिरवणुकीची रीतसर परवानगी पोलिसांकडून घेण्यात आली होती. तथापि, साधुग्राममधील शाहीमार्गावरून मिरवणूक काढण्याचा अधिकार व मान केवळ आखाडा परिषदेच्या साधू-महंतांनाच असून, २० आॅगस्ट ते १८ सप्टेंबर या कालावधीत या मार्गावरून कोणालाही मिरवणुकीची परवानगी देऊ नये, त्यासाठी आधी आखाडा परिषदेची परवानगी घ्यावी, अशा आशयाचे पत्र आखाड्यांनी आधीच पोलिसांना दिले होते. त्याला पोलिसांनी मान्यताही दिली होती; मात्र तरीही पोलिसांनीच आत्मा मालिक ध्यानपीठाच्या आजच्या मिरवणुकीला परवानगी दिल्याने सदर प्रसंग ओढावल्याचे वृत्त आहे.आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने दुपारी ३ च्या सुमारास इंद्रायणी लॉन्स येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. बॅण्ड, ढोल, झांज, लेजीम आदि अनेक पथकांचा समावेश असलेली ही मिरवणूक साधुग्राममधील दिगंबर अनी आखाड्या समोर जात होती. तेथे प्रमुख साधू-महंत जमले होते. मिरवणुकीच्या आवाजाने ते रस्त्यावर आले.

पळापळीने गोंधळ

संतप्त साधू-महंत मिरवणुकीवर चालून आल्याने भाविकांची एकच पळापळ झाली. नेमके काय झाले, हे कुणालाच कळेना. मिरवणुकीत लहान मुले, महिलांचाही समावेश होता. अचानक गोंधळ उडाल्याने अनेकांनी भीतीने जवळच्या खालशांमध्ये आश्रय घेतला. .. म्हणून विरोधसाधुग्राममधील मुख्य मार्गावरून आखाड्यांच्या परवानगीशिवाय मिरवणूक काढता येत नाही. तसे पत्र यापूर्वी पोलिसांना देण्यात आले आहे. तरी मिरवणूक काढण्यात आल्याने विरोध केला.- श्री महंत धरमदास, निर्वाणी आखाडानिर्वाणी आखाड्याचे श्री महंत धरमदास, निर्मोही आखाड्याचे श्री महंत राजेंद्रदास, दिगंबर आखाड्याचे श्री महंत कृष्णदास, महंत वैष्णवदास आदिंनी मिरवणूक थांबवून आत्मा मालिक ध्यानपीठाचे नंदकुमार सूर्यवंशी, मोहन शेलार, रवींद्र बागुल, भगवान दौंड, हनुमंत भोंगळे आदिंना मिरवणुकीच्या परवानगीबाबत विचारणा केली. त्यावर आपण पोलिसांची रीतसर परवानगी घेतल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले; मात्र सदर मार्गावर सध्या आखाड्यांचा अधिकार आहे, त्यावरून बॅण्डपथक व छत्र-चामरे, ध्वज उंचावून मिरवणूक काढण्यासाठी आखाड्यांची परवानगी घेणे आवश्यक असून, एकतर मिरवणूक अन्य मार्गाने वळवावी किंवा छत्र-चामरे, ध्वज खाली घेऊन गाजावाजा न करता मार्गक्रमण करावे, असे साधू-महंतांनी सांगितले. त्यावर एकमत होऊन मिरवणूक काहीशी पुढे सरकली; मात्र पुढे काही भाविकांनी छत्र-चामरे, ध्वज उंचावून जयघोष केल्याचे निदर्शनास येताच माघारी वळलेल्या साधू-महंतांनी संतप्त होऊन मिरवणूक रोखली व भाविकांना पुढे जाऊ देण्यास मज्जाव केला. अनेक साधू लाठ्या-काठ्या, तलवारी, कुऱ्हाडी, भाले आदि शस्त्रास्त्रे घेऊन आत्मा मालिक ध्यानपीठाच्या भाविकांवर चालून आले. काही भाविकांना धक्काबुक्की करीत मिरवणुकीतील एका वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत दोन्ही गटांची समजूत काढली. यावेळी साधू-महंतांनी त्यांच्याकडे असलेले मिरवणुकीचे अधिकारपत्र सादर केले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत मिरवणूक औरंगाबाद रोडमार्गे वळवली. पुढे गणेशवाडी, गौरी पटांगणावरून मिरवणूक शांततेत गोदाघाटावर मार्गस्थ झाली. तेथे भाविकांनी विधिवत पूजन व आत्मध्यान केल्यानंतर मिरवणुकीचा समारोप झाला. विश्वासात घ्यावेमिरवणुकीला परवानगी देताना पोलिसांनी तिन्ही अनी आखाड्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, तसेच आत्मा मालिक ध्यानपीठाने आखाड्यांची परवानगी घेणे आवश्यक होते. तसे न झाल्याने मिरवणूक पुढे जाऊ दिली नाही.- श्री महंत कृष्णदास, दिगंबर आखाडाचौकशी करू...साधुग्राममधील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. कोणाची तक्रार आल्यास तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. तथापि, दोन्ही बाजूंनी समजूतदार भूमिका घेऊन वाद टाळावा.- अविनाश बारगळ, पोलीस उपआयुक्तईर्षेतून घडलेला प्रकारआत्मा मालिक ध्यानपीठ हा शांततामय मार्गाने चालणारा पंथ असून, साधुग्राममध्ये घडल्या प्रकाराबद्दल काही बोलावयाचे नाही. मिरवणुकीतील हजारोंचा जनसमुदाय पाहून बहुधा काहींना ईर्षा निर्माण झाली असावी व त्यातून हा प्रकार घडला असावा.- हनुमंत भोंगळे, आत्मा मालिक ध्यानपीठ