नाशिक : आदिवासी विकास विभागांतर्गत करण्यात आलेल्या नोकरभरतीत गैरव्यवहार झाल्याचा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या आरोपानुसार नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल महिनाभरात प्राप्त होणार असून, चौकशीत कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली.तसेच विनोद परदेशी नामक कर्मचाऱ्याच्या खात्याचे हे धनादेश असून, उमेदवारांकडून नोकरीसाठी आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोपही केला होता. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वीच खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीच आदिवासी विकास विभागाच्या शिक्षक, परिचर, लिपिक भरतीत ३०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत त्याचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले होते. त्यानुसार काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्या बरोबरच त्यांच्या बदल्या राज्यात इतरत्र करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बोलताना आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी या नोकरभरतीची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे कामकाज पूर्ण होत आले असून, एका महिन्यात हा चौकशीचा अहवाल प्राप्त होणार आहे. अहवाल प्राप्त होताच यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे विष्णू सावरा यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
नोकरभरतीतील चौकशीचा अहवाल महिनाभरात : विष्णू सावरा
By admin | Updated: September 30, 2016 02:35 IST