शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
3
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
4
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
5
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
6
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
7
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
8
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
9
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
10
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
11
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
12
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
13
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
16
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
17
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
18
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
19
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
20
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा

शिरसमणीत तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:01 IST

कळवण : तालुक्यातील शिरसमणी या गावाला पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाईवर मात करण्यासाठी महिलांना खासगी विहिरीवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांची चांगलीच दमछाक होत आहे. येथे पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या तरी त्यांना ग्रहण लागत गेल्याने गावाला पाणीटंचाई पाचवीला पूजली आहे.

ठळक मुद्देकळवण : नियोजनाचा अभाव, लाखो रुपये खर्च करूनही योजना असफल

कळवण : तालुक्यातील शिरसमणी या गावाला पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाईवर मात करण्यासाठी महिलांना खासगी विहिरीवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांची चांगलीच दमछाक होत आहे. येथे पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या तरी त्यांना ग्रहण लागत गेल्याने गावाला पाणीटंचाई पाचवीला पूजली आहे.शिरसमणी गावातील रस्त्यावरील व गावाजवळील शेतात शेतकऱ्याचे पाणी सुरू झाले की, घरात असेल-नसेल ते रिकामे भांडे भरून घेण्यासाठी महिलांची सकाळी व सायंकाळी धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्रम पाण्याभोवती केंद्रित झाला आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचे नामदेव शिरसाठ यांनी सांगितले. गावात पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली; मात्र ती अपयशी ठरली. गावात असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला पाणी कमी आहे, त्या विहिरींची खोली करणे गरजेचे होते. त्या विहिरीला पाणी लागले असते असे ग्रामस्थांनी सांगितले.पाणीपुरवठा करण्यासाठी सहा लाख रुपये खर्च करून नवीन विहिरीचे काम केले; मात्र पाणी लागले नसल्याने शासनाचा निधी वाया गेला असल्याचे सांगून ग्रामपंचायतीच्या व्यवस्थेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त करून पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी आशाबाई मोहिते, वैशाली शिरसाठ, जिजाबाई पाटोळे, मंगलाबाई पाटोळे, सोनाली मोहिते, सविता मोहिते व राजेंद्र मोहिते यांनी केली आहे . जीव धोक्यात घालून मिळते हंडाभर पाणीगेल्या काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून धावणाºया एका वाहनाने पाणी घेऊन जाणाºया आदिवासी महिलेला व मुलाला धडक मारल्याने दुखापत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिरसमणी हे ओतूर खोºयातील महत्त्वपूर्ण गाव आहे. ओतूर धरणाच्या गळतीचा प्रश्न कायमचा सुटल्यास शिरसमणी गावाचा पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. धरणात पाणी असल्यास या परिसरात मुबलक पाणी असते; मात्र गळतीतून जानेवारी अखेर सर्व पाणी वाहून गेल्यावर या भागातील नरूळ, मेहदर, ओतूर, कुंडाणे, भुसणी, शिरसमणी, जिरवाडे, कळवण खुर्द आदी गावांना पाच महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सुनील वाघ यांचीदि. २४ मार्चपासून विहीर अधिग्रहित केली आहे. त्या विहिरीवरून शिरसमणी गावाला पाणीपुरवठा सुरू आहे. पंचायत समितीमध्ये आयोजित बैठक किंवा कामकाजानिमित्ताने जावे लागते, त्यामुळे त्या दिवशीग्रामपंचायतीमध्ये जात नाही. अन्य दिवशी मी नियमित शिरसमणी ग्रामपंचायत कार्यालयात जाते.- ए. पी. गोराणेग्रामसेविका, शिरसमणीपाणीटंचाईबाबत ग्रामपंचायत स्तरावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. ग्रामपंचायतीने लाखो रु पये खर्च करून नवीन विहीर खोदली आहे; परंतु पाणी लागले नाही. ग्रामसेवक आठवड्यातून एखाद्याच दिवशी चमकत असल्याने उडवाउडवीची उत्तरे देतात. याबाबत तक्र ार कोणाकडे करायची ? हा मोठा प्रश्न आहे.- नामदेव शिरसाठ,शिरसमणी