शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनामुळे नाशिकच्या साहित्य चळवळीला चालना मिळण्याचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:11 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्याला दीड दशकांनंतर पुन्हा साहित्य संमेलनाचा मान मिळाल्याने, जिल्ह्यातील साहित्यिक आणि मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे, ...

नाशिक : नाशिक जिल्ह्याला दीड दशकांनंतर पुन्हा साहित्य संमेलनाचा मान मिळाल्याने, जिल्ह्यातील साहित्यिक आणि मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे, तसेच नाशिकचे संमेलन यशस्वी करण्याचा निर्धारही व्यक्त केला. नाशिकमधील नवीन पिढीला मराठीतील अनमोल साहित्याचे आणि नामवंत साहित्यिकांचे दर्शन, तसेच अनुभव जवळून घेता येणार असून, त्यामुळे नाशिकमधील साहित्य चळवळीला चालना मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.

नाशिकमध्ये मार्च महिन्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाने नाशिकच्या युवा साहित्यिकांना, नवीन काही लिहू इच्छिणाऱ्यांच्या प्रतिभेला अधिक धुमारे फुटून साहित्य चळवळ अधिक जोमात वाढेल, असा विश्वासही साहित्यिक आणि मान्यवरांनी व्यक्त केला.

---

नाशिकला साहित्याची मोठी परंपरा असून, अनेक दिग्गज साहित्यिक या भूमीने दिले आहेत. त्यामुळे नाशिकला पुन्हा संमेलनाचा मान मिळाला, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. नाशिकमधील हे संंमेलन ऐतिहासिक व्हावे, यासाठी प्रयत्न करू, तसेच देशभरातून येणाऱ्या साहित्यिकांचा योग्य मान, सन्मान ठेवला जाईल.

छगन भुजबळ, पालकमंत्री

-------

लोकहितवादी मंडळाने प्रातिनिधिकरीत्या निमंत्रण दिले असले, तरी नाशिकमधील सर्व संस्था आणि रसिकांचे या संमेलन आयोजनात योगदान राहणार आहे. लक्ष्मीबाई टिळकांपासून सावरकर, कुसुमाग्रज, कानेटकर ते सध्याच्या प्रतिभावान लेखकांपर्यंत नाशिकला मोठी साहित्य परंपरा असल्याने, नाशिकला संमेलन होणार, ही सर्व नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. ही निवड सार्थकी लावू, असा विश्वास वाटतो.

हेमंत टकले, विश्वस्त, लोकहितवादी मंडळ

-----

महाराष्ट्र स्थापनेच्या हिरक महोत्सवी वर्षात हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. संमेलनासाठी लोकहितवादी मंडळातर्फे निमंत्रण देण्यात आले असले, हे संमेलन तमाम नाशिककरांचे आहे. या निमित्ताने नाशिककरांना परिवर्तनाची दिशा देणारे साहित्यिकांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार असून, सामूहिक प्रयत्नांतून संमेलन आयोजन यशस्वी करू, असा विश्वास आहे.

जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ

--------

साहित्य आणि संस्कृतीच्या जोपासनेच्या दृष्टीने संमेलन नाशकात होण्याची वार्ता ही खूपच आनंदाची बाब आहे. नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेला हे संमेलन अधिक समृद्ध करेल. जिल्ह्यातील अधिकाधिक युवा वर्गाने या संमेलनाचा लाभ घेऊन आपल्या साहित्यिक जाणिवा समृद्ध करून घेतल्यास त्याचा त्यांना निश्चितच लाभ होईल.

गो. तु. पाटील, ज्येष्ठ साहित्यिक

-------------

नाशिकच्या साहित्य चळवळीसाठी ही आनंदाची बाब असून, या चळवळीला बळकटी देण्याचे कार्य या संमेलनातून होईल, असा विश्वास वाटतो. या संमेलनाच्या निमित्ताने नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील नवसाहित्यिक अधिक प्रमाणात लिहते होतील. नवी पिढी लिहिती झाल्याने, त्यांच्या भाषेतील, विचारांतील अधिकाधिक साहित्य निर्माण होऊ शकेल.

प्रकाश होळकर, कवी आणि मसापचे जिल्हा सदस्य

-----------------------

कोरोनाच्या सावटाखाली हे संमेलन होणार असल्याने, अधिक काळजी घेऊन त्याचे आयोजन करावे लागणार आहे. मात्र, गत वर्षभरापासून साहित्यापासून वंचित राहिलेल्या रसिकांना ही एक पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. जुन्या पिढीतील कार्यकर्ते आता फारसे सक्रिय नाहीत. त्या निमित्ताने नव्या दमाची टीम निर्माण होऊन संमेलन यशस्वी करतील, हा विश्वास आहे.

नरेश महाजन, साहित्यिक

-------------

नाशिकला साहित्य संमेलन होणार असल्याचा खूप आनंद आहे. या संमेलनात होणाऱ्या चर्चा, परिसंवांदातून अनेक नवसाहित्यिकांना पुढील दिशा मिळत जाते. त्यामुळे या संमेलनाच्या आयोजनात पुढाकार घेणाऱ्यांचे आभार मानतानाच एक नाशिककर म्हणून माझ्याकडे काही जबाबदारी सोपवल्यास, मी ती निश्चितच पार पाडेन.

प्राजक्त देशमुख, युवा नाटककार