शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती तिसरे महायुद्ध टाळू शकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 4:04 PM

येवला : बाबासाहेब आंबेडकरांच्या जलनीतीचा अवलंब केल्यास तिसरे महायुद्ध टाळू शकेलअसे मत डॉ. जी. डी. खरात यांनी व्यक्त केले. येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी खरात बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते.

ठळक मुद्दे जी.डी. खरात: बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान

येवला : बाबासाहेब आंबेडकरांच्या जलनीतीचा अवलंब केल्यास तिसरे महायुद्ध टाळू शकेलअसे मत डॉ. जी. डी. खरात यांनी व्यक्त केले.येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी खरात बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि कार्य हे विविध आयामानी सिद्ध झालेले होते. मुळात अर्थतज्ञ असणा्या डॉ. बाबासहेब आंबेडकरांचा सामाजिक, पर्यावरणीय, भौगोलिक, विज्ञानवादी, तत्त्वज्ञान अश्या सर्वच विषयाचा आवाका मोठा होता. भारताच्या जलनीतीच्या संदर्भात नदीजोड प्रकल्पाची भूमिका प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली होती. तो विचार जागतिक पातळीवर स्वीकारला गेला तर प्रत्येक राष्ट्र पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन जे तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल हे भाकीत केले गेले आहे ते खोटे ठरू शकेल असे मत खरात यांनी व्यक्त केले. नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने नार-पार नदीजोड प्रकल्पासंदर्भात प्रशांत हिरे यांनी वेळोवेळी मांडलेली वैचारिक भूमिका त्याच पद्धतीची असल्याचे ते म्हणाले. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत कारण तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती प्रत्यक्षात राबविली गेली असल्याचे ते म्हणाले.यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. भाऊसाहेब गमे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली संविधान निर्मितीचे महत्व विषद केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. डी. गायकवाड, जयमाला सोदे, टी. एस. सांगळे, डी. व्ही. सोनवणे, डी. बी. मामुडे, प्रा. भदाणे, उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी केले तर आभार प्रा. पंढरीनाथ दिसागज यांनी मानले.कॅप्शन :महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुष्पहार अर्पण करताना भाऊसाहेब गमे, शिवाजी गायकवाड, जी. डी. खरात, धनराज धनगर, जयमाला सोदे, पंढरीनाथ दिसागज (06येवला आंबेडकर कॉलेज)