शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

शिरसमणीत तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:01 IST

कळवण : तालुक्यातील शिरसमणी या गावाला पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाईवर मात करण्यासाठी महिलांना खासगी विहिरीवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांची चांगलीच दमछाक होत आहे. येथे पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या तरी त्यांना ग्रहण लागत गेल्याने गावाला पाणीटंचाई पाचवीला पूजली आहे.

ठळक मुद्देकळवण : नियोजनाचा अभाव, लाखो रुपये खर्च करूनही योजना असफल

कळवण : तालुक्यातील शिरसमणी या गावाला पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाईवर मात करण्यासाठी महिलांना खासगी विहिरीवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांची चांगलीच दमछाक होत आहे. येथे पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या तरी त्यांना ग्रहण लागत गेल्याने गावाला पाणीटंचाई पाचवीला पूजली आहे.शिरसमणी गावातील रस्त्यावरील व गावाजवळील शेतात शेतकऱ्याचे पाणी सुरू झाले की, घरात असेल-नसेल ते रिकामे भांडे भरून घेण्यासाठी महिलांची सकाळी व सायंकाळी धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्रम पाण्याभोवती केंद्रित झाला आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचे नामदेव शिरसाठ यांनी सांगितले. गावात पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली; मात्र ती अपयशी ठरली. गावात असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला पाणी कमी आहे, त्या विहिरींची खोली करणे गरजेचे होते. त्या विहिरीला पाणी लागले असते असे ग्रामस्थांनी सांगितले.पाणीपुरवठा करण्यासाठी सहा लाख रुपये खर्च करून नवीन विहिरीचे काम केले; मात्र पाणी लागले नसल्याने शासनाचा निधी वाया गेला असल्याचे सांगून ग्रामपंचायतीच्या व्यवस्थेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त करून पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी आशाबाई मोहिते, वैशाली शिरसाठ, जिजाबाई पाटोळे, मंगलाबाई पाटोळे, सोनाली मोहिते, सविता मोहिते व राजेंद्र मोहिते यांनी केली आहे . जीव धोक्यात घालून मिळते हंडाभर पाणीगेल्या काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून धावणाºया एका वाहनाने पाणी घेऊन जाणाºया आदिवासी महिलेला व मुलाला धडक मारल्याने दुखापत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिरसमणी हे ओतूर खोºयातील महत्त्वपूर्ण गाव आहे. ओतूर धरणाच्या गळतीचा प्रश्न कायमचा सुटल्यास शिरसमणी गावाचा पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. धरणात पाणी असल्यास या परिसरात मुबलक पाणी असते; मात्र गळतीतून जानेवारी अखेर सर्व पाणी वाहून गेल्यावर या भागातील नरूळ, मेहदर, ओतूर, कुंडाणे, भुसणी, शिरसमणी, जिरवाडे, कळवण खुर्द आदी गावांना पाच महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सुनील वाघ यांचीदि. २४ मार्चपासून विहीर अधिग्रहित केली आहे. त्या विहिरीवरून शिरसमणी गावाला पाणीपुरवठा सुरू आहे. पंचायत समितीमध्ये आयोजित बैठक किंवा कामकाजानिमित्ताने जावे लागते, त्यामुळे त्या दिवशीग्रामपंचायतीमध्ये जात नाही. अन्य दिवशी मी नियमित शिरसमणी ग्रामपंचायत कार्यालयात जाते.- ए. पी. गोराणेग्रामसेविका, शिरसमणीपाणीटंचाईबाबत ग्रामपंचायत स्तरावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. ग्रामपंचायतीने लाखो रु पये खर्च करून नवीन विहीर खोदली आहे; परंतु पाणी लागले नाही. ग्रामसेवक आठवड्यातून एखाद्याच दिवशी चमकत असल्याने उडवाउडवीची उत्तरे देतात. याबाबत तक्र ार कोणाकडे करायची ? हा मोठा प्रश्न आहे.- नामदेव शिरसाठ,शिरसमणी