शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:15 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी केलेल्या नळपाणी पुरवठा योजना बिनकामाच्या ठरल्या असून, या योजनांना पाणीच नसल्याने त्यावर ...

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी केलेल्या नळपाणी पुरवठा योजना बिनकामाच्या ठरल्या असून, या योजनांना पाणीच नसल्याने त्यावर करण्यात आलेला कोट्यवधी रूपयांचा खर्च पाण्यात गेल्याची भावना व्यक्त करत, जिल्ह्यातील पाण्याअभावी बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांची चौकशी करून संबंधितांकडून रक्कम वसुलीचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत भास्कर गावीत यांनी हा प्रश्न उपस्थित केला. पेठ तालुक्यातील काही योजना बंद पडल्या असून, नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल भटकावे लागत आहे. या योजना काहीच कामाच्या ठरल्या नसून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळेही या योजना कुचकामी ठरल्याची तक्रार गावीत यांनी केली. त्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनंदा नरवडे यांनी संबंधित योजना ह्या जुन्या झाल्या असून, त्यावेळी तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशींनी या योजना पूर्णत्वास नेण्यात आल्या, त्यांनीच या योजनांच्या निविदा काढल्या व मंजूरही केल्या. त्यावेळी राज्य सरकारकडे या योजना होत्या व त्यातील त्रुटी लक्षात आणून दिल्यामुळेच आता त्यावर जिल्हा परिषदेचे नियंत्रण आणल्याचे स्पष्टीकरण दिले. अशा योजना पुनरुज्जीवित करताना जलजीवन मिशन योजनांच्या माध्यमातून बळकट करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. त्यावर सभापती संजय बनकर यांनी अशा योजनांची चौकशी करण्याची मागणी केली. महेंद्रकुमार काले यांनी मांगीतुंगी येथील योजनेवर ३५ ते ४० कोटी रूपये खर्च करूनही योजना कुचकामी ठरल्याची तक्रार केली. त्यावर अशा सर्व योजनांची चौकशी करून ठेकेदारांची देयके अदा करू नयेत तसेच त्यांची अनामतही रोखण्यात यावी, अशी मागणी बनकर यांनी केली. त्यावर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी योजनांची चौकशी करून देयके, अनामत रोखण्यात यावी व योजनांवर झालेला खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात यावा, असे आदेश दिले.

चौकट====

ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा सुरू करा

ग्रामपंचायतीच्या हद्दीत लावण्यात आलेल्या पथदीपांचे देयक भरले नाही म्हणून वीज कंपनीने ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित केल्याने अंधाराचे साम्राज्य पसरल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. त्यावर ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी ग्रामपंचायतींच्या पथदीपांचे वीजबिलाच्या रकमेसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते, ते अद्याप आलेले नाही. शासनाकडून निधी आल्यास तत्काळ तो अदा केला जाईल, असे सांगितले. त्यावर अध्यक्ष क्षीरसागर यांनी ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा सुरू करण्याचे आदेश वीज कंपनीला दिले.