शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

ध्वज उतरवण्याचा वाद आणखी चिघळला

By admin | Updated: September 20, 2015 23:22 IST

‘दिगंबर’वर आगपाखड : इष्टदेवतांच्या स्थापनेमुळे निर्वाणी व निर्मोही आखाडे ध्वज ‘जैसे थे’ ठेवणार

नाशिक : येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे ‘उत्तर रामायण’ आता चांगलेच रंगात आले असून, प्रमुख आखाड्यांतील ध्वज उतरवण्यावरून निर्माण झालेला वाद आणखी चिघळला आहे. दिगंबर आखाड्याने त्र्यंबकेश्वरमधील शैवांचे स्नान होण्यापूर्वीच ध्वज उतरवून आगाऊपणा केला असून, हा अपराध सहन केला जाणार नाही, असा इशारा श्री महंत ग्यानदास यांनी दिला, तर दुसरीकडे दिगंबर आखाड्याने मात्र आपण योग्य तेच केल्याची भूमिका मांडली. दरम्यान, यंदा साधुग्राममध्ये इष्टदेवतांची कायमस्वरूपी स्थापना झाल्याने निर्वाणी व निर्मोही या दोन्ही आखाड्यांनी आपले ध्वज ‘जैसे थे’च ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. गेल्या १९ आॅगस्ट रोजी साधुग्राममधील तिन्ही अनी आखाड्यांत दिमाखात ध्वजारोहण सोहळा झाला होता. कुंभमेळा संपल्यानंतर सदर ध्वज विधिवत उतरवले जातील, असे तेव्हा सांगण्यात आले होते. त्यानुसार तृतीय शाहीस्नान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजताच दिगंबर आखाड्यातील श्री महंतांनी एकत्र येत ध्वजाचे पूजन करून ध्वज उतरवला. निर्वाणी व निर्मोही आखाड्याच्या महंतांना हे कळताच ते संतप्त झाले. तिन्ही आखाड्यांचे एकत्र ध्वजारोहण झाले होते. त्यामुळे तिन्ही आखाड्यांनी एकत्र येऊनच ध्वज उतरवायला हवेत. ध्वज उतरवण्याचा विधी असतो. याशिवाय तिन्ही आखाड्यांना महापालिका प्रशासनाने इष्टदेवतांसाठी कायमस्वरूपी चबुतरे बांधून दिल्याने चरणपादुका तेथेच असताना ध्वज उतरवले जाऊ शकत नाहीत, असे या दोन्ही आखाड्यांचे म्हणणे होते. दरम्यान, या विषयावरूनच आज श्री महंत ग्यानदास यांनीही दिगंबर आखाड्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. दिगंबर आखाड्याला परंपरा माहीत नाही. त्र्यंबकेश्वर येथील शैवांचे स्नान होण्यापूर्वीच ध्वज उतरवून त्यांनी पळ काढला आहे. त्यांच्या या अपराधाला क्षमा करणार नाही, असे त्यांनी सांगितले. याशिवाय यंदा साधुग्राममध्ये इष्टदेवतांची कायमस्वरूपी स्थापना झाल्याने निर्वाणी व निर्मोही आखाड्याचे ध्वज ‘जैसे थे’ ठेवले जाणार असून, ते उज्जैनचा कुंभमेळा झाल्यावर जीर्ण झाल्यास बदलले जातील, असा पवित्राही त्यांनी घेतला. (प्रतिनिधी)