शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

भारतीय संस्कृती विश्वाला जोडणारी :

By admin | Updated: July 15, 2015 01:42 IST

सिंहस्थ महापर्वास प्रारंभ

त्र्यंबकेश्वर : भारतीय संस्कृती ही विश्वाला जोडणारी असून, भारतीय संस्कृतीने आजवर मुस्लीम, ख्रिश्चन, यहुदी, पारसी सर्वच समुदायांना आदर दिला आहे. भारतीय संस्कृती ही विश्वाचे सांस्कृतिक केंद्र असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले. येथील कुशावर्तानजीक उभारण्यात आलेल्या छोटेखानी सभामंडपात सिंहस्थ महापर्वाच्या ध्वजारोहणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर श्रीपंच दशनाम जुना आखाडा पीठाधिश्वर स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरीजी महाराज, महंत सागरानंदजी सरस्वती, षडदर्शन आखाड्याचे महामंत्री महंत हरिगिरीजी महाराज, महंत राजेंद्रसिंह महाराज, उपाध्यक्ष महंत निर्मलसिंह महाराज, प्रवक्ता महंत डॉ. बिंदू महाराज, महंत नैसर्गिका स्वामी, जुना आखाड्याचे महंत प्रेमगिरीजी महाराज, नारायणगिरी महाराज, निरंजन आखाड्याचे महंत आशिषगिरीजी महाराज, महानिर्वाणी आखाड्याचे महंत रमेशगिरीजी महाराज, आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती महाराज, अटल आखाड्याचे महंत उदयगिरीजी महाराज, महंत सतीशगिरीजी महाराज, अग्नि अखाड्याचे महंत दुर्गानंदजी महाराज, महंत रघुगिरीजी महाराज, महंत प्रेमानंद महाराज, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार निर्मला गावित, नगराध्यक्ष अनघा फडके, उपनगराध्यक्ष संतोष कदम, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिखरे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आदि उपस्थित होते. राजनाथसिंह पुढे म्हणाले की, राजकारण्यांनी संतांपुढे बोलायचे नसते, तर संत-महंतांनी दिलेल्या आदेशाचे पालन करायचे असते. भारतीय संस्कृती ही अद्भुत संस्कृती असून, जागतिक पातळीवर भारतीय संस्कृती आजवर सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. पाकिस्तान आणि इंडोनेशियात मुस्लीम बांधवांमध्ये जितक्या जाती आणि पंथ आढळत नाहीत, ते सर्व पंथ भारतात आढळतात. भारतीय संस्कृतीने नेहमीच सर्व धर्मांना मान-सन्मान दिला आहे. विश्वातील पहिला चर्च केरळ (भारतात) उभा राहिला आहे. तर यहुदी आणि पारसी समाजाला सर्वाधिक सन्मान केवळ भारतातच मिळाल्याचे त्यांच्या इतिहासात नमूद आहे. भारतात सर्व जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने शांततेत राहतात. महंत अवधेशानंदगिरीजी महाराज यांनी त्यांच्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, भारतीय संस्कृती ही श्रद्धा, संस्कार, संस्कृती आणि परंपरेची आध्यात्मिक संवेदना आहे. भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक कणाकणात परमेश्वर आहे. भारतीय संस्कृतीने प्रत्येक धर्माचा आदरच केला आहे. जगात संसाराला बाजार समजले, तर भारतीय संस्कृती संसाराला परिवार समजते. येथे अतिथी देवो भव, ही संस्कृती रुजलेली आहे. हिंदू धर्मात सर्व समाजाचे हित जपण्याची ताकद आहे.