शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गोपचाराकडे वाढता कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:14 IST

धावपळ आणि वाढत्या ताणतणावांमुळे अनेक प्रकारच्या आजारांमध्ये वाढ होत असून, विविध पॅथींचे उपचार घेऊनही आरोग्यात सुधारणा होत नसल्याने निसर्गोपचाराकडे नागरिकांचा कल वाढला आहे. जयभवानीरोड येथे १५ वर्षांपूर्वी नाशिक महानगरपालिकेने बांधलेल्या निसर्गोपचार केंद्रात आतापर्यंत ३१ हजाराहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले आहेत. या निसर्गोपचार केंद्रात फक्त उपचारच नाही तर निसर्गोपचारक होण्यासाठी वर्ग चालविले जातात.

नाशिकरोड : धावपळ आणि वाढत्या ताणतणावांमुळे अनेक प्रकारच्या आजारांमध्ये वाढ होत असून, विविध पॅथींचे उपचार घेऊनही आरोग्यात सुधारणा होत नसल्याने निसर्गोपचाराकडे नागरिकांचा कल वाढला आहे.जयभवानीरोड येथे १५ वर्षांपूर्वी नाशिक महानगरपालिकेने बांधलेल्या निसर्गोपचार केंद्रात आतापर्यंत ३१ हजाराहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले आहेत. या निसर्गोपचार केंद्रात फक्त उपचारच नाही तर निसर्गोपचारक होण्यासाठी वर्ग चालविले जातात.नाशिक महानगरपालिकेने जयभवानीरोड जेतवन नर्सरीशेजारी २००१ मध्ये निसर्गोपचार केंद्राची इमारत बांधली. २००२ पासून योग चैतन्य साधना प्रतिष्ठानच्या वतीने निसर्गोपचार केंद्र चालविले जात आहे. या केंद्रात योग व निसर्गोपचार या दोन्ही पद्धतीचे उपचार केले जातात. तर महिन्याच्या १ ते १०, ११ ते २० व २१ ते ३० असे तीन निवासी शिबिरे घेतली जातात. उपचारासोबत केंद्रामध्ये निसर्गोपचाराचे एएनसी, एएमसी, एएमसीएनडी हे तीन कोर्स शिकविले जातात. यामध्ये महिन्याभराचा निवासी व पोस्टल वर्ग (अनिवासी) आहे. निसर्गोपचाराचे आतापर्यंत एक हजाराहून अधिक उपचारक या शिबिरात शिक्षण घेऊन तयार झाले असून, ते आपापल्या भागांत निसर्गोपचाराचे केंद्र चालवत आहे. तसेच योग संजीवन, योग सोपान, योग प्रवेश, योग परिचय, योग शिक्षा, योग प्रबोध, योग पंडित असे विविध योग प्रशिक्षण वर्ग वर्षभर सुरू असतात. निसर्गोपचाराचे महत्त्व व प्रचार वाढल्याने पूर्वीपेक्षा आता उपचारासाठी व प्रशिक्षण घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. या केंद्रात २७ बेड्स असून आजूबाजूला त्याच पद्धतीने वृक्षारोपण करून झाडे वाढविण्यात आली आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख प्रवीण देशपांडे, वैद्यकीय अधिकारी विद्या देशपांडे, व्यवस्थापक सुनील जाधव कार्यरत आहेत. तर केंद्रात १५ ते २० उपचारक रुग्णावर उपचार करत असतात. मनपाने उभारलेल्या निसर्गोपचार केंद्राला मिळणारा प्रतिसाद व गरजेनुसार तेथे आणखीन सोयी-सुविधा व इमारतीला रंगरंगोटी करण्याची गरज आहे.