शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती तिसरे महायुद्ध टाळू शकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 16:04 IST

येवला : बाबासाहेब आंबेडकरांच्या जलनीतीचा अवलंब केल्यास तिसरे महायुद्ध टाळू शकेलअसे मत डॉ. जी. डी. खरात यांनी व्यक्त केले. येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी खरात बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते.

ठळक मुद्दे जी.डी. खरात: बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान

येवला : बाबासाहेब आंबेडकरांच्या जलनीतीचा अवलंब केल्यास तिसरे महायुद्ध टाळू शकेलअसे मत डॉ. जी. डी. खरात यांनी व्यक्त केले.येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी खरात बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि कार्य हे विविध आयामानी सिद्ध झालेले होते. मुळात अर्थतज्ञ असणा्या डॉ. बाबासहेब आंबेडकरांचा सामाजिक, पर्यावरणीय, भौगोलिक, विज्ञानवादी, तत्त्वज्ञान अश्या सर्वच विषयाचा आवाका मोठा होता. भारताच्या जलनीतीच्या संदर्भात नदीजोड प्रकल्पाची भूमिका प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली होती. तो विचार जागतिक पातळीवर स्वीकारला गेला तर प्रत्येक राष्ट्र पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन जे तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल हे भाकीत केले गेले आहे ते खोटे ठरू शकेल असे मत खरात यांनी व्यक्त केले. नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने नार-पार नदीजोड प्रकल्पासंदर्भात प्रशांत हिरे यांनी वेळोवेळी मांडलेली वैचारिक भूमिका त्याच पद्धतीची असल्याचे ते म्हणाले. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत कारण तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती प्रत्यक्षात राबविली गेली असल्याचे ते म्हणाले.यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. भाऊसाहेब गमे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली संविधान निर्मितीचे महत्व विषद केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. डी. गायकवाड, जयमाला सोदे, टी. एस. सांगळे, डी. व्ही. सोनवणे, डी. बी. मामुडे, प्रा. भदाणे, उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी केले तर आभार प्रा. पंढरीनाथ दिसागज यांनी मानले.कॅप्शन :महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुष्पहार अर्पण करताना भाऊसाहेब गमे, शिवाजी गायकवाड, जी. डी. खरात, धनराज धनगर, जयमाला सोदे, पंढरीनाथ दिसागज (06येवला आंबेडकर कॉलेज)