शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती तिसरे महायुद्ध टाळू शकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 16:04 IST

येवला : बाबासाहेब आंबेडकरांच्या जलनीतीचा अवलंब केल्यास तिसरे महायुद्ध टाळू शकेलअसे मत डॉ. जी. डी. खरात यांनी व्यक्त केले. येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी खरात बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते.

ठळक मुद्दे जी.डी. खरात: बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान

येवला : बाबासाहेब आंबेडकरांच्या जलनीतीचा अवलंब केल्यास तिसरे महायुद्ध टाळू शकेलअसे मत डॉ. जी. डी. खरात यांनी व्यक्त केले.येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी खरात बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि कार्य हे विविध आयामानी सिद्ध झालेले होते. मुळात अर्थतज्ञ असणा्या डॉ. बाबासहेब आंबेडकरांचा सामाजिक, पर्यावरणीय, भौगोलिक, विज्ञानवादी, तत्त्वज्ञान अश्या सर्वच विषयाचा आवाका मोठा होता. भारताच्या जलनीतीच्या संदर्भात नदीजोड प्रकल्पाची भूमिका प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली होती. तो विचार जागतिक पातळीवर स्वीकारला गेला तर प्रत्येक राष्ट्र पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन जे तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल हे भाकीत केले गेले आहे ते खोटे ठरू शकेल असे मत खरात यांनी व्यक्त केले. नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने नार-पार नदीजोड प्रकल्पासंदर्भात प्रशांत हिरे यांनी वेळोवेळी मांडलेली वैचारिक भूमिका त्याच पद्धतीची असल्याचे ते म्हणाले. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत कारण तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती प्रत्यक्षात राबविली गेली असल्याचे ते म्हणाले.यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. भाऊसाहेब गमे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली संविधान निर्मितीचे महत्व विषद केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. डी. गायकवाड, जयमाला सोदे, टी. एस. सांगळे, डी. व्ही. सोनवणे, डी. बी. मामुडे, प्रा. भदाणे, उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी केले तर आभार प्रा. पंढरीनाथ दिसागज यांनी मानले.कॅप्शन :महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुष्पहार अर्पण करताना भाऊसाहेब गमे, शिवाजी गायकवाड, जी. डी. खरात, धनराज धनगर, जयमाला सोदे, पंढरीनाथ दिसागज (06येवला आंबेडकर कॉलेज)