शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:15 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी केलेल्या नळपाणी पुरवठा योजना बिनकामाच्या ठरल्या असून, या योजनांना पाणीच नसल्याने त्यावर ...

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी केलेल्या नळपाणी पुरवठा योजना बिनकामाच्या ठरल्या असून, या योजनांना पाणीच नसल्याने त्यावर करण्यात आलेला कोट्यवधी रूपयांचा खर्च पाण्यात गेल्याची भावना व्यक्त करत, जिल्ह्यातील पाण्याअभावी बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांची चौकशी करून संबंधितांकडून रक्कम वसुलीचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत भास्कर गावीत यांनी हा प्रश्न उपस्थित केला. पेठ तालुक्यातील काही योजना बंद पडल्या असून, नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल भटकावे लागत आहे. या योजना काहीच कामाच्या ठरल्या नसून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळेही या योजना कुचकामी ठरल्याची तक्रार गावीत यांनी केली. त्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनंदा नरवडे यांनी संबंधित योजना ह्या जुन्या झाल्या असून, त्यावेळी तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशींनी या योजना पूर्णत्वास नेण्यात आल्या, त्यांनीच या योजनांच्या निविदा काढल्या व मंजूरही केल्या. त्यावेळी राज्य सरकारकडे या योजना होत्या व त्यातील त्रुटी लक्षात आणून दिल्यामुळेच आता त्यावर जिल्हा परिषदेचे नियंत्रण आणल्याचे स्पष्टीकरण दिले. अशा योजना पुनरुज्जीवित करताना जलजीवन मिशन योजनांच्या माध्यमातून बळकट करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. त्यावर सभापती संजय बनकर यांनी अशा योजनांची चौकशी करण्याची मागणी केली. महेंद्रकुमार काले यांनी मांगीतुंगी येथील योजनेवर ३५ ते ४० कोटी रूपये खर्च करूनही योजना कुचकामी ठरल्याची तक्रार केली. त्यावर अशा सर्व योजनांची चौकशी करून ठेकेदारांची देयके अदा करू नयेत तसेच त्यांची अनामतही रोखण्यात यावी, अशी मागणी बनकर यांनी केली. त्यावर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी योजनांची चौकशी करून देयके, अनामत रोखण्यात यावी व योजनांवर झालेला खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात यावा, असे आदेश दिले.

चौकट====

ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा सुरू करा

ग्रामपंचायतीच्या हद्दीत लावण्यात आलेल्या पथदीपांचे देयक भरले नाही म्हणून वीज कंपनीने ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित केल्याने अंधाराचे साम्राज्य पसरल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. त्यावर ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी ग्रामपंचायतींच्या पथदीपांचे वीजबिलाच्या रकमेसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते, ते अद्याप आलेले नाही. शासनाकडून निधी आल्यास तत्काळ तो अदा केला जाईल, असे सांगितले. त्यावर अध्यक्ष क्षीरसागर यांनी ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा सुरू करण्याचे आदेश वीज कंपनीला दिले.