शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

भारतीय संस्कृती आजही मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:47 IST

संस्कारशील पिढी घडवण्यासाठी राष्ट्रसंतांचा व त्यांच्या विचारांचा आदर करण्याची तसेच आजची पिढी प्रचंड व्यसनाधीन होत चालली असल्याने त्यांचे उद्धबोधन करण्याची आवश्यकता आहे. कारण तरु ण पिढी देशाचे भवितव्य आहे. नागरिकांनी व तरु णांनी ग्रामस्वच्छता अभियानासह पाणी वाचवण्याचीदेखील सामाजिक बांधिलकी बाळगण्याची गरज आहे. सुसंस्कृत समाजासाठी आजही भारतीय संस्कृती मार्गदर्शक व दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी येथे भाविकांशी हितगुज साधताना केले.

येवला : संस्कारशील पिढी घडवण्यासाठी राष्ट्रसंतांचा व त्यांच्या विचारांचा आदर करण्याची तसेच आजची पिढी प्रचंड व्यसनाधीन होत चालली असल्याने त्यांचे उद्धबोधन करण्याची आवश्यकता आहे. कारण तरु ण पिढी देशाचे भवितव्य आहे. नागरिकांनी व तरु णांनी ग्रामस्वच्छता अभियानासह पाणी वाचवण्याचीदेखील सामाजिक बांधिलकी बाळगण्याची गरज आहे. सुसंस्कृत समाजासाठी आजही भारतीय संस्कृती मार्गदर्शक व दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी येथे भाविकांशी हितगुज साधताना केले.येथील स्वामी समर्थ केंद्राचा वास्तुशांती सोहळा व औदुंबराची मुंज या कार्यक्र मा निमित्त मोरे यांनी येथील केंद्रात मार्गदर्शन केले. तीन दिवस सुरु असलेल्या या सोहळ्याला जिल्ह्यातील सर्व स्वामी समर्थ केंद्रांचे प्रतिनिधी तसेच तालुक्यातील सर्व सेवेकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते. गुरु माऊली मोरे यांचे येथे आगमन झाल्यानंतर शहराच्या वतीने नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, सचिन शिंदे यांनी तर केंद्राच्या वतीने नारायण शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. केंद्राच्या सेवेकºयांनी सेंद्रिय शेती, गर्भसंस्कार, शेतीवास्तुशास्त्र, सण व व्रत वैकल्य तसेच भारतीय संस्कृतिची जोपासना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणारे प्रदर्शने या कार्यक्र मात लावलेले होते. केंद्राच्या वास्तुशांती निमित्त दुर्गा सप्तशतीचा सामुदायीक पाठ, वास्तुशांती व औदुंबर मुंज पूजा झाली. गुरु माऊली मोरे यांनी केंद्रातील नवीन दरबारात प्रथमच येवून मार्गदर्शन केल्याने सेवेकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सेवेकºयांची वाढती संख्या विचारात घेवून पारायणासाठी जागा व मुख्य दरबाराची जागा अपुरी पडू लागल्याने केंद्राचे बांधकाम वाढवण्याचे वर्षापूर्वी ठरले. अल्पावधीत परिसरातील व तालुक्यातील सेवेकºयांनी स्वयंस्फुर्तीने मदत केल्याने आज प्रशस्त व केंद्र साकारले आहे. याठिकाणी औदुंबाराचे झाड लावण्यात आले असून त्याची मुंज देखील झाली.भाविकांच्या संख्येत वाढपारेगावरोड येथे दिंडोरी प्रधान केंद्रातर्फे सन १९८५ मध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू झाले होते. एका खुर्चीवर स्वामींच्या प्रतिमेची गुरु वारी व सोमवारी आरती केली जायची. पुढे हळूहळू सेवेकºयांची संख्या व सेवेकरी विस्तारत गेले आणि केंद्रही सभागृहामध्ये साकारले. मागील काही वर्षात येथे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून या केंद्रा तर्फे गुरु चरीत्र पारायण, संकष्ट चतुर्थीला गणपती अथर्व शिर्ष पठण, कोटमगाव येथे नवरात्रीत दुर्गा सप्तशती पारायण, कोपरगाव रोडवरील म्हसोबा मंदिरात अपघात टाळण्यासाठी महामृंत्युजय यज्ञ, तसेच सावरगाव येथील स्वामी समर्थ पिठात पारायण व विविध विषयावर व्याख्यान आयोजित केली जातात.