शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
3
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
4
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
5
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
6
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
7
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
8
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
9
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
10
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
11
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
12
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
13
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
14
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
15
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
16
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
17
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
18
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
19
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
20
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली

कडक निर्बंधाची चिन्हे असल्याने शिवभोजन थाळी पाच रुपयातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:14 IST

नाशिक: मागीलवर्षी कोरोनामुळे शिवभोजन थाळीचे दर दहा रुपयांवरून पाच रुपये इतके करण्यात आले होते. एप्रिलपासून पुन्हा दहा ...

नाशिक: मागीलवर्षी कोरोनामुळे शिवभोजन थाळीचे दर दहा रुपयांवरून पाच रुपये इतके करण्यात आले होते. एप्रिलपासून पुन्हा दहा रुपये दर केले जाणार होते. मात्र आता शासनाच्या पुढील आदेशापर्यंत थाळी पाच रुपयांनाच मिळणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना संकटाच्या काळात मागीलवर्षी गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक तसेच परप्रांतीय मजुरांना पाच रुपयांत मिळणाऱ्या शिवभोजन थाळीचा आधार लाभला होता. यावर्षी कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने निर्बंध अधिक कठोर करण्याची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत शिवभोजन थाळी अनेकाना आधार ठरू शकणार आहे. राज्यात निर्बंध अधिक कठेार होणार असल्याची चिन्हे असल्याने अल्पदरात मिळणारी शिवभोजन थाळी

पुढील काळातही अनेकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. अवघ्या दहा रुपयात सर्वसामान्य नागरिकांना पेाळी, भाजी, वरण, भात दिला जातो. या थाळीचा लाभ मोलमजुरी करणारे मजूर, गावखेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी येणारे सर्वसामान्य नागरिक यांना या शिवभोजन थाळीचा चांगलाच लाभ होत आहे. राज्यात कोरेानाचा प्रभाव वाढल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन करण्याची वेळ आली. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, व्यापार आदी दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला. कारखाने बंद झाले त्यामुळे हातालाही काम राहिले नाही. अशा काळात शिवभोजन थाळी पाच रुपयांना जाहीर करून शासनाने अनेकांची भूक भागविली. मागीलवर्षी शिवभोजन थाळीचा दर दहा रुपयांवरून पाच रुपये करण्यात आला होता. १ एप्रिलपासून शिवभोजन थाळीचे दर पूर्ववत म्हणजे दहा रुपये इतके केले जाणार होते. मात्र, करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती बिघडत असल्याने शासनाने मार्च महिना संपल्यानंतरही थाळीचे दर पाच रुपये इतकेच ठेवले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत पाच रुपय किमतीनेच शिवभोजन थाळीची विक्री केली जाणार असून जिल्ह्यातील १७ लाख नागरिकांनी शिवभोजनचा आस्वाद घेतला.

--इन्फो--

जिल्ह्यात ४५ शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे. शहरात १४ तर ग्रामीण भागात ३१ शिवभोजन केंद्रे आहेत. शहरातील केंद्रांवर ३ हजार ७०० थाळ्या तर उर्वरित ग्रामीण भागातील केंद्रांसाठी ३ हजार ३०० थाळ्या मंजूर करण्यात आहेत. शहर व जिल्ह्यात मिळून ६ हजार ५०० हून अधिक शिवभोजन थाळ्यांचे वितरण होत आहे. मागील एक वर्षात १७ लाख ५३ हजारांहून अधिक नागरिकांनी शिवभोजनचा आस्वाद घेतला.