शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

‘कॅशलेस’साठी केंद्रांवर वाढता दबाव

By admin | Updated: April 8, 2017 01:00 IST

नाशिक : शासनाचे विविध प्रकारचे दाखले तयार करून ते वितरित करणाऱ्या महा - ई - सेवा केंद्रचालकांना ‘कॅशलेस’ व्यवहारासाठी महाआॅनलाइनने सक्ती केली आहे.

 नाशिक : शासनाचे विविध प्रकारचे दाखले तयार करून ते वितरित करणाऱ्या महा - ई - सेवा केंद्रचालकांना ‘कॅशलेस’ व्यवहारासाठी महाआॅनलाइनने सक्ती केली असून, महिन्यातून किमान वीस नागरिकांकडून स्वाइप मशीनने दाखल्यांचे पैसे स्वीकारावेत अन्यथा केंद्र बंद करण्याची धमकी देण्यात आल्याने सेवा केंद्रचालक अडचणीत सापडले आहेत. तुटपुंजी रक्कमेसाठी नागरिक क्रेडीट कार्ड वापरण्यास नकार देत असल्याने त्यांची मनधरणी करण्याची वेळ केंद्रचालकांवर आली आहे. डिजिटल महाराष्ट्र पूर्तीसाठी महाआॅनलाइनची मदत शासनाने घेतली असून, नोटाबंदीनंतर अधिकाधिक नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करावेत यासाठी महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून आता नागरिकांनाही वेठीस धरण्यास सुरुवात झाली आहे. महाआॅनलाइनने राज्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्रचालकांना याबाबतचे तोंडी आदेश दिले आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे तसेच शासनाचे विविध प्रकारचे दाखले वेळेत व नागरिकांना त्यांच्या घरपोच देण्यासाठी शासनाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी महा-ई-सेवा केंद्रे गावोगावी सुरू केले आहेत. या केंद्रांना शासनाच्या महाआॅनलाइनने जोडण्यात आले असून, केंद्रचालकांनी महाआॅनलाइनच्या माध्यमातून नागरिकांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या सुविधा नाममात्र शुल्क घेऊन पुरवाव्यात, असे अपेक्षित धरण्यात आले आहे. त्यासाठी मात्र सारी गुंतवणूक केंद्रचालकांनी करावयाची असून, केंद्रासाठी जागा, वीजबिल, संगणक, इंटरनेट, कर्मचारी वेतन या सुविधा निर्माण कराव्या लागल्या आहेत. विशेष करून उत्पन्नाचे दाखले, जातीचा दाखला, राष्ट्रीयत्व, वय व अधिवास यासारखे दाखले त्याचबरोबर ग्रामीण भागात वीज देयके स्वीकारण्याची मुभाही केंद्रचालकांना देण्यात आले आहेत. गावातील नागरिकांना गावातच या केंद्रांच्या माध्यमातून सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या या केंद्रचालकांना मात्र डिजिटल महाराष्ट्र व कॅशलेस व्यवहारासाठी आता सक्ती करण्यास सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)