शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेमुळे यशाला ‘चार चाँद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:58 IST

खगोलक्षेत्रातील संशोधनासाठी स्थापित इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेचे हे ५० वे म्हणजेच सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, यावर्षी ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत मिळविलेले यश हा संस्थेच्या आणि देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे.

नाशिक : खगोलक्षेत्रातील संशोधनासाठी स्थापित इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेचे हे ५० वे म्हणजेच सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, यावर्षी ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत मिळविलेले यश हा संस्थेच्या आणि देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. जगात केवळ तीनच देशांना यापूर्वी हे यश प्राप्त झाले असून, त्यानंतर अशी कामगिरी करणारा भारत हा केवळ चौथा देश असल्याने इस्त्रोच्या या यशाने खरोखरच ‘चार चाँद’ लावले असल्याची भावना नाशिकमधील खगोलतज्ज्ञांनी व्यक्त केली.भारतासाठी सोमवारचा दिवस हा अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीहरीकोटा येथील घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या नाशिकमधील खगोलतज्ज्ञांनीदेखील आनंद व्यक्त करीत भारताच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे भारताने अन्य राष्टÑांच्या तुलनेत अत्यल्प खर्चात या यशाला गवसणी घातली असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले.तांत्रिक बिघाड वेळीच लक्षात येऊन त्यावर सात दिवसात तोडगा काढत चांद्रयान दोन मोहिमेत मिळविलेले यश अद्वितीय आहे. विशेष म्हणजे आधी चंद्रावर पोहोचण्यास ५२ दिवसांचा कालावधी लागणार होता, पण अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्या ऊर्जेने आणि यान झेपावल्याने त्याला आता ४८ दिवसच लागणार आहेत. अतिरिक्त वेग मिळालेला असल्याने आता पृथ्वी आणि चंद्राभोवती ५ ऐवजी ४ फेऱ्या मारून यानावरील लॅँडर चंद्रावर उतरविले जाणार आहे. या यशाबाबत सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.- अविनाश शिरुडे, अध्यक्ष, स्पेस इंडिया सोसायटीचांद्रयान -२ च्या प्रारंभिक दोन टप्प्यांत मिळालेले यश अतुलनीय आहे. विशेष म्हणजे हे यान पूर्णपणे भारतीय बनावटीचे असून, इस्त्रोसह देशासाठी ही खूपच अभिमानास्पद बाब आहे. प्रारंभीचे दोन टप्पे भारतीय चांद्रयानने यशस्वीपणे पूर्ण केले असून, अखेरच्या टप्प्यात चंद्रावर लॅँडर उतरविण्यात येणार आहे. भारतीय अंतराळ संशोधनाचे अध्वर्यू विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे अभियान होत असल्याने त्यांच्याच नावावरून त्याचे नाव ‘विक्रम लॅँडर’ असे ठेवण्यात आले असून, यापुढील संपूर्ण अभियानही यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो.- गिरीश पिंपळे, खगोलतज्ज्ञचांद्रयान मिशनच्या दुसºया पर्वात भारताने आणि इस्त्रोने मिळविलेले यश ऐतिहासिक असून, त्याचे महत्त्व खूप मोठे आहे. यापूर्वीच्या तिन्ही देशांनी चंद्राच्या उत्तर धृवावर लॅँडर आणि रोव्हर उतरविले होते. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण धृवावर रोव्हर आणि लॅँडर पाठविणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे. दक्षिण धृवावर पाणी सापडण्याची शक्यता अधिक असल्यामुळेच भारताने दक्षिण धृवाची निवड केली आहे. या मोहिमेमुळे भारताला मून मॅपिंग आणि अन्य माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. अपूर्वा जाखडी, खगोलतज्ज्ञइ

टॅग्स :isroइस्रोChandrayaan 2चांद्रयान-2