शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दत्तकविधानाचा मुद्दा वारंवार छळणार !

By admin | Updated: March 31, 2017 00:58 IST

ब्ल्यू प्रिंट आणि नवनिर्माण या शब्दांनी राज ठाकरे यांच्या मनसेचा पिच्छा पुरवला आता ‘दत्तक’ हा शब्द सत्तारूढ भाजपाला सातत्याने छळणार आहे.

नाशिक :‘माझ्या हाती एकहाती सत्ता द्या, मी नाशिकचे नवनिर्माण करतो’, अशी ग्वाही पाच वर्षांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली आणि नाशिककरांनी मनसेच्या पदरात सर्वाधिक ४० जागा टाकल्या. परंतु, पाच वर्षांत नाशिककरांच्या वाट्याला निराशाच आली. आता त्याचीच पुनरावृत्ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दत्तक विधानामुळे होते की काय, अशी भीती आतापासूनच व्यक्त केली जाऊ लागली आहे. ब्ल्यू प्रिंट आणि नवनिर्माण या शब्दांनी राज ठाकरे यांच्या मनसेचा पिच्छा पुरवला आता ‘दत्तक’ हा शब्द सत्तारूढ भाजपाला सातत्याने छळणार आहे. त्यामुळे पाच वर्षांत दत्तक पुत्राला ‘अच्छे दिन’ आणण्याचे आव्हान भाजपा सत्तेपुढे असणार आहे. महापालिकेत भाजपाचे सर्वाधिक ६६ सदस्य निवडून आले आहेत. त्याखालोखाल शिवसेनेचे ३५, कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा, मनसेचे पाच, अपक्ष तीन आणि रिपाइंचा एक सदस्य निवडून आला आहे. भाजपाला विरोधकांच्या कुबड्यांची अजिबात गरज भासणार नाही. त्यामुळे विविध सत्तापदे सहजगत्या उपभोगता येणे शक्य होणार आहे. भाजपाकडे निर्विवाद बहुमत असल्याने कोणत्याही योजना राबविण्यात अडसर येणार नाही. परंतु, हाती-तोंडातून आलेला घास हिरावून न्यावा तशी अवस्था झालेल्या शिवसेनेकडून मात्र भाजपाच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर असणार आहे. शिवाय, अल्प संख्येने असले तरी कॉँग्रेस-राष्ट्रवादी व मनसे यांच्याकडे अभ्यासू व आक्रमक असे सदस्य आहेत. त्यामुळे भाजपाला मनमानीपणे कोणताही निर्णय घेणे सोपे निश्चितच नाही. यंदा सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांमध्ये आक्रमक असे सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे सभागृह चालविण्यासही पीठासन अधिकारी असलेल्या महापौरांची चांगलीच कसोटी लागणार आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली आणि आपण स्वत: जातीने लक्ष पुरविणार असल्याचे सांगून टाकले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला नाशिककरांनी जोरदार प्रतिसाद देत भाजपाच्या पारड्यात तब्बल ६६ जागा टाकल्या. आता महापालिकेत भाजपा सत्तारूढ झाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून सत्ताधाऱ्यांना ‘दत्तक’ या शब्दाचे ओझे वाटू लागले आहे. महापौर रंजना भानसी व उपमहापौर प्रथमेश गिते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरू केलेल्या खातेनिहाय आढावा बैठकीत वारंवार ‘दत्तक’ नाशिकची जाणीव अधिकाऱ्यांना करून दिली जात आहे आणि त्यातूनच विकासकामांचा दबावही प्रशासनावर टाकला जाऊ लागला आहे. मनसेच्या सत्ता येण्यापूर्वी राज ठाकरे यांनीही आपण दर महिन्याला नाशिकला भेट देणार असल्याचे जाहीर केले होते. सुरुवातीला राज यांनी दाखविलेला उत्साह नंतर आटला आणि पुढे राज यांची नाशिक भेट कुचेष्टेचा विषय बनत गेली. आता भाजपाच्या सत्ताकाळात मुख्यमंत्र्यांनी आपल्या दत्तक पुत्राकडे जातीने लक्ष दिले नाही तर मनसेसारखीच स्थिती भाजपाचीही होऊ शकते. नाशिककरांच्या अपेक्षा वाढविल्या तर काय होते, याची कटू अनुभूती राज ठाकरे यांनी घेतलेली आहे. त्यामुळे सत्तारूढ झालेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांपुढे ‘दत्तक’ विधानाचे मोठे आव्हान असणार आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने पुढील पाच वर्षांत आपली भूमिका काय असेल, याची झलक दाखविण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत पहारेकऱ्याची भूमिका निभावणाऱ्या भाजपाच्या नाशिकमधील सत्तेवर सेनेचा जागता पहारा राहणार असल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे बहुमतात असले तरी भाजपाला विरोधीपक्षाच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. (समाप्त)