शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
5
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
6
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
7
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
8
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
9
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
13
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
14
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
16
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
17
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
18
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
19
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
20
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

साधुसंतांच्या तपामुळेच देश अक्षयवटाप्रमाणे उभा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:12 IST

नाशिक : आपल्या देशावर अनेक आघात व आक्रमणे झाली. अनेक मोहजाल टाकल्या गेले तेव्हा हा देश बुडेल, हा सनातन ...

नाशिक : आपल्या देशावर अनेक आघात व आक्रमणे झाली. अनेक मोहजाल टाकल्या गेले तेव्हा हा देश बुडेल, हा सनातन हिंदू धर्म टिकणार नाही असे अनेकांना वाटले. मात्र संत, महापुरुषांच्या तपश्चर्येमुळे हा देश अक्षयवटाप्रमाणे उभा राहिला, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी काढले.

नाशिक येथे आयोजित स्वामी सवितानंद यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. येथील नक्षत्र लाॅन्स येथे पार पडलेल्या या सोहळ्यात स्वामी सवितानंद अमृत महोत्सव समितीतर्फे ‘सविता अर्घ्य’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना भागवत यांनी मोक्ष हा धर्मासोबत चालणारा असून मोक्ष हा आध्यात्मिक साधना व पुरुषार्थ असल्याचे सांगितले. जोपर्यंत शरीर असते तोपर्यंत अर्थ व काम या दोन्ही गोष्टी असतात. मात्र त्यांना अनुशासित करण्यासाठी धर्म असतो. तो धर्मच सगळ्या समाजास एकसंध ठेवतो असेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी मानपत्र, महावस्त्र, व पुष्पहार घालून डाॅ. भागवत यांनी स्वामी सवितानंद यांचा अमृत महोत्सवी सत्कार केला. यावेळी साधकांचे मार्गदर्शन करतांना स्वामी सवितानंद यांनी ‘मी समाजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. प्रत्येकाने समाज व देशाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा, तेव्हाच ईश्वर मिळतो असे प्रतिपादन स्वामी सवितानंद यांनी केले. डाॅ. कपिल चांद्रायण यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन, तर वैद्य योगेश जिरांगलीकर यांनी आभार प्रदर्शन केले.

इन्फो

सैनिक कल्याण निधीसह राम जन्मभूमी न्यासला देणगी

सविता अर्घ्य या स्मरणिकेत देशभरातील स्वामी साधकांच्या ६०पेक्षा जास्त लेखांचा समावेश करण्यात आला आहे. या स्मरणिकेचे चार भागांत विभाजन करण्यात आले आहे. याप्रसंगी स्वामी सवितानंद सेवा समितीतर्फे सैनिक कल्याण निधीस तीन लाख, तर श्रीराम जन्मभूमी न्यासला तीन लाख रुपयांचा धनादेश देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आला.

फोटो

१५भागवत सवितानंद

स्वामी सवितानंद यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त त्यांना मानपत्र प्रदान करताना सरसंघचालक मोहन भागवत.