शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वंध्यत्व ही आजची सामाजिक समस्या

By admin | Updated: September 7, 2016 00:38 IST

नरहरी मळगावकर : ‘मला बाळ हवंय’ कार्यक्र म उत्साहात

 नाशिक : चुकीची जीवनशैली, कामातील ताण-तणाव यामुळे वैवाहिक जीवनात समस्या उद्भवत असून, अनेक जोडप्यांमध्ये वंध्यत्व वाढीला लागले आहे. लग्नानंतर अनेकवर्ष मूलबाळ होत नसल्याने अशा जोडप्यांची समाजात हेटाळणी होते. वंध्यत्व या सामाजिक समस्येवर ‘टेस्ट ट्युब बेबी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञामुळे निश्चितच मदत होईल, असे मत डॉ. नरहरी मळगावकर यांनी केले.शनिवारी (दि. ३) महाकवी कालिदास कलामंदिर येथे संस्कारवाणी युवक मंडळ आणि हितगुज महिला मंडळ यांच्या वतीने अयोजित ‘मला बाळ हवंय’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. नरहरी मळगावकर यांनी टेस्ट ट्युब बेबी या तंत्रज्ञानातील आक्षेप आणि गैरसमज याबाबत उपस्थितांना माहिती देताना टेस्ट ट्युब प्रणालीतून अपत्यप्राप्ती कशी होते याबाबतही मार्गदर्शन केले तसेच उपस्थित प्रेक्षकांनी विचारलेल्या शंकांचेही मळगावर यांनी निरसन केले.डॉ.सोनाली मळगावकर यांनी वंध्यत्वाचे कारणे नमूद करताना अनेक जोडप्यांचे उशिरा विवाह झाल्याने तसेच करिअरच्या दबावामुळे कालांतराने संसारसुखाचा विसर पडत गेल्यावर वंध्यत्वाची लक्षणे दिसून येत असल्याचे सांगितले. लग्नानंतर अनेक जोडप्यांना कार्यक्रमांना बोलावणेदेखील टाळले जाते तसेच त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याकडे लक्ष वेधले. डॉ. सोनाली मळगावकर यांनी यावेळी वैद्यकीय चाचण्या आणि सकारात्मक विचारसरणी हे सूत्राचे पालन करण्याचे आवाहन केले.‘विवाह संस्कार’ या विषयावर जिल्हा सत्र न्यायालयाच्या सहायक अधीक्षक मंजूषा कोठावदे यांनी मार्गदर्शन करताना पती-पत्नीतील वैवाहिक वाद त्यांच्या मुलांच्या आयुष्यावर खुप दूरगामी परिणाम करतात. त्यामुळे जोडप्यांचे वाद हे लहान मुलांसमोर शक्यतो होऊ नयेत. तसेच ताणतणाव निवारणासाठी जोडप्यांनी संसारातील आनंददायी बाबी शोधून त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमादरम्यान ‘तारे जमीन पर’सांस्कृतिक कार्यक्रमाचेदेखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माचे संयोजन जितेंद्र येवले, सूत्रसंचालन रसिका वाणी, मीनल वाणी, तर आभार शरद वाणी यांनी केले. (प्रतिनिधी)