शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

हप्ता भरायला उशीर झाला;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांचे पगार कमी झाले. टाळेबंदी आणि प्रतिबंधात्मक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांचे पगार कमी झाले. टाळेबंदी आणि प्रतिबंधात्मक निमयांमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. यातील बहुतेकांचे गृहकर्ज व व्यावसायािक कर्ज व वैयक्तिक कर्जाचे हप्ते थकले आहेत. या कर्जाच्या वसुलीसाठी बँकांचा तगादा सुरू झाला आहे.

कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला तीन महिने विविध कर्जांच्या परतफेडीसाठी ग्राहकांना सवलत दिली होती; परंतु पुढील काळात कोरोनाचे संकट पहिल्या लाटेत अधिक गडद झाल्याने ही सवलत सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या लाटेदरम्यान टाळेबंदी व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना सरकारने अशी कोणतीही सवलत देऊ केली नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत असून हप्ता भरायला उशीर झाल्यामुळे अथवा कर्जाचा हप्ताच भरता येऊ न शकल्याने बँकाच्या वसुली विभागाचे कर्मचारी व अधिकारी ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचत आहेत.

सारीच कर्जे थकली; गृहकर्जाचे प्रमाण जास्त

कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांसह अनेक व्यावसायिकांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून घरासाठी, व्यावसायासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते थकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. यात वैयक्तिक कर्जधारकांचाही समावेश आहे. मात्र, सर्वाधिक प्रमाण गृहकर्जधारकांचे असून हातचा रोजगार गेल्यामुळे डोक्यावरचे छत वाचविण्यासाठी सर्वसामान्यांना कसरत करावी लागत आहे.

२) काहींना नोटिसा, तर काहींची मालमत्ता जप्त

कर्ज थकल्यामुळे कोरोना काही जणांना बँकांनी नोटिसा बजावल्या आहेत. यात खासगी क्षेत्रातील बँका आणि फायनान्स कंपन्यांचे प्रमाण अधिक आहे. तर जुजबी आर्थिक उत्पन्न असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मालमत्तांच्या जप्तीपासून वाचविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मालमत्ता जप्तीच्या कारवाईला सामोरे जाणाऱ्या ग्राहकांकडून तात्पुरती तजवीज करून आपल्या मालमत्ता वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नोकरी गेली, गृहकर्ज थकले !

कोरोना संकटात नोकरी गमवावी लागली. त्यामुळे घराचे हप्त थकले आहेत. बँकेकडून गृहकर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा सुरू आहे; परंतु अजूनही नियमित नोकरी सुरू झालेली नाही.

त्यामुळे पगार पूर्ण होत नसल्याने कर्जाचे हप्ते थकले आहेत. शासनाने कर्ज हप्ते भरण्यास काही कालावधीसाठी सवलत देणे आवश्यक आहे.

- विलास कोलते, ग्राहक

---

नोकरीच्या भरवशावर घर घेतले होते; परंतु लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेली. आता स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे; परंतु व्यवसाय स्थिर स्थावर होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. तोपर्यंत सरकारने कर्जफेड करण्यासाठी सवलत देणे आवश्यक आहे.

संदीप जाधव, ग्राहक

----

दुकान बंद पडले, कर्ज कसे भरणार?

कोरोना काळातील टाळेबंदीत दुकान बंद होते. मात्र, दुकानाचे भाडे, वीज बिल व इतर खर्च सुरू होते, शिवाय उत्पन्नही थांबले होते. त्यामुळे आर्थिक खर्चाचे गणित जुळविण्यासाठी दुकान बंद करावे लागले. त्यामुळे उत्पन्नाचा स्रोतच संपुष्टात आल्याने कर्जफेड करण्याचे मोठे संकट निर्माण झाल्याचे कोरोना काळात दुकाने बंद कराव्या लागलेल्या व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. कोरोना काळात व्यवसाय डबघाईला आल्यामुळे व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाल्याने अशा संकटातील व्यावसायिकांना सावरण्यासाठी सरकारने विशेष योजना राबविण्याची मागणी होत आहे.

अधिकाऱ्यांना वसुलीचे टार्गेट

कोरोना संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक असे सर्वच घटक कमी अधिक प्रमाणात अडचणींचा सामना करीत असताना विविध बँकांच्या वसुली विभागाचे अधिकारी ग्राहकांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावत आहे. कोरोना काळात बँकांच्या कर्जवसुलीचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे वसुली विभागातील कर्मचारी व अधिकऱ्यांच्या अतिरिक्त मानधनावरही त्याचा विपरीत परिणाम होत असून बँकांकडून कर्मचारी, अधिकाऱ्यांना कर्जवसुलीचे टार्गेट दिले जात असल्याने वसुली अधिकऱ्यांकडून ग्राहकांकडे वसुलीसाठी सतत तगादा लावला जात आहे.