शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अर्भक मृत्यू प्रकरण : राष्टÑवादी महिला आघाडीचे निवेदन मनपा वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:31 IST

नाशिक : पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात नवजात अर्भकाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला असून, याप्रकरणी डॉक्टरवर उचित कारवाई न झाल्यास आणि आवश्यक सोई-सुविधा न पुरविल्यास मनपाच्या वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देकाही महिन्यांच्या अंतराने दुसरा बळी गेलाबळी हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच

नाशिक : पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात नवजात अर्भकाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला असून, याप्रकरणी डॉक्टरवर उचित कारवाई न झाल्यास आणि आवश्यक सोई-सुविधा न पुरविल्यास मनपाच्या वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने निवेदनाद्वारे दिला आहे. राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्यासह नगरसेविकांनी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांची भेट घेऊन त्यांना अर्भक मृत्यूप्रकरणी निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे, इंदिरा गांधी रुग्णालयात काही महिन्यांच्या अंतराने दुसरा बळी गेला आहे. रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाºया गर्भवती महिलांची संख्या जास्त असून, केवळ दोन स्त्रीरोग तज्ज्ञ तेथे आहेत. सकाळी १० ते २ या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी कोणीही स्त्रीरोगतज्ज्ञ तेथे उपस्थित नसतात. बºयाचदा परिचारिकांकडून प्रसूती उरकल्या जातात. मंगळवारी अर्भकाचा बळी हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे. प्रसूतीनंतर बाळाला खासगी रुग्णालयात पाठविणे हा कट प्रॅक्टिसचा भाग असू शकतो. महापालिकेने त्वरित रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञांची नेमणूक करावी व नवजात बालकांवर तातडीने उपचारासाठी एनआयसीयू व्हॅन उपलब्ध करून द्यावी, अन्यथा वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी नगरसेवक समिना मेमन, सुषमा पगारे, शोभा साबळे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, सुरेखा निमसे, रंजना गांगुर्डे, रजनी चौरसिया, संगीता गांगुर्डे, कामिनी वाघ, मीना गायकवाड आदी उपस्थित होत्या.लोकमान्य नवक्रांती सेनेचेही निवेदनअर्भक मृत्यूप्रकरणी संबंधित डॉक्टर व कर्मचाºयांवर त्वरित निलंबनाची मागणी लोकमान्य नवक्रांती सेनेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. याचवेळी मनपा रुग्णालयांमध्ये एनआयसीयू सुविधा असलेली रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. याप्रसंगी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अरुण परेवाल, शहराध्यक्ष लवेश राय, बी. जी. गांगुर्डे, हेमा राय, जावेद पंजाबी, साजिद अन्सारी, आनंद राय, जाधव, इरफान खान, सलीम शेख आदी उपस्थित होते.