शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

दिव्यांग मतदारांच्या माहितीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:48 IST

मतदानापासून कोणताही घटक वंचित राहता कामा नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष दक्षता घेण्यात आलेली असून, आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची शोधमोहीमही सुरू करण्यात आलेली आहे.

नाशिक : मतदानापासून कोणताही घटक वंचित राहता कामा नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष दक्षता घेण्यात आलेली असून, आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची शोधमोहीमही सुरू करण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या मतदारांचा शोध घेऊन त्यांना विशेष सुविधा देण्यात येणार असल्याने मतदान केंद्रनिहाय त्यांची माहिती एकत्रित करण्याचे काम जिल्हा निवडणूक विभागाकडून केले जात आहे. अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४५ लाख इतकी आहे.गेल्या दोन महिन्यांपासूनच जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीतील टक्का अपेक्षित नसल्याने विधानसभेत मतांचा टक्का वाढावा यासाठी आयोगाने कंबर कसली आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. निर्दोष यादी करण्यासाठी निवडणूक शाखेने मोठी मोहीम राबविली आणि सुमारे ५६ हजार दुबार आणि मयत नावे यादीतून काढून टाकली. तर नव्याने १९ हजारांपेक्षा अधिक नावे यादीत समाविष्ट झाली. जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४५ लाख २४ हजार ६६३ मतदार विधानसभेसाठी मतदान करणार आहेत.लोकशाही व्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करीत असून, त्याचाच एक भाग म्हणून मतदानापासून वंचित राहणाऱ्या घटकांची मतदार म्हणून नोंद करण्याची विशेष मोहीम राबविली जात आहे. विधानसभेच्या मतदार यादीतील स्त्री आणि पुरुष मतदारांप्रमाणेच तृतीय पंथियांचीदेखील नोंदणी करण्यात आली असून, जिल्ह्यात ३५ तृतीयपंथी मतदार असल्याची नोंद अंतिम मतदार यादीत करण्यात आलेली आहे.दिव्यांगांच्या समस्या जाणून घेतल्यानिवडणूक शाखेने अपंगांना प्रमाणपत्र देणाºया जिल्हा शासकीय रुग्णालये, अपंगांसाठी योजना राबविणाºया समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग याशिवाय महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून अपंग कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. दिव्यांगांचा मतदार म्हणून नोंद करतानाच त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या जात आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक