शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

जामनदी शेतकरी उत्पादक कंपनीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 18:03 IST

सिन्नर : युवा मित्र सामाजिक संस्था, सिन्नर व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने तीन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या वावी येथील ‘जामनदी खोरे शेतकरी उत्पादक कंपनी’चा ईरमा सामाजिक संस्था, नाबार्ड, एनसीडीईएक्स व आयटीसी यांच्या संयुक्त विद्यमाने गुजरातमधील आनंद जिल्ह्यात आयोजित ‘आध्यम’ या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात ‘शेतकरी उत्पादक कंपनीच्या भावी योजना’ या स्पर्धेत तृतीय क्र मांक पटकावल्याने गौरव करण्यात आला.

देशातील विविध राज्यातील शेतकरी उत्पादकांना जनतेशी जोडणे व त्यांना आवश्यक ते व्यवस्थापकीय आधार देऊन बळकट करणे या दृष्टीकोनातून ईरमा या संस्थेतर्फे सदर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी देशातील ९ राज्यांमधील १०० शेतकरी उत्पादक कंपनींनी सहभाग घेतला होता. यात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगना, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली, ओरिसा या राज्यातील कंपन्यांचा समावेश होता. यामधून अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या २३ कंपन्यांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय अशी निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी शेतकरी कंपन्यांकडून त्यांच्यापुढील पाच वर्षातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या शाश्वत योजनांचा अहवाल मागविण्यात आला होता. या अहवालांची तज्ज्ञांद्वारे पडताळणी करून अंतिम विजेत्यांची निवड करण्यात आली. यामध्ये वावी येथील युवा मित्र व नाबार्ड यांच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ‘जामनदी खोरे शेतकरी उत्पादक कंपनीने’ बाजी मारत तृतीय क्रमांक मिळविला. यासाठी कंपनीला ३० हजार रुपये रोख व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सदर पारितोषिक एनसीडीईएक्सचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक आर. रामासेशन यांच्या हस्ते जामनदी शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापक किशोर चिने यांनी स्वीकारले. सदर स्पर्धेसाठी या कंपनीला युवा मित्रचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नॉब किसानचे व्यवस्थापकीय संचालक टी. व्यंकटाकृष्णा, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक एस पी. साठे, आयटीसीचे कार्यकारी उपाध्यक्ष एल. प्रभाकर आदि उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती