शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:19 IST

चौकट- तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च वस्तू ...

चौकट-

तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च

वस्तू वाढलेला खर्च (रुपयांमध्ये)

खाद्यतेल - ५०

धान्य - १००

शेंगदाणे - २०

साखर - २०

साबूदाणा - १५

चहापूड - ४०

डाळ - ९०

गॅस सिलिंडर - २५०

पेट्रोल-डिझेल - ३००

एकूण -८८५

चौकट-

डाळीशिवाय वरण

कितीही महागाई वाढली तर काही गोष्टी कमी करता येत नाहीत. जेवणात वरण-भात आवश्यक आहे. यामुळे तुरीची, मुगाची डाळ ही घ्यावीच लागते. महिन्याकाठी किमान तीन ते चार किलो डाळ लागत असते. गेल्या काही दिवसांत डाळीच्या दरात किलोमागे किमान ७ ते ८ रुपये वाढ झाली आहे. डाळीशिवाय वरण होऊ शकत नसल्याने त्याची खरेदी करावीच लागते. फक्त त्याचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते.

चौकट-

अशी वाढली महागाई

गेल्या वर्षभरात महागाई एकदम वाढली नसली तरी टप्प्याटप्प्याने प्रत्येक वस्तूच्या दरात वाढ होत गेली आहे. सुरुवातील खाद्यतेल महागले. त्यानंतर डाळींच्या दरात वाढ झाली. त्याची सवय होते ना होते तोच साखर दोन-तीन रुपयांनी महागली. पेट्रोल आणि डिझेल तर काय रोजच महाग होत आहे. त्यात आता शासनाने गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका दिला आहे. किरकोळ बाजारांमध्ये भाजीपाल्याचे दर काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत.

जानेवारीतील दर सध्याचा दर (प्रती किलो रुपयांत)

शेंगदाणा तेल -

सोयाबीन तेल

शेंगदाणे

साखर

साबूदाणा

मसाले

चहापूड

तूरडाळ

मूगडाळ

उडीद डाळ

हरभरा डाळ

चौकट-

सिलिंडर हजाराच्या घरात

गॅस सिलिंडरवर देण्यात येणारी सबसीडी केंद्र शासनाने आता पूणपणे बंद केली आहे. महिना - दोन महिन्यांच्या फरकाने गॅस सिलिंडरच्या दरात २५-३० रुपयांनी वाढत वाढत आज सिलिंडरची किंमत ९०० रुपयांपर्यंत गेली आहे. यामुळे आता नेमके करायचे काय, असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.

कोट-

कोराेनाची पहिली लाट ओसरली आणि महागाईने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. आज गॅससह स्वयंपाकघरातील सर्वच वस्तू महागल्याने खर्चाचा ताळमेळ बसविणे मुश्कील झाले आहे. खाण्याच्या वस्तू हव्या तेवढ्या घ्याव्याच लागतात. - रोहिणी पगारे, गृहिणी

कोट-

शासनाने सुरुवातील सबसिडी बॅंकेत जमा करण्याच्या नावाखाली गॅस सिलिंडर रोखीने घेण्याची सवय लावली आणि हळूहळू सबसिडी बंदच करून टाकली. मागील पाच-सहा महिन्यांपासून भाजीपाला, डाळी महागल्या आहेत. खाद्यतेलाने तर केव्हाच शंभरी पार केली असल्याने खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. - मनीषा बागुल, गृहिणी