शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

सरपंचावर अविश्वास आणणे यापुढे कठीण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:28 IST

ग्रामपंचायतींच्या सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याचा भाजपा सरकारचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना यापुढे निवडल्या जाणाºया सरपंचांवर कोणत्याही परिस्थितीत अविश्वास ठराव येणार नाही आणि आलाच तर तो मंजूरच होणार नाही, अशी काटेकोर कायदेशीर तरतूद सरकारने यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशात केली आहे.

नाशिक : ग्रामपंचायतींच्या सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याचा भाजपा सरकारचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना यापुढे निवडल्या जाणाºया सरपंचांवर कोणत्याही परिस्थितीत अविश्वास ठराव येणार नाही आणि आलाच तर तो मंजूरच होणार नाही, अशी काटेकोर कायदेशीर तरतूद सरकारने यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशात केली आहे.राज्यात सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये होणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच सरपंचाची निवडदेखील थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे थेट नगराध्यक्षांप्रमाणे थेट सरपंचाची निवड जनतेतून करून त्याची खुर्ची अधिकाधिक बळकट राहण्यासाठी त्याचबरोबर गावपातळीवरील गटातटाच्या राजकारणापासून त्याला अलिप्त ठेवण्याची कायदेशीर तरतूद सरकारने केली आहे. थेट सरपंचपदाची निवडणूक लढविणाºया उमेदवाराला राजकीय पक्षांचे चिन्ह मिळणार नसले तरी, राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मुक्त चिन्हातून कोणतेही एक निवडणूक चिन्ह सरपंचपदाच्या उमेदवाराला मिळू शकते. जे चिन्ह सरपंचपदासाठी देण्यात आले ते चिन्ह अन्य उमेदवाराला अथवा ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लढविणाºयाला दिले जाणार नाही, असे आयोगाने जाहीर केले आहे. सरपंचपदाच्या उमेदवारासाठी शासनाने पहिल्यांदाच शैक्षणिक पात्रतेची अट घातली आहे. किमान सातवी पास किंवा सातवी इयत्तेशी समतुल्य शैक्षणिक प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे बंधनकारक आहे. सरपंचपदासाठी फिक्कट निळ्या रंगाची मतपत्रिका असणार आहे. थेट जनतेतून सरपंच निवडला गेला नाही तर या पदासाठी पुन्हा निवडणूक घेण्यात येईल व तरीही सरपंचाची निवड न झाल्यास ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याची तरतूद शासनाने केली आहे. सरपंच निवडणुकीत समसमान मते पडली तर मात्र चिठ्ठ्या टाकून विजेता ठरविण्यात येणार आहे.