शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची गोठे स्थलांतरित करण्यास मुहूर्त लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:11 IST

इंदिरानगर - महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांनी पाच महिन्यांपूर्वी शहरातील जनावरांची गोठे शहराबाहेर स्थलांतरित करण्याचे आदेश दिले ...

इंदिरानगर - महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांनी पाच महिन्यांपूर्वी शहरातील जनावरांची गोठे शहराबाहेर स्थलांतरित करण्याचे आदेश दिले होते ; परंतु वडाळा गावातील जनावरांचे गोठे अद्यापही स्थलांतरित झाले नाही, प्रशासन देखील केवळ कागदी घोडे नाचवत आहे. त्यामुळे प्रशासन सभापतींचे आदेश जुमानत नाही काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील सर्वात जास्त गोठे वडाळा गाव परिसरात आहेत, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एक वर्षापूर्वी डिसेंबर महिन्यात जनावरांचे गोठे स्थलांतर करण्याचा आदेश देण्यात आला होता ; परंतु तेव्हाही नोटीस वाटप करण्याचा सोपस्कार करण्यात आले हाेते. मात्र, जनावरांचे गोठे हलविण्यास तेव्हाही मुहूर्त लागला नव्हता. पाच महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या सभेत सभापती गणेश गिते यांनी जनावरांचे गोठे शहराबाहेर स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे वडाळा गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. पाच महिने होऊन सुद्धा जनावरांचे गोठे हलविण्यास अद्याप मुहूर्त लागला नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वडाळा गाव रस्ता व वडाळा गावातील लोकवस्तीत जनावरांची गोठे काही स्थलांतरित करण्यात आले नाहीत त्यामुळे महापालिका प्रशासनाला माणसांपेक्षा जनावरे महत्त्वाचे असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. महापालिकेच्या वतीने गोठे धारकांना फक्त नोटिसा बजावून फक्त सोपस्कार केला जातो.

इन्फो..

गावाच्या रस्त्यालगतच जनावरांचा गोठा असल्याने गोठ्यातील मलमूत्र सर्रास रस्त्यालगत नाल्यात सोडण्यात आले आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी एक ते दोन जनावरांचे गोठे होते. आता त्यांची संख्या ५० ते ६० च्या घरात गेली आहेत. प्रत्येक जनावराच्या गोठ्यामध्ये सुमारे चारशे ते पाचशे जनावरे आहेत. त्या जनावरांच्या मलमूत्राचा प्रश्न निर्माण होत असल्याने बहुतेक गोठे धारकांना सर्रास जनावर मलमूत्र गोठ्याबाहेर खड्डा करून किंवा बाहेर सोडून दिले आहे, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.