शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

शिरसमणीत तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:01 IST

कळवण : तालुक्यातील शिरसमणी या गावाला पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाईवर मात करण्यासाठी महिलांना खासगी विहिरीवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांची चांगलीच दमछाक होत आहे. येथे पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या तरी त्यांना ग्रहण लागत गेल्याने गावाला पाणीटंचाई पाचवीला पूजली आहे.

ठळक मुद्देकळवण : नियोजनाचा अभाव, लाखो रुपये खर्च करूनही योजना असफल

कळवण : तालुक्यातील शिरसमणी या गावाला पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाईवर मात करण्यासाठी महिलांना खासगी विहिरीवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांची चांगलीच दमछाक होत आहे. येथे पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या तरी त्यांना ग्रहण लागत गेल्याने गावाला पाणीटंचाई पाचवीला पूजली आहे.शिरसमणी गावातील रस्त्यावरील व गावाजवळील शेतात शेतकऱ्याचे पाणी सुरू झाले की, घरात असेल-नसेल ते रिकामे भांडे भरून घेण्यासाठी महिलांची सकाळी व सायंकाळी धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्रम पाण्याभोवती केंद्रित झाला आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचे नामदेव शिरसाठ यांनी सांगितले. गावात पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली; मात्र ती अपयशी ठरली. गावात असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला पाणी कमी आहे, त्या विहिरींची खोली करणे गरजेचे होते. त्या विहिरीला पाणी लागले असते असे ग्रामस्थांनी सांगितले.पाणीपुरवठा करण्यासाठी सहा लाख रुपये खर्च करून नवीन विहिरीचे काम केले; मात्र पाणी लागले नसल्याने शासनाचा निधी वाया गेला असल्याचे सांगून ग्रामपंचायतीच्या व्यवस्थेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त करून पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी आशाबाई मोहिते, वैशाली शिरसाठ, जिजाबाई पाटोळे, मंगलाबाई पाटोळे, सोनाली मोहिते, सविता मोहिते व राजेंद्र मोहिते यांनी केली आहे . जीव धोक्यात घालून मिळते हंडाभर पाणीगेल्या काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून धावणाºया एका वाहनाने पाणी घेऊन जाणाºया आदिवासी महिलेला व मुलाला धडक मारल्याने दुखापत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिरसमणी हे ओतूर खोºयातील महत्त्वपूर्ण गाव आहे. ओतूर धरणाच्या गळतीचा प्रश्न कायमचा सुटल्यास शिरसमणी गावाचा पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. धरणात पाणी असल्यास या परिसरात मुबलक पाणी असते; मात्र गळतीतून जानेवारी अखेर सर्व पाणी वाहून गेल्यावर या भागातील नरूळ, मेहदर, ओतूर, कुंडाणे, भुसणी, शिरसमणी, जिरवाडे, कळवण खुर्द आदी गावांना पाच महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सुनील वाघ यांचीदि. २४ मार्चपासून विहीर अधिग्रहित केली आहे. त्या विहिरीवरून शिरसमणी गावाला पाणीपुरवठा सुरू आहे. पंचायत समितीमध्ये आयोजित बैठक किंवा कामकाजानिमित्ताने जावे लागते, त्यामुळे त्या दिवशीग्रामपंचायतीमध्ये जात नाही. अन्य दिवशी मी नियमित शिरसमणी ग्रामपंचायत कार्यालयात जाते.- ए. पी. गोराणेग्रामसेविका, शिरसमणीपाणीटंचाईबाबत ग्रामपंचायत स्तरावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. ग्रामपंचायतीने लाखो रु पये खर्च करून नवीन विहीर खोदली आहे; परंतु पाणी लागले नाही. ग्रामसेवक आठवड्यातून एखाद्याच दिवशी चमकत असल्याने उडवाउडवीची उत्तरे देतात. याबाबत तक्र ार कोणाकडे करायची ? हा मोठा प्रश्न आहे.- नामदेव शिरसाठ,शिरसमणी