शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी यंत्रणेचा बेजबाबदारपणा़़़

By admin | Updated: June 18, 2014 01:12 IST

सरकारी यंत्रणेचा बेजबाबदारपणा़़़

नाशिक, दि. १७ - केवळ पोलीसच नाही तर रेल्वे पोलीस भरती, सैन्य भरती, सीआरएसएफ , वनभरती या पदांसाठी लेखी परीक्षेबरोबरच शारीरिक चाचणी आवश्यक आहे़ हे खरे असले तरी शारीरिक चाचणी घेण्याच्या वेळेबाबत भरीत प्रक्रिया राबविणाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याचे मुंबई येथील उदाहरणांवरून दिसून येते़ या भरती प्रक्रियेत मृत्यू पावलेल्या युवकाच्या मृत्यूस संबंधित सरकारी यंत्रणेला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून केली जाते आहे़रेल्वे भरती प्रक्रियेदरम्यान युवकाचा मृत्यूपोलीस भरतीप्रमाणेच रेल्वे पोलिसांचीही भरती प्रक्रिया राबविली जाते़ पुण्यातील ताडीवाला रोडवरील मैदानात रेल्वे भरतीच्या शारीरिक चाचणीत धावताना एका तरु णाचा मृत्यू झाला. ही घटना ताडीवाला रोडवरील मैदानात सोमवारी सकाळी घडली.स्वप्नील राजभिये (रा. गोंदिया) असे या तरुणाचे नाव आहे. रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे भरती विभागाकडून ग्रेड बी पदासाठी आज भरती सुरू होती. स्वप्नील सकाळी सात वाजताच ताडीवाला रोड येथील मैदानात आला होता. या चाचणीत निर्धारित वेळेत एक हजार मीटर धावायचे होते. साधारण नऊच्या सुमारास स्वप्नीलचा क्र मांक आला. त्याने धावण्यास सुरु वात केली. जिवाच्या आकांताने तो धावत होता. पण हे अंतर पूर्ण करण्यापूर्वीच तो ट्रकवर कोसळला. पण उठून तो पुन्हा धावू लागला आणि त्याने हे अंतर पूर्ण केले. त्यानंतर दोन ते तीन मिनिटातच तो पुन्हा खाली कोसळला. त्याला तत्काळ तेथील तंबूत हलविण्यात आले त्या ठिकाणी त्याला सलाईन लावण्यात आले तरी तो शुद्धीवर येऊ शकला नाही. त्याला रिक्षाने रेल्वे रु ग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. भरतीच्या ठिकाणी रुग्णवाहिका नसल्याचा आरोप भरतीसाठी आलेल्या तरुणांनी केला. यावर दुसऱ्या कामासाठी रुग्णवाहिका बाहेर गेली असल्याने ती उपलब्ध होऊ शकली नसल्याचे रेल्वे भरती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.पोलीस भरतीची शिक्षा मृत्यूगडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील युवक पोलीस व्हायचं स्वप्नही पाहू शकत नाहीत. कारण पोलीस भरतीत अपयश आल्यास त्यांच्या स्वप्नाची भयानक शिक्षा म्हणजे मृत्यूही असू शकते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील अनेक युवक पोलिसात भरती होण्याचे स्वप्न पाहतात़ या भरती प्रक्रियेत पास झाले तर चांगले, पण समजा अपयश आले तर? मग नापास झालेल्यांचा किंवा हे स्वप्न पाहणाऱ्यांचा प्रवास मृत्यूच्या दाढेत येऊन थांबतो. काही वर्षांपूर्वी धानोरा तालुक्यातील बेंडीकणार येथील तरुण बाजीराव कोवाची नावाच्या तरुणाला अत्यंत निर्दयतेने ठार मारण्यात आले होते़ बाजीरावचा दोष इतकाच की त्याने पोलिसांत भरती होण्याचं स्वप्न पाहण्याचा गुन्हा केला अन् दुर्दैवाने त्यात अपयशी ठरलाग़डचिरोली भागातील नक्षलवादी पोलिसांना आपले शत्रू मानतात़ त्यांच्यात सामिल होण्याची स्वप्न बाजीरावने पाहिले, कागदपत्रे घेऊन गडचिरोली गावात भरती प्रक्रियेची विचारपूस करण्यासाठी तो गेल्याचा त्यांना राग आला़ पाच नक्षलवाद्यांनी त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांसमोर त्याला फ रफटत जंगलात नेले़ एका झाडाला बांधून मरेपर्यंत त्याला मारले आणि त्याचा मृतदेह गावात आणून टाकला़ पोलिसात जाणाऱ्या युवकांना नक्षलवाद्यांनी दिलेला एक इशाराच होता़ पोलीस भरतीत अपयश आल्यास असे अनेक बाजीराव कायमचे गावाला आणि आई-वडिलांना कायमचे मुकतात कारण भय इथले संपत नाही. काही युवक मृत्यूच्या भीतीने गावाकडे परतत नाहीत. त्यांच्या आईवडिलांनाही नक्षलवादी त्रास देतात. नक्षलवाद्यांची स्थानिक युवकांवर करडी नजर असते. भरतीला गेलेला युवक परतला की, त्याचा अंत ठरवण्यात नक्षलवादी टपलेले असतात.