शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

इंदिरानगरवासियांना चक्री बससेवेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:09 IST

सुमारे अठरा वर्षांपूर्वी नागरिकांच्या मागणीनुसार, इंदिरानगर ते शालिमार सावरकर चौक, बापू बंगला, साईनाथनगर चौफुली, विनयनगर, वडाळा नाका, मुंबई ...

सुमारे अठरा वर्षांपूर्वी नागरिकांच्या मागणीनुसार, इंदिरानगर ते शालिमार सावरकर चौक, बापू बंगला, साईनाथनगर चौफुली, विनयनगर, वडाळा नाका, मुंबई नाका, दीपालीनगर, जॉगिंग ट्रॅक, गजानन महाराज मार्ग, चार्वाक चौक अशी चक्री बससेवा सुरू होती. त्यामुळे इंदिरानगर, साईनाथनगर, शिवाजी वाडी, वडाळा नाका, भाभानगरसह परिसरातील उपनगरातील शेकडोंच्या संख्येने शहरात शिक्षणासाठी ये-जा करणारे विद्यार्थी आणि नोकरी-व्यवसाय करणारे नागरिक सदर चक्रीबसचा लाभ घेत होते. चक्री बस प्रवाशांनी खचाखच भरलेली असायची. त्यामुळे शहर वाहतूक बससेवेच्या महसुलातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परिसरात दिवसागणिक वाढणारे अपार्टमेंट व सोसायटीमुळे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बससेवेच्या फेऱ्या वाढविण्याऐवजी शहर वाहतूक बससेवेच्या वतीने सुमारे तेरा वर्षांपूर्वी इंदिरानगर ते शालिमार चक्री बससेवा बंद केली. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत आहे. विद्यार्थी वर्ग आणि नागरिकांना जादा पैसे मोजून रिक्षामध्ये प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून अनेकवेळेस निवेदन व समक्ष भेटून चक्री बस सुरू करण्याची मागणी केली आहे.

कोट : ज्या ठिकाणी रस्ते आणि लोकवस्ती त्या ठिकाणी बससेवा शहर वाहतूक बससेवेचे ब्रीदवाक्य नावापुरतेच आहे. अपुऱ्या बससेवेभावी विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत आहे

- योगेश दिवे

सार्वजनिक व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येते. परंतु सार्वजनिक बस व्यवस्था अपुरी असेल तर त्याचा काय फायदा.

इंदिरानगर ते शालिमार चक्री बस सेवा सुरू केल्यास विद्यार्थी वर्ग व नोकरदारांची सोय होईल.

- अशोक लोळगे