शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सिंचन, पेयजलाचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: January 10, 2016 22:14 IST

येवल्याचे पाणी पेटणार : सोमवारी जलहक्क संघर्ष समितीचे आमरण उपोषण

 येवला : तालुक्याला थोडासा दिलासा देऊ शकणारे पालखेड डाव्या कालव्याचे पाणीही आता येवल्याला मिळणे मुश्कील झाले आहे. या परिस्थितीत पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाहीतर येवल्याला पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील होईल. सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या येवला तालुक्यातील सिंचनाचा, पेयजलाचा एकूण प्रश्न ऐरणीवर आला आहे. येवल्याचा सिंचनाचा व पेयजलाचा प्रश्न सोडवायचा असेल तर १६ मागण्या मान्य करा व येत्या २० वर्षांतील येवला तालुका व शहराची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचा प्रश्न सोडवावा, यासाठी समितीचे कार्यकर्ते येवला तहसील कार्यालयासमोर ११ आॅगस्टपासून आमरण उपोषणास बसणार आहेत. या विषयाचे निवेदन जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री छगन भुजबळ तसेच विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी, लघुसिंचन जलसंधारणचे मुख्य अभियंता के. एस. ठाकरे, गिरणा खोरे प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता अनिल मोरे, प्रांताधिकारी वासंती माळी, तहसीलदार शरद मंडलिक यांना देण्यात आले. जलहक्क संघर्ष समितीने सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात कोळगाव येथील कोळगंगा नदीवर असलेल्या पाझर तलावाची क्षमता दुप्पट करावी, मांजरपाडा-१ प्रकल्प पूर्ण करून पुणेगाव-डोंगरगाव कालव्याला पाणी पोहोच करण्याचा कालबद्ध कार्यक्र म जाहीर करावा, संपूर्ण तालुक्यातील अनकाई डोंगराच्या रांगा आणि दक्षिणेस असलेल्या गोदावरी नदीदरम्यान तालुक्यातील सर्व नदीपात्रांमध्ये पाच दलघफूचे सीमेंट साखळी बंधारे बांधावे, सर्व नद्या- नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करावे व पाणी अडवावे आदि मागण्यांच्या समावेश आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी तहसील कार्यालयासमोर घंटानाद केला जाऊन मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर उपोषणास प्रारंभ होणार आहे, अशी माहिती देण्यात आली. तसेच ज्या गावांची पालखेडच्या पाण्यातून आरक्षित बंधारे भरून देण्याची मागणी आहे अशा गावांमधून शेतकरीवर्गाने व सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे व आंदोलनात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)