शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

संमेलनामुळे नाशिकच्या साहित्य चळवळीला चालना मिळण्याचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:11 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्याला दीड दशकांनंतर पुन्हा साहित्य संमेलनाचा मान मिळाल्याने, जिल्ह्यातील साहित्यिक आणि मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे, ...

नाशिक : नाशिक जिल्ह्याला दीड दशकांनंतर पुन्हा साहित्य संमेलनाचा मान मिळाल्याने, जिल्ह्यातील साहित्यिक आणि मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे, तसेच नाशिकचे संमेलन यशस्वी करण्याचा निर्धारही व्यक्त केला. नाशिकमधील नवीन पिढीला मराठीतील अनमोल साहित्याचे आणि नामवंत साहित्यिकांचे दर्शन, तसेच अनुभव जवळून घेता येणार असून, त्यामुळे नाशिकमधील साहित्य चळवळीला चालना मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.

नाशिकमध्ये मार्च महिन्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाने नाशिकच्या युवा साहित्यिकांना, नवीन काही लिहू इच्छिणाऱ्यांच्या प्रतिभेला अधिक धुमारे फुटून साहित्य चळवळ अधिक जोमात वाढेल, असा विश्वासही साहित्यिक आणि मान्यवरांनी व्यक्त केला.

---

नाशिकला साहित्याची मोठी परंपरा असून, अनेक दिग्गज साहित्यिक या भूमीने दिले आहेत. त्यामुळे नाशिकला पुन्हा संमेलनाचा मान मिळाला, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. नाशिकमधील हे संंमेलन ऐतिहासिक व्हावे, यासाठी प्रयत्न करू, तसेच देशभरातून येणाऱ्या साहित्यिकांचा योग्य मान, सन्मान ठेवला जाईल.

छगन भुजबळ, पालकमंत्री

-------

लोकहितवादी मंडळाने प्रातिनिधिकरीत्या निमंत्रण दिले असले, तरी नाशिकमधील सर्व संस्था आणि रसिकांचे या संमेलन आयोजनात योगदान राहणार आहे. लक्ष्मीबाई टिळकांपासून सावरकर, कुसुमाग्रज, कानेटकर ते सध्याच्या प्रतिभावान लेखकांपर्यंत नाशिकला मोठी साहित्य परंपरा असल्याने, नाशिकला संमेलन होणार, ही सर्व नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. ही निवड सार्थकी लावू, असा विश्वास वाटतो.

हेमंत टकले, विश्वस्त, लोकहितवादी मंडळ

-----

महाराष्ट्र स्थापनेच्या हिरक महोत्सवी वर्षात हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. संमेलनासाठी लोकहितवादी मंडळातर्फे निमंत्रण देण्यात आले असले, हे संमेलन तमाम नाशिककरांचे आहे. या निमित्ताने नाशिककरांना परिवर्तनाची दिशा देणारे साहित्यिकांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार असून, सामूहिक प्रयत्नांतून संमेलन आयोजन यशस्वी करू, असा विश्वास आहे.

जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ

--------

साहित्य आणि संस्कृतीच्या जोपासनेच्या दृष्टीने संमेलन नाशकात होण्याची वार्ता ही खूपच आनंदाची बाब आहे. नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेला हे संमेलन अधिक समृद्ध करेल. जिल्ह्यातील अधिकाधिक युवा वर्गाने या संमेलनाचा लाभ घेऊन आपल्या साहित्यिक जाणिवा समृद्ध करून घेतल्यास त्याचा त्यांना निश्चितच लाभ होईल.

गो. तु. पाटील, ज्येष्ठ साहित्यिक

-------------

नाशिकच्या साहित्य चळवळीसाठी ही आनंदाची बाब असून, या चळवळीला बळकटी देण्याचे कार्य या संमेलनातून होईल, असा विश्वास वाटतो. या संमेलनाच्या निमित्ताने नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील नवसाहित्यिक अधिक प्रमाणात लिहते होतील. नवी पिढी लिहिती झाल्याने, त्यांच्या भाषेतील, विचारांतील अधिकाधिक साहित्य निर्माण होऊ शकेल.

प्रकाश होळकर, कवी आणि मसापचे जिल्हा सदस्य

-----------------------

कोरोनाच्या सावटाखाली हे संमेलन होणार असल्याने, अधिक काळजी घेऊन त्याचे आयोजन करावे लागणार आहे. मात्र, गत वर्षभरापासून साहित्यापासून वंचित राहिलेल्या रसिकांना ही एक पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. जुन्या पिढीतील कार्यकर्ते आता फारसे सक्रिय नाहीत. त्या निमित्ताने नव्या दमाची टीम निर्माण होऊन संमेलन यशस्वी करतील, हा विश्वास आहे.

नरेश महाजन, साहित्यिक

-------------

नाशिकला साहित्य संमेलन होणार असल्याचा खूप आनंद आहे. या संमेलनात होणाऱ्या चर्चा, परिसंवांदातून अनेक नवसाहित्यिकांना पुढील दिशा मिळत जाते. त्यामुळे या संमेलनाच्या आयोजनात पुढाकार घेणाऱ्यांचे आभार मानतानाच एक नाशिककर म्हणून माझ्याकडे काही जबाबदारी सोपवल्यास, मी ती निश्चितच पार पाडेन.

प्राजक्त देशमुख, युवा नाटककार