शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

केंद्राचा हिस्सा न मिळाल्याने आंतरजातीय जोडपे हिरमुसले

By श्याम बागुल | Updated: July 19, 2019 17:13 IST

समाजातील जातीयता नष्ट करण्याच्या हेतूने सरकारच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची योजना राबविली जात आहे.

ठळक मुद्देशासन अनुदानापासून वंचित : अडीचशे प्रकरणे प्रलंबितकेंद्र सरकारकडून त्यांच्या वाट्याचा निधीच राज्य सरकारला देण्यात आलेला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : समाजकल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना दिले जाणारे प्रोत्साहनपर अनुदान गेल्या वर्षभरापासून बंद पडले असून, शासनाने या अनुदानात वाढ केली, परंतु केंद्र सरकारने त्यांच्याकडील हिस्स्याची रक्कम राज्य सरकारला न दिल्यामुळे एक वर्षापासून सुमारे अडीचशे आंतरजातीय जोडपे शासनाच्या या योजनेच्या लाभापासून वंचित राहून समाजकल्याण विभागाचे उंबरठे झिजवित आहेत.

समाजातील जातीयता नष्ट करण्याच्या हेतूने सरकारच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची योजना राबविली जात आहे. केंद्र व राज्य सरकारकडून यासाठी निम्मे निम्मे अनुदान देण्याच्या या योजनेसाठी सर्वसाधारण गटातील कोणत्याही एका व्यक्तीने मागासवर्गीय व्यक्तीशी विवाह केल्यास पात्र ठरविली जाते. त्याचबरोबर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तींचा विवाहदेखील त्यासाठी पात्र ठरविण्यात आला असून, इतर मागासवर्गीय व अन्य मागासवर्गीयांनादेखील या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्यासाठी वर व वधू अशा दोहोंना मिळून पन्नास हजार रुपये त्यांच्या जॉइंट खात्यावर दिले जातात. सदरचे पैसे धनादेशाद्वारे दिले जातात व या पैशांवर दोहोंचा हक्क असल्यामुळे त्यासाठी त्यांनी संयुक्त खाते उघडणे सक्तीचे करण्यात आले आहे. शिवाय आंतरजातीय विवाहासाठी दोघांचेही जातीचे पुरावे गरजेचे मानले गेले आहेत. शासनाच्या या योजनेचा गेल्या अनेक वर्षांपासून हजारो आंतरजातीय जोडप्यांनी लाभ घेतला असला तरी, एप्रिल २०१८ पासून या योजनेसाठी केंद्र सरकारकडून त्यांच्या वाट्याचा निधीच राज्य सरकारला देण्यात आलेला नाही. नाशिक जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला राज्य सरकारच्या हिश्श्याचे ५० लाख रुपये गेल्या वर्षीच प्राप्त झालेले आहेत, तथापि, केंद्र सरकारचा हिस्सा प्राप्त झाल्याशिवाय आंतरजातीय जोडप्यांना अनुदान अदा करू नये, असे समाजकल्याण आयुक्तांचे निर्देश आहेत. परिणामी केंद्राकडून निधी न मिळाल्यामुळे गेल्या वर्षभरापासून एकाही जोडप्याला शासकीय मदत मिळू शकली नाही. गेल्या वर्षभरात समाजकल्याण विभागाकडे आंतरजातीय विवाह केलेल्या अडीचशेहून अधिक जोडप्यांनी शासकीय अनुदानासाठी कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज केले आहेत. तथापि, एकाही जोडप्याला त्याचा लाभ मिळालेला नाही. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनीही यास दुजोरा देत, शासनाकडून अनुदानाची रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे सांगितले.

टॅग्स :Governmentसरकारnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद