शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

भारत दूरसंचारकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: November 2, 2015 23:03 IST

भारत दूरसंचारकडून शेतकऱ्यांची फसवणूक

मालेगाव : भारत दूरसंचार निगम लिमिटेड कंपनीकडून महाकृषी संचार योजनेचे समायोजन करून नवीन येणारी योजना ही शेतकऱ्यांची फसवणूक करणारी असल्याचे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनोद चव्हाण यांनी भारत दूरसंचारच्या मंडल अधिकाऱ्यांना दिले.कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी व शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी सवलतीच्या दरात संवाद घडावा, म्हणून तत्कालीन आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी २०११ मध्ये कृषी संचार योजना राबविली होती. त्यात १०९, १०८ व १२८ रुपये या प्रकारचे मासिक भाडे होते. यात एक जीबीपर्यंत इंटरनेट डाटा मोफत मिळत होता. इंटरनेटवर्कसाठी ४०० मिनिटे तर बीएसएनएलसाठी १०० मिनिटे, ४०० एसएमएस मोफत मिळत होते. कृषी संचार ते कृषी संचार कार्डधारकांमध्ये अमर्याद बोलण्याची सुविधा होती, परंतु आता भारत दूरसंचार निगमने तीनही कृषी संचार योजेनेचे समायोजन करून नव्या स्वरूपात १ नोव्हेंबरपासून ही योजना लागू करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा हा सरकारचा डाव आहे, असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. शासनाने शेतकऱ्यांना अधिक लाभ देणारी कृषी संचार योजना अमलात आणावी, असेही निवेदनात म्हटले आहे. (प्रतिानिधी)