शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सात जिल्ह्यांवर केला अन्याय, ‘दुष्काळी’च्या यादीतून वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 04:18 IST

यंदा सरासरीपेक्षाही कमी पर्जन्यमान झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केलेले असताना जुलै महिन्यात पडलेल्या पावसाच्या आधारे पिकांची सामान्य परिस्थिती गृहीत धरून सात जिल्ह्यातील ‘दुष्काळी’ तालुक्यांना दुष्काळसदृशच्या यादीतून वगळण्यात आले.

नाशिक : यंदा सरासरीपेक्षाही कमी पर्जन्यमान झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केलेले असताना जुलै महिन्यात पडलेल्या पावसाच्या आधारे पिकांची सामान्य परिस्थिती गृहीत धरून सात जिल्ह्यातील ‘दुष्काळी’ तालुक्यांना दुष्काळसदृशच्या यादीतून वगळण्यात आले. यावरून पुणे येथे बुधवारी झालेल्या राज्य दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्यक्ष पीक सर्वेक्षणाचा अहवाल येण्यापूर्वीच सरकारने दुष्काळसदृश तालुक्यांची यादी घोषित केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.केंद्र सरकारच्या २०१६ दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी ‘महामदत’ ही संगणक प्रणाली विकसित केली असून गाव, मंडळ, तालुका पातळीवर पडणाºया पावसाचे मोजमाप करण्यासाठी ‘एमआरसॅक’ या प्रणालीचा आधार घेतला आहे. या प्रणालीच्या आधारेच कृषी विभागाने दुष्काळी परिस्थितीबाबतचे दोन निकष जाहीर केले. अखेरच्या टप्प्यात शेतकºयाच्या बांधावर जाऊन पीक सर्वेक्षण करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी, कृषी अधीक्षकांना दिल्या आहेत.>बैठकीत मूल्यांकन अहवाल सादरबैठकीत अंतिम मूल्यांकन अहवाल सादर करण्यात आले. परंतु एमआरसॅक प्रणालीवर अनेक अधिकाºयांनी प्रश्न उपस्थित केले. विशेष करून कोपरगाव (नगर), खटाव (सातारा), मंठा (जालना), येवला (नाशिक), उस्मानाबाद व उत्तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कमी पर्जन्यमान असूनही ती तालुके दुष्काळसदृश परिस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे.