शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:19 IST

चौकट- तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च वस्तू ...

चौकट-

तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च

वस्तू वाढलेला खर्च (रुपयांमध्ये)

खाद्यतेल - ५०

धान्य - १००

शेंगदाणे - २०

साखर - २०

साबूदाणा - १५

चहापूड - ४०

डाळ - ९०

गॅस सिलिंडर - २५०

पेट्रोल-डिझेल - ३००

एकूण -८८५

चौकट-

डाळीशिवाय वरण

कितीही महागाई वाढली तर काही गोष्टी कमी करता येत नाहीत. जेवणात वरण-भात आवश्यक आहे. यामुळे तुरीची, मुगाची डाळ ही घ्यावीच लागते. महिन्याकाठी किमान तीन ते चार किलो डाळ लागत असते. गेल्या काही दिवसांत डाळीच्या दरात किलोमागे किमान ७ ते ८ रुपये वाढ झाली आहे. डाळीशिवाय वरण होऊ शकत नसल्याने त्याची खरेदी करावीच लागते. फक्त त्याचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते.

चौकट-

अशी वाढली महागाई

गेल्या वर्षभरात महागाई एकदम वाढली नसली तरी टप्प्याटप्प्याने प्रत्येक वस्तूच्या दरात वाढ होत गेली आहे. सुरुवातील खाद्यतेल महागले. त्यानंतर डाळींच्या दरात वाढ झाली. त्याची सवय होते ना होते तोच साखर दोन-तीन रुपयांनी महागली. पेट्रोल आणि डिझेल तर काय रोजच महाग होत आहे. त्यात आता शासनाने गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका दिला आहे. किरकोळ बाजारांमध्ये भाजीपाल्याचे दर काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत.

जानेवारीतील दर सध्याचा दर (प्रती किलो रुपयांत)

शेंगदाणा तेल -

सोयाबीन तेल

शेंगदाणे

साखर

साबूदाणा

मसाले

चहापूड

तूरडाळ

मूगडाळ

उडीद डाळ

हरभरा डाळ

चौकट-

सिलिंडर हजाराच्या घरात

गॅस सिलिंडरवर देण्यात येणारी सबसीडी केंद्र शासनाने आता पूणपणे बंद केली आहे. महिना - दोन महिन्यांच्या फरकाने गॅस सिलिंडरच्या दरात २५-३० रुपयांनी वाढत वाढत आज सिलिंडरची किंमत ९०० रुपयांपर्यंत गेली आहे. यामुळे आता नेमके करायचे काय, असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.

कोट-

कोराेनाची पहिली लाट ओसरली आणि महागाईने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. आज गॅससह स्वयंपाकघरातील सर्वच वस्तू महागल्याने खर्चाचा ताळमेळ बसविणे मुश्कील झाले आहे. खाण्याच्या वस्तू हव्या तेवढ्या घ्याव्याच लागतात. - रोहिणी पगारे, गृहिणी

कोट-

शासनाने सुरुवातील सबसिडी बॅंकेत जमा करण्याच्या नावाखाली गॅस सिलिंडर रोखीने घेण्याची सवय लावली आणि हळूहळू सबसिडी बंदच करून टाकली. मागील पाच-सहा महिन्यांपासून भाजीपाला, डाळी महागल्या आहेत. खाद्यतेलाने तर केव्हाच शंभरी पार केली असल्याने खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. - मनीषा बागुल, गृहिणी