शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक विकासाभिमुख शिक्षणाची गरज

By admin | Updated: February 21, 2017 01:31 IST

अनिल काकोडकर : गोखले एज्युकेशनच्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रतिपादन

नाशिक : सध्या विकेंद्रित होत असलेल्या उद्योगांचे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाच्या साह्याने ग्रामीण भागात एकत्रीकरण करून शहर व ग्रामीण आणि गरीब, श्रीमंतीची दरी कमी करणे शक्य आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांना औद्योगिक विकासाभिमुख शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अनुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. गोपाळकृष्ण गोखले यांचे १५१ वे जयंती वर्ष, गोखले एज्युकेशन सोसायटीचा वर्धापनदिन व डॉ. एम. एस. गोसावी यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर जैन विश्व विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. सुधामाही रेगुनाथन, ज्येष्ठ अनुशास्त्रज्ज्ञ शंकरराव गोवारीकर, प्राचार्य एस. बी. पंडीत, एचएएलचे महाव्यवस्थापक डॉ. बी. एच. व्ही. शेषगिरीराव, डॉ. जी. पी. पानसे, एस. टी. देशमुख, आर. जे. गुजराथी प्रा. बी. देवराज आदि उपस्थित होते. काकोडकर म्हणाले, शहरापेक्षा ग्रामीण भागात दरडोई उपन्न निम्म्याहूनही कमी आहे. ग्रामीण भागात ५० टक्के कु टुंबांकडे शेती असल्याचा समज असला तरी प्रत्येक्षात शेतीवर उदरनिर्वाह भागवू शकतील, असे केवळ ३० टक्के कुटुंब आहे. उर्वरित बहुतेक कुटुंबांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन रोजंदारी आहे. त्यामुळे या वर्गासाठी ग्रामीण भागात औद्योगिक विकास होणे गरजेचे असून, येथील तरुणांना ते उद्योग व्यवसाय करू शकतील, असे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्याची गरज असल्याचे काकोडकर म्हणाले. दरम्यान, डॉ. एम. एस. गोसावी यांचा काकोडकर यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना सत्कारार्थी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया, उद्योजक अतुल चांडक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर व डॉ. विजय गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेला ५० लाख रुपयांची देणगी मिळाली. प्रास्ताविक दीप्ती देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन मोहिनी पेठकर, प्रा. मुग्धा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)