शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

312 प्रकरणांचा झटपट निकाल

By admin | Updated: July 3, 2014 00:09 IST

312 प्रकरणांचा झटपट निकाल

विजय मोरेनाशिक, दि. ०२ - महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्हाभरात १६ ते ३० जून दरम्यान ‘न्याय आपल्या दारी’ या फि रते विधी सेवा व लोकअदालत (मोबाईल व्हॅन) उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते़ जिल्ह्यातील विविध तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये दिवाणी व फ ौजदारी स्वरूपाचे एकूण ६७३ दावे ठेवण्यात आले होते़ त्यापैकी ३१२ दावे सामोपचाराने निकाली निघाल़े या निकाली दाव्यांच्या आकडेवारीवरून सामोपचाराने वाद मिटविण्यात पक्षकारांकडून चांगला प्रतिसाद दिला जात असल्याचे समोर येते़विधी सहाय्य हे न्यायदान प्रक्रियेचे एक अत्यावश्यक अंग आहे़ या महत्त्वाच्या अंगाचे उद्दिष्ट म्हणजे समाजातील दुर्बल पददलित घटकांना न्याय मिळवून देणे़ जोपर्यंत नागरिकांना शिक्षण व रोजगारासारखे मुलभूत अधिकार तसेच त्यांना सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्राप्त करून देता येत नाही, तोपर्यंत लोकशाहीस खरा अर्थ प्राप्त होत नाही़ नागरिकांच्या विशेषत: दुर्बल व गोरगरीबांच्या हक्कांचे व हितांचे रक्षण व जोपासना करण्याचे काम महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमार्फ त केले जाते़समाजातील निरक्षरतेमुळे बहुसंख्य नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव नसते़ त्यांना या अधिकारांची जाणीव करून देण्याची तसेच गरजूंना विधीसेवा पुरविण्याची आवश्यकता आहे़ दुर्बल घटक तसेच गरीब व गरजू लोकांना त्यांना हवे असलेल्या विधी सहाय्याकरीता विधी प्राधिकरणाकडे जाऊन दाद मागणे अवघड ठरत असल्यास विधी प्राधिकरणच त्यांच्या दाराशी जाईल़ या गोष्टींची जाणीव ठेवून ‘विधीसाक्षरता’ व ‘लोकअदालत’ यासाठी फि रत्या वाहनाची संकल्पना पुढे आली व तिची अंमलबजावणी सुरू झाली़जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरात १६ ते ३० जूनदरम्यान मोफ त विधी सेवा केंद्र आणि लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते़ या कालावधीत ‘न्याय आपल्या दारी’ ही मोबाइल व्हॅन प्रत्येक तालुक्यात नेऊन लोकअदालत घेण्यात आली़ त्यात फे रफ ारासंबंधी प्रकरणापासून ते जमाबंदी प्रकरणे, किरकोळ आपसात मिटविण्याजोगे फ ौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, बँक कर्ज प्रकरणे, आणि दाखलपूर्व किंवा दाखल झालेली प्र्रकरणे यांचा समावेश होता़ जिल्ह्यात १६ ठिकाणी गेलेल्या फि रत्या विधी सेवा केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या लोकअदालतीत ६४७ फ ौजदारी व २६ दिवाणी असे एकूण ६७३ दावे ठेवण्यात आले होते़ त्यौपकी ३१२ दावे सामोपचाराने निकाली निघाले़ त्यात २९५ फ ौजदारी व १७ दिवाणी दाव्यांचा समावेश होता़ या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश इंदिरा जैन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे, वकील संघाचे पदाधिकारी तसेच तालुका न्यायालयातील न्यायाधीश, कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले़