शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेमुळे यशाला ‘चार चाँद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:58 IST

खगोलक्षेत्रातील संशोधनासाठी स्थापित इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेचे हे ५० वे म्हणजेच सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, यावर्षी ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत मिळविलेले यश हा संस्थेच्या आणि देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे.

नाशिक : खगोलक्षेत्रातील संशोधनासाठी स्थापित इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेचे हे ५० वे म्हणजेच सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, यावर्षी ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत मिळविलेले यश हा संस्थेच्या आणि देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. जगात केवळ तीनच देशांना यापूर्वी हे यश प्राप्त झाले असून, त्यानंतर अशी कामगिरी करणारा भारत हा केवळ चौथा देश असल्याने इस्त्रोच्या या यशाने खरोखरच ‘चार चाँद’ लावले असल्याची भावना नाशिकमधील खगोलतज्ज्ञांनी व्यक्त केली.भारतासाठी सोमवारचा दिवस हा अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीहरीकोटा येथील घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या नाशिकमधील खगोलतज्ज्ञांनीदेखील आनंद व्यक्त करीत भारताच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे भारताने अन्य राष्टÑांच्या तुलनेत अत्यल्प खर्चात या यशाला गवसणी घातली असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले.तांत्रिक बिघाड वेळीच लक्षात येऊन त्यावर सात दिवसात तोडगा काढत चांद्रयान दोन मोहिमेत मिळविलेले यश अद्वितीय आहे. विशेष म्हणजे आधी चंद्रावर पोहोचण्यास ५२ दिवसांचा कालावधी लागणार होता, पण अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्या ऊर्जेने आणि यान झेपावल्याने त्याला आता ४८ दिवसच लागणार आहेत. अतिरिक्त वेग मिळालेला असल्याने आता पृथ्वी आणि चंद्राभोवती ५ ऐवजी ४ फेऱ्या मारून यानावरील लॅँडर चंद्रावर उतरविले जाणार आहे. या यशाबाबत सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.- अविनाश शिरुडे, अध्यक्ष, स्पेस इंडिया सोसायटीचांद्रयान -२ च्या प्रारंभिक दोन टप्प्यांत मिळालेले यश अतुलनीय आहे. विशेष म्हणजे हे यान पूर्णपणे भारतीय बनावटीचे असून, इस्त्रोसह देशासाठी ही खूपच अभिमानास्पद बाब आहे. प्रारंभीचे दोन टप्पे भारतीय चांद्रयानने यशस्वीपणे पूर्ण केले असून, अखेरच्या टप्प्यात चंद्रावर लॅँडर उतरविण्यात येणार आहे. भारतीय अंतराळ संशोधनाचे अध्वर्यू विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे अभियान होत असल्याने त्यांच्याच नावावरून त्याचे नाव ‘विक्रम लॅँडर’ असे ठेवण्यात आले असून, यापुढील संपूर्ण अभियानही यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो.- गिरीश पिंपळे, खगोलतज्ज्ञचांद्रयान मिशनच्या दुसºया पर्वात भारताने आणि इस्त्रोने मिळविलेले यश ऐतिहासिक असून, त्याचे महत्त्व खूप मोठे आहे. यापूर्वीच्या तिन्ही देशांनी चंद्राच्या उत्तर धृवावर लॅँडर आणि रोव्हर उतरविले होते. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण धृवावर रोव्हर आणि लॅँडर पाठविणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे. दक्षिण धृवावर पाणी सापडण्याची शक्यता अधिक असल्यामुळेच भारताने दक्षिण धृवाची निवड केली आहे. या मोहिमेमुळे भारताला मून मॅपिंग आणि अन्य माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. अपूर्वा जाखडी, खगोलतज्ज्ञइ

टॅग्स :isroइस्रोChandrayaan 2चांद्रयान-2