शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:19 IST

चौकट- तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च वस्तू ...

चौकट-

तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च

वस्तू वाढलेला खर्च (रुपयांमध्ये)

खाद्यतेल - ५०

धान्य - १००

शेंगदाणे - २०

साखर - २०

साबूदाणा - १५

चहापूड - ४०

डाळ - ९०

गॅस सिलिंडर - २५०

पेट्रोल-डिझेल - ३००

एकूण -८८५

चौकट-

डाळीशिवाय वरण

कितीही महागाई वाढली तर काही गोष्टी कमी करता येत नाहीत. जेवणात वरण-भात आवश्यक आहे. यामुळे तुरीची, मुगाची डाळ ही घ्यावीच लागते. महिन्याकाठी किमान तीन ते चार किलो डाळ लागत असते. गेल्या काही दिवसांत डाळीच्या दरात किलोमागे किमान ७ ते ८ रुपये वाढ झाली आहे. डाळीशिवाय वरण होऊ शकत नसल्याने त्याची खरेदी करावीच लागते. फक्त त्याचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते.

चौकट-

अशी वाढली महागाई

गेल्या वर्षभरात महागाई एकदम वाढली नसली तरी टप्प्याटप्प्याने प्रत्येक वस्तूच्या दरात वाढ होत गेली आहे. सुरुवातील खाद्यतेल महागले. त्यानंतर डाळींच्या दरात वाढ झाली. त्याची सवय होते ना होते तोच साखर दोन-तीन रुपयांनी महागली. पेट्रोल आणि डिझेल तर काय रोजच महाग होत आहे. त्यात आता शासनाने गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका दिला आहे. किरकोळ बाजारांमध्ये भाजीपाल्याचे दर काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत.

जानेवारीतील दर सध्याचा दर (प्रती किलो रुपयांत)

शेंगदाणा तेल -

सोयाबीन तेल

शेंगदाणे

साखर

साबूदाणा

मसाले

चहापूड

तूरडाळ

मूगडाळ

उडीद डाळ

हरभरा डाळ

चौकट-

सिलिंडर हजाराच्या घरात

गॅस सिलिंडरवर देण्यात येणारी सबसीडी केंद्र शासनाने आता पूणपणे बंद केली आहे. महिना - दोन महिन्यांच्या फरकाने गॅस सिलिंडरच्या दरात २५-३० रुपयांनी वाढत वाढत आज सिलिंडरची किंमत ९०० रुपयांपर्यंत गेली आहे. यामुळे आता नेमके करायचे काय, असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.

कोट-

कोराेनाची पहिली लाट ओसरली आणि महागाईने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. आज गॅससह स्वयंपाकघरातील सर्वच वस्तू महागल्याने खर्चाचा ताळमेळ बसविणे मुश्कील झाले आहे. खाण्याच्या वस्तू हव्या तेवढ्या घ्याव्याच लागतात. - रोहिणी पगारे, गृहिणी

कोट-

शासनाने सुरुवातील सबसिडी बॅंकेत जमा करण्याच्या नावाखाली गॅस सिलिंडर रोखीने घेण्याची सवय लावली आणि हळूहळू सबसिडी बंदच करून टाकली. मागील पाच-सहा महिन्यांपासून भाजीपाला, डाळी महागल्या आहेत. खाद्यतेलाने तर केव्हाच शंभरी पार केली असल्याने खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. - मनीषा बागुल, गृहिणी