शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेमुळे यशाला ‘चार चाँद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:58 IST

खगोलक्षेत्रातील संशोधनासाठी स्थापित इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेचे हे ५० वे म्हणजेच सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, यावर्षी ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत मिळविलेले यश हा संस्थेच्या आणि देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे.

नाशिक : खगोलक्षेत्रातील संशोधनासाठी स्थापित इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेचे हे ५० वे म्हणजेच सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, यावर्षी ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत मिळविलेले यश हा संस्थेच्या आणि देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. जगात केवळ तीनच देशांना यापूर्वी हे यश प्राप्त झाले असून, त्यानंतर अशी कामगिरी करणारा भारत हा केवळ चौथा देश असल्याने इस्त्रोच्या या यशाने खरोखरच ‘चार चाँद’ लावले असल्याची भावना नाशिकमधील खगोलतज्ज्ञांनी व्यक्त केली.भारतासाठी सोमवारचा दिवस हा अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीहरीकोटा येथील घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या नाशिकमधील खगोलतज्ज्ञांनीदेखील आनंद व्यक्त करीत भारताच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे भारताने अन्य राष्टÑांच्या तुलनेत अत्यल्प खर्चात या यशाला गवसणी घातली असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले.तांत्रिक बिघाड वेळीच लक्षात येऊन त्यावर सात दिवसात तोडगा काढत चांद्रयान दोन मोहिमेत मिळविलेले यश अद्वितीय आहे. विशेष म्हणजे आधी चंद्रावर पोहोचण्यास ५२ दिवसांचा कालावधी लागणार होता, पण अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्या ऊर्जेने आणि यान झेपावल्याने त्याला आता ४८ दिवसच लागणार आहेत. अतिरिक्त वेग मिळालेला असल्याने आता पृथ्वी आणि चंद्राभोवती ५ ऐवजी ४ फेऱ्या मारून यानावरील लॅँडर चंद्रावर उतरविले जाणार आहे. या यशाबाबत सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.- अविनाश शिरुडे, अध्यक्ष, स्पेस इंडिया सोसायटीचांद्रयान -२ च्या प्रारंभिक दोन टप्प्यांत मिळालेले यश अतुलनीय आहे. विशेष म्हणजे हे यान पूर्णपणे भारतीय बनावटीचे असून, इस्त्रोसह देशासाठी ही खूपच अभिमानास्पद बाब आहे. प्रारंभीचे दोन टप्पे भारतीय चांद्रयानने यशस्वीपणे पूर्ण केले असून, अखेरच्या टप्प्यात चंद्रावर लॅँडर उतरविण्यात येणार आहे. भारतीय अंतराळ संशोधनाचे अध्वर्यू विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे अभियान होत असल्याने त्यांच्याच नावावरून त्याचे नाव ‘विक्रम लॅँडर’ असे ठेवण्यात आले असून, यापुढील संपूर्ण अभियानही यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो.- गिरीश पिंपळे, खगोलतज्ज्ञचांद्रयान मिशनच्या दुसºया पर्वात भारताने आणि इस्त्रोने मिळविलेले यश ऐतिहासिक असून, त्याचे महत्त्व खूप मोठे आहे. यापूर्वीच्या तिन्ही देशांनी चंद्राच्या उत्तर धृवावर लॅँडर आणि रोव्हर उतरविले होते. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण धृवावर रोव्हर आणि लॅँडर पाठविणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे. दक्षिण धृवावर पाणी सापडण्याची शक्यता अधिक असल्यामुळेच भारताने दक्षिण धृवाची निवड केली आहे. या मोहिमेमुळे भारताला मून मॅपिंग आणि अन्य माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. अपूर्वा जाखडी, खगोलतज्ज्ञइ

टॅग्स :isroइस्रोChandrayaan 2चांद्रयान-2