शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

जलकुंभ कोसळून दोघी जागीच ठार

By admin | Updated: October 13, 2015 00:20 IST

दुर्घटना : सावरगावनजीकची घटना

पिंपळगाव बसवंत : कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघींचा अचानक कोसळलेल्या जलकुंभाखाली दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना सावरगावनजीक असलेल्या चमकवाडी या आदिवासी वस्तीत सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. जया दगडू सोनवणे (२७), वनिता खंडू लहानगे (१५) अशी मृतांची नावे आहेत.निफाड तालुक्यातील सावरगाव येथील केदराई रस्त्यावर सुमारे एक हजार लोकसंख्या असलेली २०० घरांची चमकवाडी ही कष्टकरी आदिवासींची नागरी वस्ती आहे. येथील नागरिकांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सावरगाव ग्रामपंचायतीने २६ वर्षांपूर्वी जलकुंभ उभारला होता. परंतु कालांतराने या जलकुंभाची योग्य देखभाल, दुरूस्ती झाली नाही व तो जीर्ण झाला होता. मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असलेल्या या धोकादायक जलकुंभावर जया दगडू सोनवणे (२७), वनिता खंडू लहानगे (१५) आणि मीना संजय मोरे या तिघी जण कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी जलकुंभात पाणी भरले जात होते. पाच हजार क्षमतेचा हा जलकुंभ दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाण्याने काठोकाठ भरला. पाण्याचा भार न पेलवल्याने जीर्ण झालेला सदर जलकुंभ अचानक कोसळला. कपडे धुण्यात मग्न असलेल्या जया सोनवणे आणि वनिता लहानगे या दोघींच्या अंगावर जलकुंभाचा काही भाग कोसळला. जलकुंभाच्या भिंतीत असलेल्या विटांच्या माऱ्याने वनिता दूरवर दगडावर फेकली गेली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि जागेवरच तिची प्राणज्योत मालवली. जया सोनवणे या सिमेंटच्या भिंतीखाली दबल्या गेल्याने जागीच ठार झाल्या. मात्र मीना मोरे या जलकुंभापासून पाच फूट अंतरावर असल्याने व सावधगिरी बाळगल्याने त्या बचावल्या. वनिताच्या पश्चात आई तर जया सोनवणे यांच्या पश्चात दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. मृतांच्या नातलगांना भरपाई मिळावी अशी मागणी सावरगावचे सरपंच संजय कुशारे यांनी केली आहे.विशेष म्हणजे, पाण्याच्या फुगवट्याने जीर्ण झालेल्या जलकुंभाच्या चारही भिंती एकाचवेळी जमिनदोस्त झाल्या. भिंती कोसळताच जोरदार आवाज झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले. मंडल अधिकारी आर. बी. बोरसे, विस्तार अधिकारी गादर यांनी घटनेचा पंचनामा केला. पिंपळगाव बसवंत आरोग्य केंद्रात दोघींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जि.प.ने अहवाल मागितलानाशिक : पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघींचा बळी गेल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घटनास्थळी दोन अधिकाऱ्यांचे पथक पाठवून घटनेची चौकशी सुरू केली आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी पाण्याची टाकी कोसळून घडलेल्या दुर्घटनेत दोघींचा बळी गेल्याचे समजताच उपअभियंता पेठकर व शाखा अभियंता दिलीप साळुंखे यांना सावरगाव येथे जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच यासंदर्भात तत्काळ सायंकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचीही सूचना केली. सावरगावला सद्यस्थितीत गावला पाणीपुरवठा करणारी स्वतंत्र पाण्याची टाकी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून बांधण्यात आली असून, कुरणवस्ती येथे १९८९ साली महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून सात फूट उंचीचे बैठी सुमारे आठ हजार लिटर्स पाण्याच्या क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. या पाण्याच्या टाकीचे बांधकाम संबंधित ग्रामपंचायतीमार्फतच करण्यात आल्याचे प्रकाश नंदनवरे यांनी स्पष्ट केले. तसेच ही पाण्याची टाकी नादुरुस्त किंवा दुरुस्तीविषयक संबंधित ग्रामपंचायतीने कोणताही प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने ही टाकी धोकेदायक असल्याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला कळविणे आवश्यक होते. मात्र ग्रामपंचायतीने किंवा ग्रामसेवकाने याबाबत काहीही कल्पना दिलेली नाही. पाण्याच्या दाबामुळे ही पाण्याची टाकी फुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे नंदनवरे यांचे म्हणणे आहे. अहवाल आल्यानंतरच यासंदर्भात काही कारवाई करता येईल काय? हा विचार केला जाईल. तूर्तास जिल्हा परिषदेला या घटनेप्रकरणी थेट कोणावरही कारवाई करता येणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)