शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

कडक निर्बंधाची चिन्हे असल्याने शिवभोजन थाळी पाच रुपयातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:14 IST

नाशिक: मागीलवर्षी कोरोनामुळे शिवभोजन थाळीचे दर दहा रुपयांवरून पाच रुपये इतके करण्यात आले होते. एप्रिलपासून पुन्हा दहा ...

नाशिक: मागीलवर्षी कोरोनामुळे शिवभोजन थाळीचे दर दहा रुपयांवरून पाच रुपये इतके करण्यात आले होते. एप्रिलपासून पुन्हा दहा रुपये दर केले जाणार होते. मात्र आता शासनाच्या पुढील आदेशापर्यंत थाळी पाच रुपयांनाच मिळणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना संकटाच्या काळात मागीलवर्षी गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक तसेच परप्रांतीय मजुरांना पाच रुपयांत मिळणाऱ्या शिवभोजन थाळीचा आधार लाभला होता. यावर्षी कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने निर्बंध अधिक कठोर करण्याची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत शिवभोजन थाळी अनेकाना आधार ठरू शकणार आहे. राज्यात निर्बंध अधिक कठेार होणार असल्याची चिन्हे असल्याने अल्पदरात मिळणारी शिवभोजन थाळी

पुढील काळातही अनेकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. अवघ्या दहा रुपयात सर्वसामान्य नागरिकांना पेाळी, भाजी, वरण, भात दिला जातो. या थाळीचा लाभ मोलमजुरी करणारे मजूर, गावखेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी येणारे सर्वसामान्य नागरिक यांना या शिवभोजन थाळीचा चांगलाच लाभ होत आहे. राज्यात कोरेानाचा प्रभाव वाढल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन करण्याची वेळ आली. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, व्यापार आदी दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला. कारखाने बंद झाले त्यामुळे हातालाही काम राहिले नाही. अशा काळात शिवभोजन थाळी पाच रुपयांना जाहीर करून शासनाने अनेकांची भूक भागविली. मागीलवर्षी शिवभोजन थाळीचा दर दहा रुपयांवरून पाच रुपये करण्यात आला होता. १ एप्रिलपासून शिवभोजन थाळीचे दर पूर्ववत म्हणजे दहा रुपये इतके केले जाणार होते. मात्र, करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती बिघडत असल्याने शासनाने मार्च महिना संपल्यानंतरही थाळीचे दर पाच रुपये इतकेच ठेवले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत पाच रुपय किमतीनेच शिवभोजन थाळीची विक्री केली जाणार असून जिल्ह्यातील १७ लाख नागरिकांनी शिवभोजनचा आस्वाद घेतला.

--इन्फो--

जिल्ह्यात ४५ शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे. शहरात १४ तर ग्रामीण भागात ३१ शिवभोजन केंद्रे आहेत. शहरातील केंद्रांवर ३ हजार ७०० थाळ्या तर उर्वरित ग्रामीण भागातील केंद्रांसाठी ३ हजार ३०० थाळ्या मंजूर करण्यात आहेत. शहर व जिल्ह्यात मिळून ६ हजार ५०० हून अधिक शिवभोजन थाळ्यांचे वितरण होत आहे. मागील एक वर्षात १७ लाख ५३ हजारांहून अधिक नागरिकांनी शिवभोजनचा आस्वाद घेतला.