शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

भारतीय संस्कृती विश्वाला जोडणारी :

By admin | Updated: July 15, 2015 01:42 IST

सिंहस्थ महापर्वास प्रारंभ

त्र्यंबकेश्वर : भारतीय संस्कृती ही विश्वाला जोडणारी असून, भारतीय संस्कृतीने आजवर मुस्लीम, ख्रिश्चन, यहुदी, पारसी सर्वच समुदायांना आदर दिला आहे. भारतीय संस्कृती ही विश्वाचे सांस्कृतिक केंद्र असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले. येथील कुशावर्तानजीक उभारण्यात आलेल्या छोटेखानी सभामंडपात सिंहस्थ महापर्वाच्या ध्वजारोहणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर श्रीपंच दशनाम जुना आखाडा पीठाधिश्वर स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरीजी महाराज, महंत सागरानंदजी सरस्वती, षडदर्शन आखाड्याचे महामंत्री महंत हरिगिरीजी महाराज, महंत राजेंद्रसिंह महाराज, उपाध्यक्ष महंत निर्मलसिंह महाराज, प्रवक्ता महंत डॉ. बिंदू महाराज, महंत नैसर्गिका स्वामी, जुना आखाड्याचे महंत प्रेमगिरीजी महाराज, नारायणगिरी महाराज, निरंजन आखाड्याचे महंत आशिषगिरीजी महाराज, महानिर्वाणी आखाड्याचे महंत रमेशगिरीजी महाराज, आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती महाराज, अटल आखाड्याचे महंत उदयगिरीजी महाराज, महंत सतीशगिरीजी महाराज, अग्नि अखाड्याचे महंत दुर्गानंदजी महाराज, महंत रघुगिरीजी महाराज, महंत प्रेमानंद महाराज, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार निर्मला गावित, नगराध्यक्ष अनघा फडके, उपनगराध्यक्ष संतोष कदम, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिखरे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आदि उपस्थित होते. राजनाथसिंह पुढे म्हणाले की, राजकारण्यांनी संतांपुढे बोलायचे नसते, तर संत-महंतांनी दिलेल्या आदेशाचे पालन करायचे असते. भारतीय संस्कृती ही अद्भुत संस्कृती असून, जागतिक पातळीवर भारतीय संस्कृती आजवर सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. पाकिस्तान आणि इंडोनेशियात मुस्लीम बांधवांमध्ये जितक्या जाती आणि पंथ आढळत नाहीत, ते सर्व पंथ भारतात आढळतात. भारतीय संस्कृतीने नेहमीच सर्व धर्मांना मान-सन्मान दिला आहे. विश्वातील पहिला चर्च केरळ (भारतात) उभा राहिला आहे. तर यहुदी आणि पारसी समाजाला सर्वाधिक सन्मान केवळ भारतातच मिळाल्याचे त्यांच्या इतिहासात नमूद आहे. भारतात सर्व जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने शांततेत राहतात. महंत अवधेशानंदगिरीजी महाराज यांनी त्यांच्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, भारतीय संस्कृती ही श्रद्धा, संस्कार, संस्कृती आणि परंपरेची आध्यात्मिक संवेदना आहे. भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक कणाकणात परमेश्वर आहे. भारतीय संस्कृतीने प्रत्येक धर्माचा आदरच केला आहे. जगात संसाराला बाजार समजले, तर भारतीय संस्कृती संसाराला परिवार समजते. येथे अतिथी देवो भव, ही संस्कृती रुजलेली आहे. हिंदू धर्मात सर्व समाजाचे हित जपण्याची ताकद आहे.