शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
2
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
3
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
4
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
5
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
6
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
7
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
9
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
10
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
11
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
12
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
14
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
15
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
16
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
17
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
18
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
19
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
20
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:15 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी केलेल्या नळपाणी पुरवठा योजना बिनकामाच्या ठरल्या असून, या योजनांना पाणीच नसल्याने त्यावर ...

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी केलेल्या नळपाणी पुरवठा योजना बिनकामाच्या ठरल्या असून, या योजनांना पाणीच नसल्याने त्यावर करण्यात आलेला कोट्यवधी रूपयांचा खर्च पाण्यात गेल्याची भावना व्यक्त करत, जिल्ह्यातील पाण्याअभावी बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांची चौकशी करून संबंधितांकडून रक्कम वसुलीचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत भास्कर गावीत यांनी हा प्रश्न उपस्थित केला. पेठ तालुक्यातील काही योजना बंद पडल्या असून, नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल भटकावे लागत आहे. या योजना काहीच कामाच्या ठरल्या नसून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळेही या योजना कुचकामी ठरल्याची तक्रार गावीत यांनी केली. त्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनंदा नरवडे यांनी संबंधित योजना ह्या जुन्या झाल्या असून, त्यावेळी तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशींनी या योजना पूर्णत्वास नेण्यात आल्या, त्यांनीच या योजनांच्या निविदा काढल्या व मंजूरही केल्या. त्यावेळी राज्य सरकारकडे या योजना होत्या व त्यातील त्रुटी लक्षात आणून दिल्यामुळेच आता त्यावर जिल्हा परिषदेचे नियंत्रण आणल्याचे स्पष्टीकरण दिले. अशा योजना पुनरुज्जीवित करताना जलजीवन मिशन योजनांच्या माध्यमातून बळकट करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. त्यावर सभापती संजय बनकर यांनी अशा योजनांची चौकशी करण्याची मागणी केली. महेंद्रकुमार काले यांनी मांगीतुंगी येथील योजनेवर ३५ ते ४० कोटी रूपये खर्च करूनही योजना कुचकामी ठरल्याची तक्रार केली. त्यावर अशा सर्व योजनांची चौकशी करून ठेकेदारांची देयके अदा करू नयेत तसेच त्यांची अनामतही रोखण्यात यावी, अशी मागणी बनकर यांनी केली. त्यावर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी योजनांची चौकशी करून देयके, अनामत रोखण्यात यावी व योजनांवर झालेला खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात यावा, असे आदेश दिले.

चौकट====

ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा सुरू करा

ग्रामपंचायतीच्या हद्दीत लावण्यात आलेल्या पथदीपांचे देयक भरले नाही म्हणून वीज कंपनीने ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित केल्याने अंधाराचे साम्राज्य पसरल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. त्यावर ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी ग्रामपंचायतींच्या पथदीपांचे वीजबिलाच्या रकमेसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते, ते अद्याप आलेले नाही. शासनाकडून निधी आल्यास तत्काळ तो अदा केला जाईल, असे सांगितले. त्यावर अध्यक्ष क्षीरसागर यांनी ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा सुरू करण्याचे आदेश वीज कंपनीला दिले.