शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

अपुऱ्या निधीमुळे रस्त्यांच्या नूतनीकरणाऐवजी डागडुजीवरच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:19 IST

भगवान गायकवाड दिंडोरी : तालुक्यात रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात जाळे असले तरी या रस्त्यांची दुरवस्था होत ते खिळखिळे ...

भगवान गायकवाड

दिंडोरी : तालुक्यात रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात जाळे असले तरी या रस्त्यांची दुरवस्था होत ते खिळखिळे झाले आहेत. दरवर्षी रस्त्यांवर लाखो रुपये खर्च करून मलमपट्टी केली जाते, मात्र पावसाळ्यात पुन्हा ‘जैसे थे’ निर्माण होत आहे. गेली दहा वर्षे आमदार वेगळ्या पक्षाचे व सत्ता वेगळ्या पक्षाची यामुळे रस्ते विकासाला अपुरा निधी मिळत नूतनीकरणऐवजी डागडुजीवरच भागवावे लागत होते. तालुका सर्वच पातळीवर विकासाच्या दृष्टीने घोडदौड करत असताना त्यास रस्त्याच्या दुरवस्थेने खीळ बसत आहे. आता मात्र मतदारसंघातील आमदारांना विधानसभेत उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने सर्वच रस्त्यांचे नूतनीकरण होत रस्त्यांचे भाग्य उजळावे, अशी अपेक्षा तालुक्यातील जनता व्यक्त करत आहे.

तालुक्यातील वलखेड फाटा, ननाशी ,दिंडोरी-उमराळे, दिंडोरी -निळवंडी- हातनोरे, दिंडोरी-मोहाडी, दिंडोरी-पिंपळगाव या प्रमुख रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून, या रस्त्यांवर वाहने चालवणे मोठे जिकिरीचे झाले आहे. या सर्व रस्त्यांची कामे मंजूर असून, दिवाळीत ही कामे सुरू होतील असे सांगितले जात आहे. मात्र या कामांची गुणवत्ता राखणे अपेक्षित आहे. दिंडोरी तालुक्यात औद्योगिकरण व शेतीचा मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याने वाहनांची वर्दळ सर्वच रस्त्यांवर लक्षणीय आहे. तालुक्यातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याने जोडलेले आहे, परंतु यातील बहुतांशी रस्त्यांची वाताहत झाली आहे. बहुतांशी रस्त्यांचे मजबुतीकरण आवश्यक आहे. दिंडोरी शहरास जोडणाऱ्या ननाशी, उमराळे, हातनोरे, मोहाडी, पिंपळगाव या रस्त्यांचे मजबुतीकरण व नूतनीकरण गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी या सर्वच रस्त्यांची कामे झाली आहेत. मात्र गुणवत्ता न राखली गेल्याने रस्त्यांची वाट लागली आहे. या प्रमुख रस्त्यांसोबतच गावागावांना जोडणारे रस्तेही नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात राजापूर ते लोखंडेवाडी तसेच जोपूळ ते जोपूळ फाटा, जोपूळ ते चिंचखेड, तळेगाव ते इंदोरे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वागदेव फाटा ते म्हेळुस्के ओझे, लखमापूर ते म्हेळुस्के, लखमापूर फाटा ते कादवा कारखाना, बोपेगाव -खेडगाव, खेडगाव-शिंदवड आदी अनेक रस्ते दुरुस्ती व नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. नाशिक-दिंडोरी-वणी या रस्त्याचे चौपदरीकरण होणे अत्यावश्यक आहे. मात्र अक्राळे फाटा ते वणी कळवण रस्त्याचे काम हायब्रीड एन्यूटीतून होत असून, त्यात किरकोळ रुंदीकरण होत आहे व हे काम तीन वर्षे झाली तरी अद्याप पूर्ण झाले नाही. विविध त्रुटींमुळे या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे. दिंडोरी शहरात अजून काम सुरू केले नसून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. वणी शहरात काम रखडले आहे. चिंचबरी ते अक्राळे रस्त्यावर अनेक खड्डे पडले असून, वारंवार मलमपट्टी केली जात आहे. आता आमदार नरहरी झिरवाळ यांना विधानसभा उपाध्यक्ष म्हणून संधी मिळाल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत व त्यांनीही सर्वच रस्त्यांचे कामांना मंजुरी मिळवली आहे, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाने निधीच्या कात्रीने वर्ष वाया गेले असून, आता तरी निधी मिळून रस्त्याची कामे होण्याची अपेक्षा आहे. खासदार भारती पवार यांनीही दोन रस्ते पंतप्रधान ग्रामसडक अंतर्गत टाकल्याने त्या रस्त्यांचे भाग्य उजळण्याची अपेक्षा आहे.

इन्फो

ठेकेदारांनी लावली रस्त्यांची वाट

दिंडोरी-उमराळे, दिंडोरी-पालखेड -पिंपळगाव, दिंडोरी-मोहाडी, वलखेड फाटा-ननाशी, लखामपूर फाटा-कादवा-बोपेगाव, खेडगाव-शिंदवड हे रस्ते काही वर्षांपूर्वीच नव्याने झाले, मात्र या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने त्यांची काही दिवसांत वाट लागली. काही रस्त्यांना सीलकोट न केल्याने दुरवस्था झाली. यातील काही ठेकेदारांनी कमी निविदा भरत (बिलो) कामे घेतली. मात्र ती सुरूच केली नाही, तर काहींनी गुणवत्ता राखली नाही. वलखेड फाटा-निगडोळ रस्त्याच्या कामाची तक्रार थेट विधानसभेत झाली, तरीही काही फरक पडला नाही. बांधकाम विभागाने लाखोंची दंडात्मक कारवाई केली, त्यास हे ठेकेदार बधले नाही. त्यांच्या मनमानीमुळे रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.

फोटो- १६ दिंडोरी खबरबात

160821\16nsk_11_16082021_13.jpg

फोटो- १६ दिंडोरी खबरबात