शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांना एलबीटीचा फटका

By admin | Updated: September 3, 2014 00:23 IST

उद्योगांना एलबीटीचा फटका

 

नाशिक : सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या उद्योजकांना एलबीटी परताव्यातूनच रक्कमच मिळणार नसल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. जकातीच्या तुलतेन एलबीटीत नियमच बदलल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे यंदा अद्याप तरी एकाही उद्योगास परतावा मिळाला नसल्याचे वृत्त आहे.सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात औद्योगिक प्रक्रिया उद्योग आहेत. अन्य कारखान्यातील उत्पादने येथे आल्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाते. औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत कारखान्यांकडून माल घेऊन त्यावर प्रक्रिया करणारे शेकडो उद्योग आहेत. बाहेरून माल आल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून माल पाठविणारे सुमारे ७० ते ८० कारखाने आहेत. महापालिका हद्दीत जकात लागू असताना अशा प्रकारे उद्योग करणाऱ्यांना सूट दिली जात असे, या कंपन्यांची पालिकेत वेगळी यादी होती. अशा प्रकारच्या प्रक्रिया उद्योगांना आधी महापालिकेकडे अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष कारखान्यात जाऊन प्रक्रिया बघतात. त्यानंतर त्यांना परवानगी दिली जाते. जकात नाक्यावर माल आल्यानंतर त्याची नोंद प्रक्रिया उद्योगासाठी असल्याची नोंद केली जात होती. त्यावेळी आयात मालाच्या पूर्ण जकात अनामत स्वरूपात नाक्यावर केली जात होती. माल आयात केल्यानंतर सहा महिन्यांत प्रक्रिया करून त्यानंतर परत पाठविण्याची मुदत होती. त्यानंतर संबंधित कारखान्यांना महापालिकेकडे परताव्यासाठी दावा करावा लागतो. त्याची छाननी केल्यानंतर भरलेल्या जकातीपैकी १० टक्के रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून महापालिका कापून घेते आणि ९० टक्के परतावा दिला जात असे. परंतु एलबीटीत मात्र नियम बदलला असून प्रक्रिया केल्यानंतर वस्तूचे आकारमान आणि स्वरूप बदलायला नको, अशी अट आहे. त्यामुळे प्रक्रिया कारखान्यांची अडचण झाली आहे. पालिकेकडे त्यामुळे परताव्यासाठी खूपच कमी कंपन्यांची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)