शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पीकविम्याबाबत नव्याने निविदा काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:10 IST

राज्य शासनाने हवामानावर आधारित फळबाग विमा योजनांचे हवामानाचे निकष बदलवून विमा कंपन्यांसोबत २०२० ते २०२२ पर्यंत ३ वर्षाचा करार ...

राज्य शासनाने हवामानावर आधारित फळबाग विमा योजनांचे हवामानाचे निकष बदलवून विमा कंपन्यांसोबत २०२० ते २०२२ पर्यंत ३ वर्षाचा करार केला होता. या कराराने शेतकरी कंगाल आणि कंपन्या मालामाल अशी अवस्था झाली आहे . याबाबत लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर तक्रार केल्यानंतर शासनाने गंभीर दखल घेत २०२१ व २०२२ वर्षाकरिता विमा कंपन्यांसोबत केलेला करार रद्द करण्याचा निर्णय घेतला.

तत्कालीन युती सरकारची फळबाग विमा योजना शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरली होती. २०१९ मध्ये फळबाग विमा योजनेमध्ये तत्कालीन युती शासनाच्या काळात मृगबहार २०१९ मध्ये २९० कोटी रुपयाचे विमा हप्ते भरण्यात आले होते आणि शेतकऱ्यांना विमा परताव्यापोटी २९४ कोटी म्हणजे १०१.५ टक्के प्राप्त झाले होते. रब्बी फळबागा करिता ११२४ रुपये विमा हप्ता भरण्यात आला होता. आणि शेतकऱ्यांना ८३१ कोटी रुपयांची म्हणजे ७३.९३ टक्के विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळाली होती.

मात्र महाविकास आघाडी सरकारने हवामानाचे निकष बदलल्यानंतर मृगबहार २०२० मध्ये २१५ कोटी रुपयांचा विमा हप्ता २ लाख १२ हजार शेतकऱ्यांनी भरला होता. परंतु कंपनी धार्जिण्या निकषामुळे फक्त १२ हजार ९० शेतकऱ्यांना २२ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळाली. विमा कंपन्यांना सरकारने १९३ कोटी रुपयांचा नफा मिळवून दिला. सरकारने चूक दुरुस्त करून पुढील २ वर्षाकरिता विमा कंपन्यांबरोबरचा अन्यायपूर्ण करार रद्द करून ९० टक्के जोखीम स्तराप्रमाणे उंबरठा उत्पादकतेनुसार करार करावा, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे आमदार दिलीप बोरसे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष

बिंदू शर्मा यांनी केली आहे.