शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पेट्रोलपंपांवरील सेवासुविधांचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:12 IST

इंधन भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना पेट्रोलपंपावर दिल्या जाणाºया सेवासुविधांचा परिसरात पुरता बोजवारा उडाला आहे. संबंधित अधिकारी व निरीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे विक्रेत्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

ठळक मुद्देखडकी : अधिकारी व निरीक्षकांच्या हलगर्जीपणाचा ग्राहकांना फटका

खडकी : इंधन भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना पेट्रोलपंपावर दिल्या जाणाºया सेवासुविधांचा परिसरात पुरता बोजवारा उडाला आहे. संबंधित अधिकारी व निरीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे विक्रेत्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.परिसरातील अनेक पेट्रोल-पंपांवरील हवा तपासणी यंत्रच बंद आहे. आजच्या युगात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधा वाढल्या असल्या तरी अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने ेयोग्य पावले उचलली आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी काळजीपूर्वक होत नसल्याने सुविधा असून नसल्यासारख्या आहेत. वाहनांना चालणा देणाºया इंधनाची सोय दर दोन किलोमीटरला पेट्रोलपंपाची व्यवस्था झाली आहे. इंधन भरणाºया ग्राहकांना विक्रेत्यांतर्फे देण्यात येणाºया सुविधा सेवेत टायरची हवा तपासणी, प्रथमोपचार सेवा दर फलक आदी सेवा शासनाने अनिवार्य केल्या आहेत. सदर सुविधा पंप नव्यानव्याने सुरू ठेवतात, मात्र त्याचे सातत्य ठेवले जात नसल्याने सुविधा असून डोळेझाक करावी लागत आहे.प्रत्येक पेट्रोलपंपावरील हवा तपासणी यंत्र सांगायला निमित्त मात्र उभे केलेले आहे. प्रथमोपचाराचा स्टॉल देखील दिसून येत नाही. ग्राहकांना नुसते इंधन भरण्याचे भुरळ पाडणाºया जाहिरातीचे फलक नजरेस पडते. यामुळे या सेवेला आळा घालण्याची यंत्रणा सुरू झाल्याने नुसता तक्रार दुरुस्ती क्रमांक वापरून समस्या सोडविण्याचे औपचारिकता महत्वपूर्ण ठरत आहे. इंधन भरताना ग्राहकांना पुरेशी माहिती विचारताना कर्मचारी अरेरावी करतात. दर्शक यंत्र वेळेपूर्वीच चालू किंवा बंद केले जात असल्याने टाकीत किती पेट्रोल गेले याची माहिती फक्त पेट्रोल विक्रेता व त्यांचे कर्मचारी यांनाच ठाऊक असते. शहरी भागासह ग्रामीण भागातही वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातही मिनी पेट्रोलपंप सुरू केल्यास काळाबाजारही बंद होणार आहे. पेट्रोल ऐनवेळी संपले की ५० रुपयात २० ते ३० मिली लीटर पेट्रोल मिळते. यामुळे या धंद्याचाही ग्रामीण भागात सुळसुळाट झाला आहे. इंधन ही वस्तू अत्यावश्यक असल्याने इंधनाच्या सुविधा प्रत्येक गावात उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे. यादृष्टीने कायदेशीरपणे शासनाला कर मिळून बेरोजगाराला रोजगार मिळणार आहे. वाहनांच्या टायरमधील हवा मर्यादित असली तर अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. यासाठी पेट्रोलपंपावरील सेवेला चालना देऊन ग्राहकांना हवा तपासणी अनिवार्य करणे गरजेचे आहे. हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी पूर्णपणे होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे पूरक सुविधा सेवा ही महत्त्वपूर्ण असल्याने ग्राहकांना सुरक्षितता व समाधान मिळणार आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप