शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
3
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
4
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
5
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
6
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
7
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
8
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
9
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
10
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
11
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
12
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
13
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
14
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
15
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
16
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
17
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
18
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
19
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
20
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

भारतीय संस्कृती आजही मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:47 IST

संस्कारशील पिढी घडवण्यासाठी राष्ट्रसंतांचा व त्यांच्या विचारांचा आदर करण्याची तसेच आजची पिढी प्रचंड व्यसनाधीन होत चालली असल्याने त्यांचे उद्धबोधन करण्याची आवश्यकता आहे. कारण तरु ण पिढी देशाचे भवितव्य आहे. नागरिकांनी व तरु णांनी ग्रामस्वच्छता अभियानासह पाणी वाचवण्याचीदेखील सामाजिक बांधिलकी बाळगण्याची गरज आहे. सुसंस्कृत समाजासाठी आजही भारतीय संस्कृती मार्गदर्शक व दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी येथे भाविकांशी हितगुज साधताना केले.

येवला : संस्कारशील पिढी घडवण्यासाठी राष्ट्रसंतांचा व त्यांच्या विचारांचा आदर करण्याची तसेच आजची पिढी प्रचंड व्यसनाधीन होत चालली असल्याने त्यांचे उद्धबोधन करण्याची आवश्यकता आहे. कारण तरु ण पिढी देशाचे भवितव्य आहे. नागरिकांनी व तरु णांनी ग्रामस्वच्छता अभियानासह पाणी वाचवण्याचीदेखील सामाजिक बांधिलकी बाळगण्याची गरज आहे. सुसंस्कृत समाजासाठी आजही भारतीय संस्कृती मार्गदर्शक व दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी येथे भाविकांशी हितगुज साधताना केले.येथील स्वामी समर्थ केंद्राचा वास्तुशांती सोहळा व औदुंबराची मुंज या कार्यक्र मा निमित्त मोरे यांनी येथील केंद्रात मार्गदर्शन केले. तीन दिवस सुरु असलेल्या या सोहळ्याला जिल्ह्यातील सर्व स्वामी समर्थ केंद्रांचे प्रतिनिधी तसेच तालुक्यातील सर्व सेवेकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते. गुरु माऊली मोरे यांचे येथे आगमन झाल्यानंतर शहराच्या वतीने नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, सचिन शिंदे यांनी तर केंद्राच्या वतीने नारायण शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. केंद्राच्या सेवेकºयांनी सेंद्रिय शेती, गर्भसंस्कार, शेतीवास्तुशास्त्र, सण व व्रत वैकल्य तसेच भारतीय संस्कृतिची जोपासना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणारे प्रदर्शने या कार्यक्र मात लावलेले होते. केंद्राच्या वास्तुशांती निमित्त दुर्गा सप्तशतीचा सामुदायीक पाठ, वास्तुशांती व औदुंबर मुंज पूजा झाली. गुरु माऊली मोरे यांनी केंद्रातील नवीन दरबारात प्रथमच येवून मार्गदर्शन केल्याने सेवेकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सेवेकºयांची वाढती संख्या विचारात घेवून पारायणासाठी जागा व मुख्य दरबाराची जागा अपुरी पडू लागल्याने केंद्राचे बांधकाम वाढवण्याचे वर्षापूर्वी ठरले. अल्पावधीत परिसरातील व तालुक्यातील सेवेकºयांनी स्वयंस्फुर्तीने मदत केल्याने आज प्रशस्त व केंद्र साकारले आहे. याठिकाणी औदुंबाराचे झाड लावण्यात आले असून त्याची मुंज देखील झाली.भाविकांच्या संख्येत वाढपारेगावरोड येथे दिंडोरी प्रधान केंद्रातर्फे सन १९८५ मध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू झाले होते. एका खुर्चीवर स्वामींच्या प्रतिमेची गुरु वारी व सोमवारी आरती केली जायची. पुढे हळूहळू सेवेकºयांची संख्या व सेवेकरी विस्तारत गेले आणि केंद्रही सभागृहामध्ये साकारले. मागील काही वर्षात येथे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून या केंद्रा तर्फे गुरु चरीत्र पारायण, संकष्ट चतुर्थीला गणपती अथर्व शिर्ष पठण, कोटमगाव येथे नवरात्रीत दुर्गा सप्तशती पारायण, कोपरगाव रोडवरील म्हसोबा मंदिरात अपघात टाळण्यासाठी महामृंत्युजय यज्ञ, तसेच सावरगाव येथील स्वामी समर्थ पिठात पारायण व विविध विषयावर व्याख्यान आयोजित केली जातात.