शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

312 प्रकरणांचा झटपट निकाल

By admin | Updated: July 3, 2014 00:09 IST

312 प्रकरणांचा झटपट निकाल

विजय मोरेनाशिक, दि. ०२ - महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्हाभरात १६ ते ३० जून दरम्यान ‘न्याय आपल्या दारी’ या फि रते विधी सेवा व लोकअदालत (मोबाईल व्हॅन) उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते़ जिल्ह्यातील विविध तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये दिवाणी व फ ौजदारी स्वरूपाचे एकूण ६७३ दावे ठेवण्यात आले होते़ त्यापैकी ३१२ दावे सामोपचाराने निकाली निघाल़े या निकाली दाव्यांच्या आकडेवारीवरून सामोपचाराने वाद मिटविण्यात पक्षकारांकडून चांगला प्रतिसाद दिला जात असल्याचे समोर येते़विधी सहाय्य हे न्यायदान प्रक्रियेचे एक अत्यावश्यक अंग आहे़ या महत्त्वाच्या अंगाचे उद्दिष्ट म्हणजे समाजातील दुर्बल पददलित घटकांना न्याय मिळवून देणे़ जोपर्यंत नागरिकांना शिक्षण व रोजगारासारखे मुलभूत अधिकार तसेच त्यांना सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्राप्त करून देता येत नाही, तोपर्यंत लोकशाहीस खरा अर्थ प्राप्त होत नाही़ नागरिकांच्या विशेषत: दुर्बल व गोरगरीबांच्या हक्कांचे व हितांचे रक्षण व जोपासना करण्याचे काम महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमार्फ त केले जाते़समाजातील निरक्षरतेमुळे बहुसंख्य नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव नसते़ त्यांना या अधिकारांची जाणीव करून देण्याची तसेच गरजूंना विधीसेवा पुरविण्याची आवश्यकता आहे़ दुर्बल घटक तसेच गरीब व गरजू लोकांना त्यांना हवे असलेल्या विधी सहाय्याकरीता विधी प्राधिकरणाकडे जाऊन दाद मागणे अवघड ठरत असल्यास विधी प्राधिकरणच त्यांच्या दाराशी जाईल़ या गोष्टींची जाणीव ठेवून ‘विधीसाक्षरता’ व ‘लोकअदालत’ यासाठी फि रत्या वाहनाची संकल्पना पुढे आली व तिची अंमलबजावणी सुरू झाली़जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरात १६ ते ३० जूनदरम्यान मोफ त विधी सेवा केंद्र आणि लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते़ या कालावधीत ‘न्याय आपल्या दारी’ ही मोबाइल व्हॅन प्रत्येक तालुक्यात नेऊन लोकअदालत घेण्यात आली़ त्यात फे रफ ारासंबंधी प्रकरणापासून ते जमाबंदी प्रकरणे, किरकोळ आपसात मिटविण्याजोगे फ ौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, बँक कर्ज प्रकरणे, आणि दाखलपूर्व किंवा दाखल झालेली प्र्रकरणे यांचा समावेश होता़ जिल्ह्यात १६ ठिकाणी गेलेल्या फि रत्या विधी सेवा केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या लोकअदालतीत ६४७ फ ौजदारी व २६ दिवाणी असे एकूण ६७३ दावे ठेवण्यात आले होते़ त्यौपकी ३१२ दावे सामोपचाराने निकाली निघाले़ त्यात २९५ फ ौजदारी व १७ दिवाणी दाव्यांचा समावेश होता़ या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश इंदिरा जैन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे, वकील संघाचे पदाधिकारी तसेच तालुका न्यायालयातील न्यायाधीश, कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले़