शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मक्यावर अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:17 IST

ब्राम्हणगाव : येथे खरीप हंगामातील मका पिकावर अळीचे प्रमाण खूपच वाढल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून, जुलैसह ...

ब्राम्हणगाव : येथे खरीप हंगामातील मका पिकावर अळीचे प्रमाण खूपच वाढल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून, जुलैसह ऑगस्ट महिन्याचा आठवडा उलटूनही मोठा पाऊस न आल्याने पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. मोठा पाऊस नसल्यानेच पिकांवर त्याचा परिणाम होत असल्याने पिकांवर अळीचे प्रमाण वाढले आहे.

येथील रानमळा शिवारातील दीपक बाजीराव अहिरे यांच्या शेतात मका पिकाची लागवड केली असून त्यांच्या मका पिकावर तसेच परिसरातील शेतातील पिकांवर अळीचे प्रमाण वाढले आहे. अळी जाण्यासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशक औषधे मारली असली तरी, अळी जाण्यासाठी मोठा पाऊसच गरजेचा असल्याचे मका उत्पादक शेतकरी दीपक अहिरे यांनी सांगितले. मका पिकाबरोबरच सोयाबीन, ताग, कोबी, टोमॅटोसह अन्य भाजीपाला पिकांवर अळीने घात केला असून त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त बनला आहे.

-----------------------

वातावरणातील उष्म्यात वाढ

गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात उष्मा वाढला असून तापमानातही वाढ झाली आहे. पावसाळा संपून अडीच महिने झाले असून अद्याप मोठा पाऊस न पडल्याने काही शेतशिवारातील विहिरींची पाणीपातळीही घटू लागली असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे. श्रावण महिन्यात पुन्हा मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याने पुन्हा चिंतेत भर पडली आहे. शेतकऱ्यांनी शेतात महागडी बियाणे, खते, महागडी औषधे, मशागतीसाठी मोठा खर्च केला आहे. या अळीमुळे आर्थिक संकट उभे राहिल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे.

-----------------------

शेतकऱ्यांनी मका पिकावरील अळीला घालवण्यासाठी महागडी औषधे फवारणी केली आहेत. मात्र अद्याप त्याचा परिणाम दिसून येत नाही. आता त्यासाठी मोठ्या पावसाची गरज असून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

- दीपक अहिरे, मका उत्पादक, ब्राम्हणगाव

---------------------------

(१० ब्राम्हणगाव)

100821\10nsk_6_10082021_13.jpg

१० ब्राह्णणगाव