शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी एकरकमी तडजोड कर्जफेड योजना आणावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:36 IST

पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २००५ पासून जिल्ह्यात अवेळी पाऊस येण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यात ...

पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २००५ पासून जिल्ह्यात अवेळी पाऊस येण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यात दुष्काळही पडला, यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इच्छा असूनही शेतकऱ्यांना बॅंकांचे कर्ज फेडता आलेले नाही. गेल्या काही वर्षांपासून विविध सहकारी, खासगी आणि सरकारी बॅंकांमार्फत शेतकऱ्यांविरोधात न्यायालयात दावे दाखल केले जात आहेत. यामुळे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत. एका सरकारी बॅंकेने शेतकऱ्यांसाठी एकरकमी कर्जफेड योजना आणली असून, शेतकऱ्यांनी कर्जफेड केल्यानंतर तीच बँक पुन्हा शेतकऱ्यांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे कर्जही देत आहे. मात्र जिल्हा सहकारी बँक आणि इतर सरकारी बॅंकांकडे अशी योजना नाही. अनेक शेतकरी एकरकमी कर्जफेड करतात; मात्र त्यांच्या सिव्हिल रिपोर्टमध्ये ते पूर्वी थकबाकीदार असल्याचा उल्लेख होत असल्याने एकरकमी कर्जफेड करूनही शेतकऱ्यांना शेतीसाठी पुन्हा भांडवल उपलब्ध होत नसल्याने असे शेतकरी खासगी सावकारांकडे जातात आणि पुन्हा त्यांच्यावर कर्जाचा बोजा चढतो. याशिवाय सर्व बॅंकांचे एकरकमी तडजोडीचे प्रस्ताव सारखे नसल्यानेही शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्व बॅंकांनी एकरकमी तडजोड योजना सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अर्जुन बोराडे, संतू पाटील झांबरे, बापूराव पगारे, भीमराव बारांडे, भाऊसाहेब भंडारे, सुकदेव पागेरे, दगू गवारे आदींच्या सह्या आहेत.