शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

कडक निर्बंधाची चिन्हे असल्याने शिवभोजन थाळी पाच रुपयातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:14 IST

नाशिक: मागीलवर्षी कोरोनामुळे शिवभोजन थाळीचे दर दहा रुपयांवरून पाच रुपये इतके करण्यात आले होते. एप्रिलपासून पुन्हा दहा ...

नाशिक: मागीलवर्षी कोरोनामुळे शिवभोजन थाळीचे दर दहा रुपयांवरून पाच रुपये इतके करण्यात आले होते. एप्रिलपासून पुन्हा दहा रुपये दर केले जाणार होते. मात्र आता शासनाच्या पुढील आदेशापर्यंत थाळी पाच रुपयांनाच मिळणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना संकटाच्या काळात मागीलवर्षी गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक तसेच परप्रांतीय मजुरांना पाच रुपयांत मिळणाऱ्या शिवभोजन थाळीचा आधार लाभला होता. यावर्षी कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने निर्बंध अधिक कठोर करण्याची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत शिवभोजन थाळी अनेकाना आधार ठरू शकणार आहे. राज्यात निर्बंध अधिक कठेार होणार असल्याची चिन्हे असल्याने अल्पदरात मिळणारी शिवभोजन थाळी

पुढील काळातही अनेकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. अवघ्या दहा रुपयात सर्वसामान्य नागरिकांना पेाळी, भाजी, वरण, भात दिला जातो. या थाळीचा लाभ मोलमजुरी करणारे मजूर, गावखेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी येणारे सर्वसामान्य नागरिक यांना या शिवभोजन थाळीचा चांगलाच लाभ होत आहे. राज्यात कोरेानाचा प्रभाव वाढल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन करण्याची वेळ आली. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, व्यापार आदी दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला. कारखाने बंद झाले त्यामुळे हातालाही काम राहिले नाही. अशा काळात शिवभोजन थाळी पाच रुपयांना जाहीर करून शासनाने अनेकांची भूक भागविली. मागीलवर्षी शिवभोजन थाळीचा दर दहा रुपयांवरून पाच रुपये करण्यात आला होता. १ एप्रिलपासून शिवभोजन थाळीचे दर पूर्ववत म्हणजे दहा रुपये इतके केले जाणार होते. मात्र, करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती बिघडत असल्याने शासनाने मार्च महिना संपल्यानंतरही थाळीचे दर पाच रुपये इतकेच ठेवले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत पाच रुपय किमतीनेच शिवभोजन थाळीची विक्री केली जाणार असून जिल्ह्यातील १७ लाख नागरिकांनी शिवभोजनचा आस्वाद घेतला.

--इन्फो--

जिल्ह्यात ४५ शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे. शहरात १४ तर ग्रामीण भागात ३१ शिवभोजन केंद्रे आहेत. शहरातील केंद्रांवर ३ हजार ७०० थाळ्या तर उर्वरित ग्रामीण भागातील केंद्रांसाठी ३ हजार ३०० थाळ्या मंजूर करण्यात आहेत. शहर व जिल्ह्यात मिळून ६ हजार ५०० हून अधिक शिवभोजन थाळ्यांचे वितरण होत आहे. मागील एक वर्षात १७ लाख ५३ हजारांहून अधिक नागरिकांनी शिवभोजनचा आस्वाद घेतला.