शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:15 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी केलेल्या नळपाणी पुरवठा योजना बिनकामाच्या ठरल्या असून, या योजनांना पाणीच नसल्याने त्यावर ...

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी केलेल्या नळपाणी पुरवठा योजना बिनकामाच्या ठरल्या असून, या योजनांना पाणीच नसल्याने त्यावर करण्यात आलेला कोट्यवधी रूपयांचा खर्च पाण्यात गेल्याची भावना व्यक्त करत, जिल्ह्यातील पाण्याअभावी बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांची चौकशी करून संबंधितांकडून रक्कम वसुलीचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत भास्कर गावीत यांनी हा प्रश्न उपस्थित केला. पेठ तालुक्यातील काही योजना बंद पडल्या असून, नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल भटकावे लागत आहे. या योजना काहीच कामाच्या ठरल्या नसून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळेही या योजना कुचकामी ठरल्याची तक्रार गावीत यांनी केली. त्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनंदा नरवडे यांनी संबंधित योजना ह्या जुन्या झाल्या असून, त्यावेळी तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशींनी या योजना पूर्णत्वास नेण्यात आल्या, त्यांनीच या योजनांच्या निविदा काढल्या व मंजूरही केल्या. त्यावेळी राज्य सरकारकडे या योजना होत्या व त्यातील त्रुटी लक्षात आणून दिल्यामुळेच आता त्यावर जिल्हा परिषदेचे नियंत्रण आणल्याचे स्पष्टीकरण दिले. अशा योजना पुनरुज्जीवित करताना जलजीवन मिशन योजनांच्या माध्यमातून बळकट करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. त्यावर सभापती संजय बनकर यांनी अशा योजनांची चौकशी करण्याची मागणी केली. महेंद्रकुमार काले यांनी मांगीतुंगी येथील योजनेवर ३५ ते ४० कोटी रूपये खर्च करूनही योजना कुचकामी ठरल्याची तक्रार केली. त्यावर अशा सर्व योजनांची चौकशी करून ठेकेदारांची देयके अदा करू नयेत तसेच त्यांची अनामतही रोखण्यात यावी, अशी मागणी बनकर यांनी केली. त्यावर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी योजनांची चौकशी करून देयके, अनामत रोखण्यात यावी व योजनांवर झालेला खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात यावा, असे आदेश दिले.

चौकट====

ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा सुरू करा

ग्रामपंचायतीच्या हद्दीत लावण्यात आलेल्या पथदीपांचे देयक भरले नाही म्हणून वीज कंपनीने ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित केल्याने अंधाराचे साम्राज्य पसरल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. त्यावर ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी ग्रामपंचायतींच्या पथदीपांचे वीजबिलाच्या रकमेसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते, ते अद्याप आलेले नाही. शासनाकडून निधी आल्यास तत्काळ तो अदा केला जाईल, असे सांगितले. त्यावर अध्यक्ष क्षीरसागर यांनी ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा सुरू करण्याचे आदेश वीज कंपनीला दिले.