शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

वटपौर्णिमेच्या सामग्रीला महागाईच्या झळा

By admin | Updated: June 8, 2017 03:23 IST

जन्मो जन्मी मला हाच पती मिळावा तसेच पतीच्या दिर्घायुष्याबाबत प्रार्थना करण्यासाठी विक्रमगडमधील महिलावर्ग सज्ज झाला

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : जन्मो जन्मी मला हाच पती मिळावा तसेच पतीच्या दिर्घायुष्याबाबत प्रार्थना करण्यासाठी विक्रमगडमधील महिलावर्ग सज्ज झाला असून बुधवारी आठवडे बाजारात वटसावित्रीच्या सामग्रीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. उपवासाचा हा दिवस मोठ्या श्रद्धेचा मानला जातो. आधुनिक काळातही त्याचा महिमा तसूभरही कमी झालेला नाही. या व्रतासाठी विक्रमगडमधील नवविवाहीता तीन दिवस उपवास करुन चौथ्या दिवशी विधीवत पूजा करतात. त्या वेळेस पूजेसाठी लागणाऱ्या करंडाफणी, आंब्यांचे वाण, हळद-कुंकू, हिरव्या बांगडया, खारीक, बदाम, सुपारी, फणस यांचे दर वाढलेले आहेत. वट पौर्णिमेसाठी लागणाऱ्या साहित्यालाही महागाइची झळ बसली असून त्यांच्या किंमतीत दुपटीने वाढ झाली आहेत. आंबा एक नग ५ ते १० रुपये, करडांफणी ८ ते १० रुपये, हिरव्या बांगडया २५ ते ३० रुपये डझन, फणस गरा ४ ते ५ रुपये, खरीक एक नग ४ ते ५ रुपये, बदाम एक नग ४ ते ५ रुपये, हळद-कुंकू १५ ते २० रुपये, सुपारी एक नग ५ ते १० रुपये अशी वाढ झाली आहे.>‘जुन्या परंपरा मोडल्या जात आहेत’पूर्वी गावात एक ते दोनच ठिकाणी वडाखाली पूजा केली जात असे. परंतु, आता ही परंपरा लोप पावत चालेली असून ग्रामीण भाग सोडला तर शहरी भागात वडाच्या फांद्या देवळात आणून अनेक ठिकाणी पुजा मांडल्या जातात. महिला आपल्या सवडीनुसार येऊन पूजा करतात़ पूर्वी असे नव्हते आता आधुनिक युगाबरोबर परंपराही मोडल्या जात आहेत़, अशी खंत विक्रमगड येथील ज्येष्ठ महिला कमल औसरकर यांनी लोकमतकडे व्यक्त केली.वटपूजन दुपारी साडेबारापर्यंतच : दाते पंचागवटपौर्णिमा गुरुवारी ८ जून रोजी दुपारी ४़ ३० नंतर शुक्रवारपर्यत आहे़ पण चतुर्दशी ही गुरुवारी आहे़ आणि तिसऱ्या प्रहरापासून पूजन करावयाचे असते़ म्हणून पूजन हे गुरुवारी सूर्योदयापसून ते मध्यान्ह पर्यंत म्हणजेच दु़ १२.३० पर्यतच करणे बंधकारक आहे. तरी सर्व महिलांनी दु. १२़ ३० पर्यतच पूजन करावे नवीन व्रत करणाऱ्यांनी सकाळी ७़ ते ८ व ११ ते १२़ ३० पर्यत पूजन करावे असे दाते पंचांगमध्ये म्हंटले आहे़ वटासावित्रीचे व्रत अतिशय पवित्र आणि मांगल्याचे मानले जाते़ त्यासाठी पौर्णिमेच्या आदल्या दोन दिवस व पौर्णिमा झाल्यावर चंद्रोदय होईपर्यत असे एकूण चार दिवस उपवास करतात. - भुरी धवल पटेल,अजूनही जुनी परंपरा विक्रमगड व ग्रामीण भागात महिलांनी जोपसली असून आधुनिक काळातही नवविवाहीत सौभाग्यवती आपल्या पतीसाठी चार दिवस उपवास करते व हे व्रत पूर्ण करते़- रजनी अरुण मनारे , विक्रमगड