शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

अर्भक मृत्यू प्रकरण : राष्टÑवादी महिला आघाडीचे निवेदन मनपा वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:31 IST

नाशिक : पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात नवजात अर्भकाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला असून, याप्रकरणी डॉक्टरवर उचित कारवाई न झाल्यास आणि आवश्यक सोई-सुविधा न पुरविल्यास मनपाच्या वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देकाही महिन्यांच्या अंतराने दुसरा बळी गेलाबळी हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच

नाशिक : पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात नवजात अर्भकाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला असून, याप्रकरणी डॉक्टरवर उचित कारवाई न झाल्यास आणि आवश्यक सोई-सुविधा न पुरविल्यास मनपाच्या वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने निवेदनाद्वारे दिला आहे. राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्यासह नगरसेविकांनी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांची भेट घेऊन त्यांना अर्भक मृत्यूप्रकरणी निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे, इंदिरा गांधी रुग्णालयात काही महिन्यांच्या अंतराने दुसरा बळी गेला आहे. रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाºया गर्भवती महिलांची संख्या जास्त असून, केवळ दोन स्त्रीरोग तज्ज्ञ तेथे आहेत. सकाळी १० ते २ या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी कोणीही स्त्रीरोगतज्ज्ञ तेथे उपस्थित नसतात. बºयाचदा परिचारिकांकडून प्रसूती उरकल्या जातात. मंगळवारी अर्भकाचा बळी हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे. प्रसूतीनंतर बाळाला खासगी रुग्णालयात पाठविणे हा कट प्रॅक्टिसचा भाग असू शकतो. महापालिकेने त्वरित रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञांची नेमणूक करावी व नवजात बालकांवर तातडीने उपचारासाठी एनआयसीयू व्हॅन उपलब्ध करून द्यावी, अन्यथा वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी नगरसेवक समिना मेमन, सुषमा पगारे, शोभा साबळे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, सुरेखा निमसे, रंजना गांगुर्डे, रजनी चौरसिया, संगीता गांगुर्डे, कामिनी वाघ, मीना गायकवाड आदी उपस्थित होत्या.लोकमान्य नवक्रांती सेनेचेही निवेदनअर्भक मृत्यूप्रकरणी संबंधित डॉक्टर व कर्मचाºयांवर त्वरित निलंबनाची मागणी लोकमान्य नवक्रांती सेनेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. याचवेळी मनपा रुग्णालयांमध्ये एनआयसीयू सुविधा असलेली रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. याप्रसंगी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अरुण परेवाल, शहराध्यक्ष लवेश राय, बी. जी. गांगुर्डे, हेमा राय, जावेद पंजाबी, साजिद अन्सारी, आनंद राय, जाधव, इरफान खान, सलीम शेख आदी उपस्थित होते.