शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

312 प्रकरणांचा झटपट निकाल

By admin | Updated: July 3, 2014 00:09 IST

312 प्रकरणांचा झटपट निकाल

विजय मोरेनाशिक, दि. ०२ - महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्हाभरात १६ ते ३० जून दरम्यान ‘न्याय आपल्या दारी’ या फि रते विधी सेवा व लोकअदालत (मोबाईल व्हॅन) उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते़ जिल्ह्यातील विविध तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये दिवाणी व फ ौजदारी स्वरूपाचे एकूण ६७३ दावे ठेवण्यात आले होते़ त्यापैकी ३१२ दावे सामोपचाराने निकाली निघाल़े या निकाली दाव्यांच्या आकडेवारीवरून सामोपचाराने वाद मिटविण्यात पक्षकारांकडून चांगला प्रतिसाद दिला जात असल्याचे समोर येते़विधी सहाय्य हे न्यायदान प्रक्रियेचे एक अत्यावश्यक अंग आहे़ या महत्त्वाच्या अंगाचे उद्दिष्ट म्हणजे समाजातील दुर्बल पददलित घटकांना न्याय मिळवून देणे़ जोपर्यंत नागरिकांना शिक्षण व रोजगारासारखे मुलभूत अधिकार तसेच त्यांना सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्राप्त करून देता येत नाही, तोपर्यंत लोकशाहीस खरा अर्थ प्राप्त होत नाही़ नागरिकांच्या विशेषत: दुर्बल व गोरगरीबांच्या हक्कांचे व हितांचे रक्षण व जोपासना करण्याचे काम महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमार्फ त केले जाते़समाजातील निरक्षरतेमुळे बहुसंख्य नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव नसते़ त्यांना या अधिकारांची जाणीव करून देण्याची तसेच गरजूंना विधीसेवा पुरविण्याची आवश्यकता आहे़ दुर्बल घटक तसेच गरीब व गरजू लोकांना त्यांना हवे असलेल्या विधी सहाय्याकरीता विधी प्राधिकरणाकडे जाऊन दाद मागणे अवघड ठरत असल्यास विधी प्राधिकरणच त्यांच्या दाराशी जाईल़ या गोष्टींची जाणीव ठेवून ‘विधीसाक्षरता’ व ‘लोकअदालत’ यासाठी फि रत्या वाहनाची संकल्पना पुढे आली व तिची अंमलबजावणी सुरू झाली़जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरात १६ ते ३० जूनदरम्यान मोफ त विधी सेवा केंद्र आणि लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते़ या कालावधीत ‘न्याय आपल्या दारी’ ही मोबाइल व्हॅन प्रत्येक तालुक्यात नेऊन लोकअदालत घेण्यात आली़ त्यात फे रफ ारासंबंधी प्रकरणापासून ते जमाबंदी प्रकरणे, किरकोळ आपसात मिटविण्याजोगे फ ौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, बँक कर्ज प्रकरणे, आणि दाखलपूर्व किंवा दाखल झालेली प्र्रकरणे यांचा समावेश होता़ जिल्ह्यात १६ ठिकाणी गेलेल्या फि रत्या विधी सेवा केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या लोकअदालतीत ६४७ फ ौजदारी व २६ दिवाणी असे एकूण ६७३ दावे ठेवण्यात आले होते़ त्यौपकी ३१२ दावे सामोपचाराने निकाली निघाले़ त्यात २९५ फ ौजदारी व १७ दिवाणी दाव्यांचा समावेश होता़ या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश इंदिरा जैन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे, वकील संघाचे पदाधिकारी तसेच तालुका न्यायालयातील न्यायाधीश, कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले़