शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जनस्थानमध्ये ‘जनआशीर्वाद यात्रा’ जोशात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:18 IST

नाशिक : आदिवासी नृत्याला ढोलताशांची साथ आणि चौकाचौकांत होणारे स्वागत, औक्षण आणि रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या पुष्पवर्षावात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ...

नाशिक : आदिवासी नृत्याला ढोलताशांची साथ आणि चौकाचौकांत होणारे स्वागत, औक्षण आणि रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या पुष्पवर्षावात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या ‘जनआशीर्वाद यात्रे’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पाथर्डी फाट्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरू झालेल्या या यात्रेची सांगता काळाराम मंदिरासमोर करण्यात आली.

पालघर येथून सुरू झालेल्या या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्र सरकारच्या माध्यमातून या समस्या सोडविण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असून, सामान्यांच्या प्रश्न दिल्ली दरबारी सोडविण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. जनआशीर्वादाच्या माध्यमातून सामान्यांशी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आहेत. जनआशीर्वाद यात्रा ही जनतेला समर्पित असल्याने त्यांच्या समस्या निश्चितपणे सुटतील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा शुभारंभ सायंकाळी पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाला. पाथर्डी फाटा येथून निघालेली जनआशीर्वाद यात्रा उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक, उंटवाडीमार्गे कॅनडा कॉर्नर, सीबीएस येथून रविवार कारंजामार्गे पंचवटी कारंजा येथे पोहोचली. एकूण १२ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत डॉ. पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा समारोप काळाराम मंदिर येथे झाला. या यात्रेदरम्यान, नाशिकचे प्रभारी माजी मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री सदाभाऊ खोत, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदर ॲड. राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, महेश हिरे, नगरसेविका हिमगौरी आडके आदी उपस्थित होते.

इन्फो

रांगोळी, फुगड्या, औक्षणाने स्वागत

पाथर्डी फाटा येथून सुरू झालेल्या जनआशीर्वाद यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी, सडा टाकण्यात आला होता. चौकाचौकांत सुवासिनींनी डॉ. भारती पवार यांचे औक्षण करीत नाशिककरांच्या प्रेमाचे दर्शन घडवले. रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या, दुतर्फा गॅलरींमध्ये उभे राहून कौतुकाने पुष्पवर्षाव करणाऱ्या जनतेला अभिवादन करत यात्रा पार पडली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. ढोलताशाच्या गजरात निघालेल्या जनआशीर्वाद यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वरुपात स्वागत करण्यात आले. उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक या परिसरात यात्रेचा जल्लोष मोठा होता. पंचवटी कारंजा येथे यात्रेच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. यात्रेच्या मार्गावर ठरावीक अंतराने वेगवेगळ्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. राष्ट्रभक्तीपर गीते आणि आदिवासी नृत्यामुळे जनआशीर्वाद यात्रा नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.